शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

सेंद्रिय शेतीतून शेतकऱ्यांना विकासाचा मंत्र देणारे तानाजी गायधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

महाराष्ट्र राज्य कृषी, कृषी संलग्नित क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना २०१८ व २०१९ या वर्षाचे पुरस्कार बुधवारी घोषित झाले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यात चिखली येथील गोपाल गायधने यांना सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्कारामागे त्यांची प्रचंड मेहनत, चिकाटी आणि इतर शेतकऱ्यांना सामावून घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरली आहे.

ठळक मुद्देकृषिभूषण पुरस्कार : विषमुक्त शेतीचा शासनाकडून गौरव

संतोष जाधवरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनीचा पोत बिघडण्यासोबतच मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याने विषमुक्त शेतीचा ध्यास घेतला. स्वत: आपल्या शेतात प्रयोग करून इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले. आज या शेतकऱ्याच्या विषमुक्त शेती प्रयोगावर महाराष्ट्र शासनानेही शिक्कामोर्तब केले. कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार घोषित करून या शेतीपद्धतीचा गौरव केला. सेंद्रिय शेतीतून विकासाचा मंत्र देणारा हा शेतकरी आहे, भंडारा तालुक्यातील चिखली येथील तानाजी गोपाल गायधने. महाराष्ट्र राज्य कृषी, कृषी संलग्नित क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना २०१८ व २०१९ या वर्षाचे पुरस्कार बुधवारी घोषित झाले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यात चिखली येथील गोपाल गायधने यांना सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्कारामागे त्यांची प्रचंड मेहनत, चिकाटी आणि इतर शेतकऱ्यांना सामावून घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरली आहे. २०१४ पूर्वी गायधने यांनी सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला. आपल्या गावातच गटाची स्थापना केली. ५० जणांचा शेतकरी गट तयार करून सेंद्रिय शेतीचे धडे घेण्यास सुरुवात केली. आत्मा अंतर्गत झालेल्या प्रशिक्षणात ब्रह्मदे जीवनामृत दशपर्णी अर्क तयार केला. त्यानंतर गांडूळ खतनिर्मिती करून सेंद्रिय शेतीसाठी काय करता येईल याची माहिती मिळविणे सुरू केले. राज्यातच नव्हे तर बाहेरील राज्यातही अभ्यास दौरा करून त्यांनी सेंद्रिय शेतीबाबत अद्यावत ज्ञान संपादित केले. उत्पादन खर्च कमी आणि कीड नियंत्रणासाठी अल्प खर्च यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊ लागला. इतर शेतकरीही त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागले. शेतीला पूरक म्हणून त्यांनी रोपवाटिका उभारली. सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या समस्येवर मात केली. फळबाग लागवड योजनेतून शेतात फळझाडांची लागवड केली. आंबा, चिकू, शेवगा आज त्यांच्या शेतात डोलत आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करून त्यांनी भंडारा जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला. त्याचाच शासनाने आता गौरव केला आहे. 

अभ्यासदौऱ्यातून मिळविली माहिती सेंद्रिय शेती मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी आपल्या सहकारी शेतकऱ्यांसोबत विविध ठिकाणचे दौरे केले. त्यात जळगाव, नाशिक, उरळीकांचन येथे जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत राष्ट्रीय जैविक कृषी संस्था सिक्कीम येथे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले. त्याचसोबत रायपूर, हरिद्वार येथेही प्रशिक्षण घेतले. त्यांनी ही बाब आपल्यापुरतीच मर्यादित न ठेवता शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनाही प्रशिक्षणात सहभागी करून घेतले. 

शेतातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक कीडरोग नियंत्रण आवश्यक आहे. आमच्या शेतात भाजीपाला व इतर पिकांमध्ये पक्षी थांबे तयार केले. औषधी वनस्पतीचा वापर करून दशपर्णी अर्क जीवनामृत तयार करून फवारले. एकीकडे खर्चात बचत झाली, तर दुसरीकडे जमिनीचा पोत सुधारला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषमुक्त अन्न तयार करण्यास हातभार लागला. कृषी विभागाचे मिळणारे मार्गदर्शनही आम्हाला मोलाचे ठरले. -तानाजी गायधने,  कृषिभूषण पुरस्कार प्राप्त

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी