शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

दहावी व बारावीच्या परीक्षा शाळेतच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:47 IST

जागतिक कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसह विदर्भातील शाळा भीतीच्या वातावरणात टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या खऱ्या; पण कोरोनाने पुन्हा ...

जागतिक कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसह विदर्भातील शाळा भीतीच्या वातावरणात टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या खऱ्या; पण कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. चालू शैक्षणिक सत्रातील दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य तारखा एप्रिल-मे मध्ये जाहीर झाल्या आहेत; मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत, त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन दिले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह विदर्भातील सर्व शाळा मागील मार्च महिन्यापासून बंद असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू होते; मात्र तात्पुरता कोरोना नियंत्रणात आला असल्यामुळे नुकत्याच ९ ते १२ तसेच ५ ते ८ च्या नियमित शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले असून, कोरोना नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळेच नुकत्याच सुरू झालेल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास १०/१२ वीच्या परीक्षा होणार की नाहीत. आपल्या पाल्याचे वर्ष वाया तर जाणार नाही, अशी पालकांची चिंता वाढली आहे.

नुकत्याच शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना आनंद झाला होता. कारण अनेक पालकांजवळ स्मार्ट फोन, इंटरनेट किंवा नेटवर्क इत्यादीचा अभाव असल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले होते; मात्र पुन्हा शाळा बंद झाल्याने पालकांची धाकधूक वाढली आहे.

यातच राज्य शासनाने दहावी व बारावीची परीक्षासंदर्भात एप्रिल/मेमध्ये संभाव्य तारखा जाहीर केल्या असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी अभ्यासक्रमदेखील कमी केला आहे. यावरून परीक्षा होणार, हे निश्चित आहे.

मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नियोजित परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सध्या ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत. त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षकांची गर्दी होणार नाही, यासाठी शाळेतच परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, पुरुषोत्तम लांजेवार, अशोक बनकर, दारासिंग चव्हाण, धीरज बांते, अनिल कापटे, मनोज अंबादे, धनवीर काणेकर, अनंत जायभाये, पंजाब राठोड, जागेश्वर मेश्राम इत्यादींनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन दिले आहे.

कोट

परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी धावपळीत असतात. याशिवाय केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत पालक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या काळात परीक्षा केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी शाळेतच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास सर्वांच्या सोयीचे होईल.

राजेश धुर्वे

जिल्हा कार्यवाह, विमाशि संघ, भंडारा.