शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

समाधान योजनेचा लाभ घ्या

By admin | Updated: October 22, 2016 00:25 IST

महाराजस्व शिबीराच्या माध्यमातून सर्व विभाग जनकल्याणाच्या योजना घेऊन आपल्यादारी आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : पर्यटन क्षेत्र रावणवाडी स्वच्छ ठेवाभंडारा : महाराजस्व शिबीराच्या माध्यमातून सर्व विभाग जनकल्याणाच्या योजना घेऊन आपल्यादारी आले आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त गावकऱ्यांनी घ्यावा. त्यासोबतच रावणवाडी हे जिल्हयातील पर्यटन क्षेत्र असून पर्यटकांची नेहमी वर्दळ असते, त्यामुळे येथील परिसरात कचरा होत असतो. आपले गाव नेहमी स्वच्छ ठेवण्याकरीता नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.रावणवाडी येथे महसूल विभागाच्यावतीने समाधान योजना शिबिरात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार संजय पवार, सरपंच जगदिश उके उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, रावणवाडी हे गाव सन २०१६-१७ च्या जलयुक्त शिवार योजनेत घेण्यात आले आहे. त्यामुळे शेती व पिण्याकरीता पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ही योजना लोकसभागातून राबवावी. हागणदारी मुक्त योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत शौचालयाचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शाळेमध्ये लोकवर्गणी करुन डिजीटल शाळा, आंगणवाडी तयार करण्यासाठी समोर येण्याची गरज आहे. या शिबीरात महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, समाज कल्याण, पुरवठा विभाग, भूमी अभिलेख, एकात्मिक बालविकास विभाग, एकात्मिक आदिवासी विभाग, पशुसंवर्धन विभाग, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त महामंडळ, कृषि विभागाने स्टॉल लावले होते. जनकल्याणाच्या योजनाचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.या शिबीरात आधार वाटप, अधिवास प्रमाणपत्र-१८, नॉनक्रिमिलेअर- १०, रेशन कार्ड वाटप-२६, जमिनीचे सामुदायिक पट्टे वाटप-३, शौचालयाचे धनादेश, जात प्रमाणपत्र-१०८, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु झालेल्या कुटूंबांना ४ लाखाचे धनादेश,मिनी टॅक्टर वाटप संमतीपत्र-२, राष्ट्रीय कुटूंब योजना लाभ मंजुरी आदेश-३ ग्रामपंचायत रावणवाडीतर्फे २८ दाखल्याचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागातर्फे १९२ लोकांची रक्तदाब व शुगर तपासणी करण्यात आली.प्रारंभी चिखली येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. प्रास्ताविकात तहसिलदार संजय पवार यांनी समाधान शिबीराची माहिती दिली. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठीच महाराजस्व   अभियान राबविण्यात येत आहे, या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आभारप्रदर्शन तहसिलदार संजय पवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)