शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दहावी व बारावीच्या परीक्षा शाळेतच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:47 IST

जागतिक कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसह विदर्भातील शाळा भीतीच्या वातावरणात टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या खऱ्या; पण कोरोनाने पुन्हा ...

जागतिक कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसह विदर्भातील शाळा भीतीच्या वातावरणात टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या खऱ्या; पण कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. चालू शैक्षणिक सत्रातील दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य तारखा एप्रिल-मे मध्ये जाहीर झाल्या आहेत; मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत, त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन दिले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह विदर्भातील सर्व शाळा मागील मार्च महिन्यापासून बंद असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू होते; मात्र तात्पुरता कोरोना नियंत्रणात आला असल्यामुळे नुकत्याच ९ ते १२ तसेच ५ ते ८ च्या नियमित शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले असून, कोरोना नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळेच नुकत्याच सुरू झालेल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास १०/१२ वीच्या परीक्षा होणार की नाहीत. आपल्या पाल्याचे वर्ष वाया तर जाणार नाही, अशी पालकांची चिंता वाढली आहे.

नुकत्याच शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना आनंद झाला होता. कारण अनेक पालकांजवळ स्मार्ट फोन, इंटरनेट किंवा नेटवर्क इत्यादीचा अभाव असल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले होते; मात्र पुन्हा शाळा बंद झाल्याने पालकांची धाकधूक वाढली आहे.

यातच राज्य शासनाने दहावी व बारावीची परीक्षासंदर्भात एप्रिल/मेमध्ये संभाव्य तारखा जाहीर केल्या असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी अभ्यासक्रमदेखील कमी केला आहे. यावरून परीक्षा होणार, हे निश्चित आहे.

मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नियोजित परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सध्या ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत. त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षकांची गर्दी होणार नाही, यासाठी शाळेतच परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, पुरुषोत्तम लांजेवार, अशोक बनकर, दारासिंग चव्हाण, धीरज बांते, अनिल कापटे, मनोज अंबादे, धनवीर काणेकर, अनंत जायभाये, पंजाब राठोड, जागेश्वर मेश्राम इत्यादींनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन दिले आहे.

कोट

परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी धावपळीत असतात. याशिवाय केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत पालक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या काळात परीक्षा केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी शाळेतच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास सर्वांच्या सोयीचे होईल.

राजेश धुर्वे

जिल्हा कार्यवाह, विमाशि संघ, भंडारा.