शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

शेतशिवार ‘हरितक्रांती’साठी गाळाचा आधार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 00:21 IST

लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा.

तहसीलदार राजीव शक्करवार : गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा. गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार योजनेला लोकसहभागाचा आधार देऊन तलाव व शिवार वाचवा, असे प्रतिपादन लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी केले.पालांदुर येथे मामा तलावाच्या गाळमुक्त तलाव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालांदूरच्या सरपंच शुभांगी मदनकर, कवलेवाडा सरपंच वैशाली खंडाईत, न्याहरवानीचे रत्नाकर नागलवाडे, दामाजी खंडाईत, ग्रामविस्तार अधिकारी एच.एम. बावनकर, नायब तहसीलदार विनोद थोरवे, नायब तहसीलदार शरद घारगडे, मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, तलाठी नरेश पडोळे, तंमुस अध्यक्ष हेमराज कापसे, पोलीस पाटील रमेश कापसे, कोतवाल खंडाईत, पर्यावरणप्रेमी इद्रीस लद्धानी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शक्करवार यांनी, तलावातील गाळ उपश्याने पाणीसाठा वाढून भूगर्भात पाणी जिरायला मोठी मदत होणार आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतशिवार सुपिक व्हायला वेळ लागणार नाही. एकाच योजनेतून दोन कामे शेतकऱ्यांकरिता यशस्वीरित्यापुढे येत आहेत. लाखनी तालुक्यात पहिल्या टप्प्यात सात गावांचा यात सहभाग करण्यात आला असून त्यात दैतमांगली, गडेगाव, सामेवाडा, पालांदूर, रेंगेपार (कोहळी), निलागोंदी, मानेगाव यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढलेला गाळ शेतशिवारात पोहचत आहे. कालपर्यंत सुमारे २,१९३ क्युमीकमिटर गाळ उपसून २५ हेक्टरमध्ये पोहचविण्यात आला. याकरिता शेतकरी हा आमचा गाभा असून त्याच्या उत्थानाकरिता शासनाचा व प्रशासनाचा प्रभावी माध्यम ठरत आहे. पालांदुरात आठवडाभर हा कार्यक्रम सुरु राहून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता प्रयत्न केला जाईल. याकरिता पालांदूरचे मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा योजनेचा लाभ घेत दुपारी ४ वाजेपर्यंत ७० ट्रॅक्टर गाळाची उचल केली आहे, हे विशेष.योजना योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. लोकसहभागातूनच कोणत्याही योजनेचे फलीत शक्य आहे. पुढील टप्प्यात ही योजना रोहयो अंतर्गत राबविली तर मजुरांना काम मिळून त्यांच्या आर्थिक उत्थानाला मदत होईल असे प्रतिपादन सरपंच शुभांगी मदनकर यांनी केले.दामाजी खंडाईत यांनी, ही योजना जुनीच आहे. सरकारने फक्त तीचे रूप बदलवीले आहे. ग्रामपंचायतच्या अधिकारात कलम ५१ नुसार पूर्वी सुरू होते. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. लहान मोठ्या शेतकऱ्यांना गाळ मिळून योजनेची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला पालांदूर ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.