शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

दहावी व बारावीच्या परीक्षा शाळेतच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:47 IST

जागतिक कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसह विदर्भातील शाळा भीतीच्या वातावरणात टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या खऱ्या; पण कोरोनाने पुन्हा ...

जागतिक कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसह विदर्भातील शाळा भीतीच्या वातावरणात टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या खऱ्या; पण कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. चालू शैक्षणिक सत्रातील दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य तारखा एप्रिल-मे मध्ये जाहीर झाल्या आहेत; मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत, त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन दिले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह विदर्भातील सर्व शाळा मागील मार्च महिन्यापासून बंद असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू होते; मात्र तात्पुरता कोरोना नियंत्रणात आला असल्यामुळे नुकत्याच ९ ते १२ तसेच ५ ते ८ च्या नियमित शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले असून, कोरोना नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळेच नुकत्याच सुरू झालेल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास १०/१२ वीच्या परीक्षा होणार की नाहीत. आपल्या पाल्याचे वर्ष वाया तर जाणार नाही, अशी पालकांची चिंता वाढली आहे.

नुकत्याच शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना आनंद झाला होता. कारण अनेक पालकांजवळ स्मार्ट फोन, इंटरनेट किंवा नेटवर्क इत्यादीचा अभाव असल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले होते; मात्र पुन्हा शाळा बंद झाल्याने पालकांची धाकधूक वाढली आहे.

यातच राज्य शासनाने दहावी व बारावीची परीक्षासंदर्भात एप्रिल/मेमध्ये संभाव्य तारखा जाहीर केल्या असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी अभ्यासक्रमदेखील कमी केला आहे. यावरून परीक्षा होणार, हे निश्चित आहे.

मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नियोजित परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सध्या ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत. त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षकांची गर्दी होणार नाही, यासाठी शाळेतच परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, पुरुषोत्तम लांजेवार, अशोक बनकर, दारासिंग चव्हाण, धीरज बांते, अनिल कापटे, मनोज अंबादे, धनवीर काणेकर, अनंत जायभाये, पंजाब राठोड, जागेश्वर मेश्राम इत्यादींनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन दिले आहे.

कोट

परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी धावपळीत असतात. याशिवाय केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत पालक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या काळात परीक्षा केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी शाळेतच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास सर्वांच्या सोयीचे होईल.

राजेश धुर्वे

जिल्हा कार्यवाह, विमाशि संघ, भंडारा.