शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

सिंचन विहीर योजनेचा लाभ घ्या

By admin | Updated: November 15, 2016 00:33 IST

महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या...

विजय रहांगडाले : शासनाच्या धडक योजनांची दिली माहिती तिरोडा : महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने धडक मोहिमेंतर्गत सिंचन विहीर योजना शेतकऱ्यांकरिता अस्तित्वात आणलेली आहे. शेतकऱ्यांनी सदर शासकीय योजनेचा लवकरात लवकर लाभ घेण्याचे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.बेरडीपार येथील नाटकाच्या उद्घाटकीय भाषणातून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, पं.स. सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, पवन पटले, रमणीक सयाम, सरपंच सरिता राणे, उपसरपंच रमेश साठवणे, सदस्य मिलिंद कुंभरे, जितेंद्र रहांगडाले, पासपोर्ट एजंट राज सोनेवाने, कैलास कटरे, डिलेश पारधी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, या योजनेमुळे टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्याकरिता शेतकऱ्यांना मदत होईल. ही योजना गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. तसेच या योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना देण्याकरिता कोणत्याही अधिकारी अथवा कार्यालयाशी संपर्क न करता सरळ आॅनलाईन अर्ज शेतकरी करू शकतात. यासाठी शेतीचा सातबारा, नकाशा, नमुना आठ-अ, बँक पासबूक झेराक्स व अर्ज या कागदपत्रांची पूर्तता करुन कोणत्याही इंटरनेट कॅफेमधून महाआॅनलाईन सेंटर येथे जाऊन आॅनलाईन अर्ज करावे. अर्ज करण्यासाठी वेबसाईटचा वापर करावा. तसेच ज्यांना आॅनलाईन अर्ज करताना कोणत्याही अडचणी येत असल्यास आ. रहांगडाले जनसंपर्क कार्यालयात आॅनलाईन अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे किमान ०.६० हेक्टर जमीन असून कमाल मर्यादेकरिता कोणतीच अट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा त्वरित लाभ घेण्याचे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले. संचालन पी.आर. कटरे यांनी केले. आभार पारधीकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी )