शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

धानासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

By admin | Updated: November 22, 2014 00:17 IST

शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विधान परिषदेच्या नागपुर येथील अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री

साकोली : शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विधान परिषदेच्या नागपुर येथील अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धान खरेदी केंद्राच्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीचे आयोजन करुन चर्चा करण्यात येईल व धान खरेदी केंद्र व शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यात येतील असे मत खासदार नाना पटोले यांनी श्रीराम सहकारी भात गिरणी साकोली येथे आयोजित शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केले.यावेळी आमदार बाळा काशिवार, प्राचार्य होमराज कापगते, भातगिरणीचे अध्यक्ष पतीराम कापगते, उपाध्यक्ष हरिदास समरीत, व्यवस्थापक गोपाल समरीत, भोजराम कापगते, संचालक जासवंत कापगते, मनोहर कापगते, जानकीराम कापगते, परसराम कापगते, जगदीश समरीत, देवचंद टेकाम, वासुदेव सुतार, वच्छलाबाई कापगते, लीलाबाई कापगते, शकुंतला समरीत, पैकनदास मेश्राम, चुन्नीलाल कापगते, मार्तंड लांजेवार उपस्थित होते. खा. पटोले म्हणाले की, या भागातील सहकारी स्वस्त धान्य दुकानात पंजाब प्रांतातुन तांदळाची पुर्तता केली जाते. यात विविध अडचणी निर्माण होतात. याकरिता काही शासकिय अधिकारी जबाबदार असुन त्यांचा रॅकेट सक्रिय आहे. छत्तीसगढ प्रांतातून तांदळाची पुर्तता झाल्यास सोयीचे होऊ शकेल.धान खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्यात होणाऱ्या विलंबासाठी मार्केटिंग फेडरेशचे अधिकारी जबाबदार आहेत. या कार्यप्रणालीत सुधार करण्यासाठी केंद्र व राज्याचे नवीन सरकार प्रयत्नशील आहे. यावेळी कार्यक्रमाला रतिराम कापगते, मुरलीधर कापगते, हरिशचंद्र लंजे, अविराम गहाणे, पंढरी कापगते, अशोक गुप्ता, दयाराम समरीत, जगदीश कापगते, ओमकालू कापगते व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)