शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

दहावी व बारावीच्या परीक्षा शाळेतच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:47 IST

जागतिक कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसह विदर्भातील शाळा भीतीच्या वातावरणात टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या खऱ्या; पण कोरोनाने पुन्हा ...

जागतिक कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसह विदर्भातील शाळा भीतीच्या वातावरणात टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या खऱ्या; पण कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. चालू शैक्षणिक सत्रातील दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य तारखा एप्रिल-मे मध्ये जाहीर झाल्या आहेत; मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत, त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन दिले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह विदर्भातील सर्व शाळा मागील मार्च महिन्यापासून बंद असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू होते; मात्र तात्पुरता कोरोना नियंत्रणात आला असल्यामुळे नुकत्याच ९ ते १२ तसेच ५ ते ८ च्या नियमित शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले असून, कोरोना नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळेच नुकत्याच सुरू झालेल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास १०/१२ वीच्या परीक्षा होणार की नाहीत. आपल्या पाल्याचे वर्ष वाया तर जाणार नाही, अशी पालकांची चिंता वाढली आहे.

नुकत्याच शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना आनंद झाला होता. कारण अनेक पालकांजवळ स्मार्ट फोन, इंटरनेट किंवा नेटवर्क इत्यादीचा अभाव असल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले होते; मात्र पुन्हा शाळा बंद झाल्याने पालकांची धाकधूक वाढली आहे.

यातच राज्य शासनाने दहावी व बारावीची परीक्षासंदर्भात एप्रिल/मेमध्ये संभाव्य तारखा जाहीर केल्या असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी अभ्यासक्रमदेखील कमी केला आहे. यावरून परीक्षा होणार, हे निश्चित आहे.

मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नियोजित परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सध्या ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत. त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षकांची गर्दी होणार नाही, यासाठी शाळेतच परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, पुरुषोत्तम लांजेवार, अशोक बनकर, दारासिंग चव्हाण, धीरज बांते, अनिल कापटे, मनोज अंबादे, धनवीर काणेकर, अनंत जायभाये, पंजाब राठोड, जागेश्वर मेश्राम इत्यादींनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन दिले आहे.

कोट

परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी धावपळीत असतात. याशिवाय केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत पालक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या काळात परीक्षा केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी शाळेतच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास सर्वांच्या सोयीचे होईल.

राजेश धुर्वे

जिल्हा कार्यवाह, विमाशि संघ, भंडारा.