शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा

By admin | Updated: May 11, 2016 00:51 IST

येरली येथील सीमेंट रस्ता बांधकामात अनियमितता प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती न करता ...

येरली येथील सिमेंट रस्ता प्रकरण : तांत्रिक अधिकाऱ्याऐवजी विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्तीतुमसर : येरली येथील सीमेंट रस्ता बांधकामात अनियमितता प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती न करता विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती खंडविकास अधिकाऱ्यांनी केली. मागील चार महिन्यांपासून चौकशीचा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सदर प्रकरणात हयगय केल्याप्रकरणी खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पंचायत समिती सदस्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.येरली येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आनंदराव रहांगडाले ते सूरजलाल पारधी यांच्या घरापर्यंत सीमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. ६० मिटर पैकी ४२ मिटर बांधकाम करण्यात आले. १८ मिटर रस्ता बांधकाम केला नाही. कामाचा कालावधी १८ मार्च २०१४ ते २३ एप्रिल २०१४ असा होता. दि. २४ एप्रिल २०१४ ला काम पूर्ण झाल्याची नोंद पुस्तिकेत आहे. परंतु प्रस्तावित जागेवर केवळ ४२ मीटर रस्ता बांधकाम करण्यात आले. १८ मिटर रस्ता प्रस्तावित जागेवर नाही.या रस्ता बांधकामाची अंदाजपत्रकीय किंमत २०२१०० खर्च झालेली रक्कम १९७७६४ आहे. येथे अंतिम देयकाची उचल करण्यात आली. सदर रस्त्याची ग्रामस्थांनी तक्रार केल्यावर खंडविकास अधिकाऱ्यांनी चौकशीकरिता तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता विस्तार अधिकारी राजूरकर यांची नियुक्ती केली. चार महिन्यापासून चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत आला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. कर्तव्यात कसूर व दप्तरदिरंगाई प्रकरणी संबंधित खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे यांनी केली तथा येरली येथील सिमेंट रस्ता प्रकरणी जिल्हास्तरीय तांत्रिक अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची मागणीही मुन्ना पुंडे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी) दोन्ही माजी आमदारांनी राजकारण करू नयेतुमसर तालुक्यात सिंचन प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, परंतु त्यांना शेतीचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. आ.चरण वाघमारे यांनी शासनाकडून मुबलक निधी आणून सरळ खरेदी प्रक्रियेतून जमिनीचा मोबदला मिळवून दिला. लाभ क्षेत्रातील ५०० एकर जमिनीवर सुक्ष्मसिंचन योजना लवकरच कार्यान्वित होत आहे. माजी आ.अनिल बावनकर व माजी आ.मधुकर कुकडे यांनी राजकारण करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे हित समजले असते तर शेतकऱ्यांकरिता भरीव मदत त्यांच्या कार्यकाळात केली असती. बघेडा, कारली, सोरणा, आंबागड, नागठाणा जलाशयात बावनथडीचे पाणी आ.वाघमारे यांच्या प्रयत्नामुळेच झाले. बावनथडी प्रकल्पातून त्यांच्या कार्यकाळात केवळ पाच हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळाले तर सध्या ११ हजार हेक्टर शेतीला पाणी सोडण्यात आले. विद्यमान आमदारावर आरोप करणाऱ्या माजी आमदारांनी पुरावे सादर करून बोलावे. असे भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पटले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला माजी पं.स. सभापती कलाम शेख, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमर टेंभरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर उपस्थित होते.