शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवार ‘हरितक्रांती’साठी गाळाचा आधार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 00:21 IST

लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा.

तहसीलदार राजीव शक्करवार : गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा. गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार योजनेला लोकसहभागाचा आधार देऊन तलाव व शिवार वाचवा, असे प्रतिपादन लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी केले.पालांदुर येथे मामा तलावाच्या गाळमुक्त तलाव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालांदूरच्या सरपंच शुभांगी मदनकर, कवलेवाडा सरपंच वैशाली खंडाईत, न्याहरवानीचे रत्नाकर नागलवाडे, दामाजी खंडाईत, ग्रामविस्तार अधिकारी एच.एम. बावनकर, नायब तहसीलदार विनोद थोरवे, नायब तहसीलदार शरद घारगडे, मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, तलाठी नरेश पडोळे, तंमुस अध्यक्ष हेमराज कापसे, पोलीस पाटील रमेश कापसे, कोतवाल खंडाईत, पर्यावरणप्रेमी इद्रीस लद्धानी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शक्करवार यांनी, तलावातील गाळ उपश्याने पाणीसाठा वाढून भूगर्भात पाणी जिरायला मोठी मदत होणार आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतशिवार सुपिक व्हायला वेळ लागणार नाही. एकाच योजनेतून दोन कामे शेतकऱ्यांकरिता यशस्वीरित्यापुढे येत आहेत. लाखनी तालुक्यात पहिल्या टप्प्यात सात गावांचा यात सहभाग करण्यात आला असून त्यात दैतमांगली, गडेगाव, सामेवाडा, पालांदूर, रेंगेपार (कोहळी), निलागोंदी, मानेगाव यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढलेला गाळ शेतशिवारात पोहचत आहे. कालपर्यंत सुमारे २,१९३ क्युमीकमिटर गाळ उपसून २५ हेक्टरमध्ये पोहचविण्यात आला. याकरिता शेतकरी हा आमचा गाभा असून त्याच्या उत्थानाकरिता शासनाचा व प्रशासनाचा प्रभावी माध्यम ठरत आहे. पालांदुरात आठवडाभर हा कार्यक्रम सुरु राहून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता प्रयत्न केला जाईल. याकरिता पालांदूरचे मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा योजनेचा लाभ घेत दुपारी ४ वाजेपर्यंत ७० ट्रॅक्टर गाळाची उचल केली आहे, हे विशेष.योजना योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. लोकसहभागातूनच कोणत्याही योजनेचे फलीत शक्य आहे. पुढील टप्प्यात ही योजना रोहयो अंतर्गत राबविली तर मजुरांना काम मिळून त्यांच्या आर्थिक उत्थानाला मदत होईल असे प्रतिपादन सरपंच शुभांगी मदनकर यांनी केले.दामाजी खंडाईत यांनी, ही योजना जुनीच आहे. सरकारने फक्त तीचे रूप बदलवीले आहे. ग्रामपंचायतच्या अधिकारात कलम ५१ नुसार पूर्वी सुरू होते. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. लहान मोठ्या शेतकऱ्यांना गाळ मिळून योजनेची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला पालांदूर ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.