शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शेतशिवार ‘हरितक्रांती’साठी गाळाचा आधार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 00:21 IST

लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा.

तहसीलदार राजीव शक्करवार : गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा. गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार योजनेला लोकसहभागाचा आधार देऊन तलाव व शिवार वाचवा, असे प्रतिपादन लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी केले.पालांदुर येथे मामा तलावाच्या गाळमुक्त तलाव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालांदूरच्या सरपंच शुभांगी मदनकर, कवलेवाडा सरपंच वैशाली खंडाईत, न्याहरवानीचे रत्नाकर नागलवाडे, दामाजी खंडाईत, ग्रामविस्तार अधिकारी एच.एम. बावनकर, नायब तहसीलदार विनोद थोरवे, नायब तहसीलदार शरद घारगडे, मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, तलाठी नरेश पडोळे, तंमुस अध्यक्ष हेमराज कापसे, पोलीस पाटील रमेश कापसे, कोतवाल खंडाईत, पर्यावरणप्रेमी इद्रीस लद्धानी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शक्करवार यांनी, तलावातील गाळ उपश्याने पाणीसाठा वाढून भूगर्भात पाणी जिरायला मोठी मदत होणार आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतशिवार सुपिक व्हायला वेळ लागणार नाही. एकाच योजनेतून दोन कामे शेतकऱ्यांकरिता यशस्वीरित्यापुढे येत आहेत. लाखनी तालुक्यात पहिल्या टप्प्यात सात गावांचा यात सहभाग करण्यात आला असून त्यात दैतमांगली, गडेगाव, सामेवाडा, पालांदूर, रेंगेपार (कोहळी), निलागोंदी, मानेगाव यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढलेला गाळ शेतशिवारात पोहचत आहे. कालपर्यंत सुमारे २,१९३ क्युमीकमिटर गाळ उपसून २५ हेक्टरमध्ये पोहचविण्यात आला. याकरिता शेतकरी हा आमचा गाभा असून त्याच्या उत्थानाकरिता शासनाचा व प्रशासनाचा प्रभावी माध्यम ठरत आहे. पालांदुरात आठवडाभर हा कार्यक्रम सुरु राहून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता प्रयत्न केला जाईल. याकरिता पालांदूरचे मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा योजनेचा लाभ घेत दुपारी ४ वाजेपर्यंत ७० ट्रॅक्टर गाळाची उचल केली आहे, हे विशेष.योजना योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. लोकसहभागातूनच कोणत्याही योजनेचे फलीत शक्य आहे. पुढील टप्प्यात ही योजना रोहयो अंतर्गत राबविली तर मजुरांना काम मिळून त्यांच्या आर्थिक उत्थानाला मदत होईल असे प्रतिपादन सरपंच शुभांगी मदनकर यांनी केले.दामाजी खंडाईत यांनी, ही योजना जुनीच आहे. सरकारने फक्त तीचे रूप बदलवीले आहे. ग्रामपंचायतच्या अधिकारात कलम ५१ नुसार पूर्वी सुरू होते. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. लहान मोठ्या शेतकऱ्यांना गाळ मिळून योजनेची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला पालांदूर ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.