शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त अध्यक्षांचे धरणे

By admin | Updated: February 26, 2016 00:48 IST

शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी तंटामुक्त गाव समितीची प्रत्येक गावात निवड करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अनेक पक्ष संघटनांनी दिला दारुबंदीला समर्थनभंडारा : शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी तंटामुक्त गाव समितीची प्रत्येक गावात निवड करण्यात आली. मात्र या तंटामुक्त समित्यांना केवळ एक वर्षांचा कार्यकाळ दिला जात असल्याने कोणतीही मोहिम राबविता येत नाही. जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा उद्देश अपूर्ण असतो. भंडारा जिल्हा दारू मुक्त करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी भंडारा जिल्हा तंटामुक्ती संघटन समिती जिल्हा भंडारा शाखेच्या वतीने येथील त्रिमुर्ती चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.आज सकाळी ११ वाजतापासून धरणे आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. शिवसेना, रिपब्लिकन सेना या पक्षांसह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंदोलनादरम्यान मार्गदर्शन करताना अनेक मान्यवरांनी चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे भंडारा जिल्हात दारूबंदी करावी. दारूमुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. बेभान सुरू असलेली दारू विक्री थांबविण्यात पोलिसांना अपयश आले आहेत. पोलीस व विक्रेत्यांमध्ये अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याने जिल्ह्यात दारूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. दारूबंदी करताना लोकप्रतिनिधींनी स्वत:पासून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. दारूबंदीसाठी मोठे आंदोलन करण्याची गरज आहे. त्यासाठी संघटना सर्वांना एकत्रित करून मोठा आंदोलन उभा करेल, असा सूर मान्यवरांचा होता.यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अचल मेश्राम यांच्यासह तंटामुक्त संघटन समितीचे जिल्हाध्यक्ष सैय्यद जाफरी, उपाध्यक्ष जगन्नाथ बडवाईक, देवा वाघमारे, बाबुलाल भांडारकर, रविंद्र चोपकर, भगवती निमजे, अंबादास ईश्वरकर, महिपाल ईश्वरकर, शंकर लांबट, मनोहर चामट, अशोक राऊत, मधुकर चामलाटे, मनोहर रोटके, श्रीराम मारवाडे, सहादेव राऊत, प्रभू चेटुले यांच्यासह जवळपास ६२ महिला-पुरूष उपस्थित होते.सायंकाळच्या सुमारास एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन त्यांना सोपविण्यात आले. निवेदनात तंटामुक्त समिती अध्यक्षांचे कार्यकाळ ५ वर्षाचे करण्यात यावे, त्यांना योग्य तो मानधन देण्यात यावा, पुरस्कार राशीचे नियोजन करण्याचे अधिकार तंटामुक्त समितीला देण्यात यावे, सभेमध्ये बिट जमादार, तलाठी, ग्रामसेवक यांची उपस्थिती अनिवार्य करावे, दस्तऐवज खर्चासाठी वर्षाकाठी पाच हजार रूपये द्यावे, अवैध व्यवसाय बंद करतेवेळी तंटामुक्त समितीला प्रशासनाने मदत करावी, त्यासाठी एक आयपीएस अधिकाऱ्याची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. (नगर प्रतिनिधी)