शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

समाधान योजनेचा लाभ घ्या

By admin | Updated: October 22, 2016 00:25 IST

महाराजस्व शिबीराच्या माध्यमातून सर्व विभाग जनकल्याणाच्या योजना घेऊन आपल्यादारी आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : पर्यटन क्षेत्र रावणवाडी स्वच्छ ठेवाभंडारा : महाराजस्व शिबीराच्या माध्यमातून सर्व विभाग जनकल्याणाच्या योजना घेऊन आपल्यादारी आले आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त गावकऱ्यांनी घ्यावा. त्यासोबतच रावणवाडी हे जिल्हयातील पर्यटन क्षेत्र असून पर्यटकांची नेहमी वर्दळ असते, त्यामुळे येथील परिसरात कचरा होत असतो. आपले गाव नेहमी स्वच्छ ठेवण्याकरीता नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.रावणवाडी येथे महसूल विभागाच्यावतीने समाधान योजना शिबिरात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार संजय पवार, सरपंच जगदिश उके उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, रावणवाडी हे गाव सन २०१६-१७ च्या जलयुक्त शिवार योजनेत घेण्यात आले आहे. त्यामुळे शेती व पिण्याकरीता पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ही योजना लोकसभागातून राबवावी. हागणदारी मुक्त योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत शौचालयाचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शाळेमध्ये लोकवर्गणी करुन डिजीटल शाळा, आंगणवाडी तयार करण्यासाठी समोर येण्याची गरज आहे. या शिबीरात महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, समाज कल्याण, पुरवठा विभाग, भूमी अभिलेख, एकात्मिक बालविकास विभाग, एकात्मिक आदिवासी विभाग, पशुसंवर्धन विभाग, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त महामंडळ, कृषि विभागाने स्टॉल लावले होते. जनकल्याणाच्या योजनाचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.या शिबीरात आधार वाटप, अधिवास प्रमाणपत्र-१८, नॉनक्रिमिलेअर- १०, रेशन कार्ड वाटप-२६, जमिनीचे सामुदायिक पट्टे वाटप-३, शौचालयाचे धनादेश, जात प्रमाणपत्र-१०८, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु झालेल्या कुटूंबांना ४ लाखाचे धनादेश,मिनी टॅक्टर वाटप संमतीपत्र-२, राष्ट्रीय कुटूंब योजना लाभ मंजुरी आदेश-३ ग्रामपंचायत रावणवाडीतर्फे २८ दाखल्याचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागातर्फे १९२ लोकांची रक्तदाब व शुगर तपासणी करण्यात आली.प्रारंभी चिखली येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. प्रास्ताविकात तहसिलदार संजय पवार यांनी समाधान शिबीराची माहिती दिली. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठीच महाराजस्व   अभियान राबविण्यात येत आहे, या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आभारप्रदर्शन तहसिलदार संजय पवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)