शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यनारायण कोपला; भंडारा ४५.५ अंशावर

By admin | Updated: May 20, 2015 01:21 IST

दोन दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून जनजीवन प्रभावित झाले आहेत.

भंडारा : दोन दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून जनजीवन प्रभावित झाले आहेत. सोमवार आणि मंगळवार या वर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वात 'हॉट' दिवस ठरला आहे. काल सोमवारी ४३.५ अंश तापमानाची नोंद केल्यानंतर आज पुन्हा तापमानात वाढ दिसून आली. आजचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गत २४ तासात तापमानात दोन अंशाने वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा आबाल वृद्धांसह सर्वांनाच फटका बसला आहे. सकाळी ८ वाजतापासूनच सुर्याच्या उष्णतेत प्रखरता जाणवत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत रहदारी असलेले रस्ते निर्मनुष्य दिसत आहे. सायंकाळी ५ वाजतापर्यंत तिच स्थिती होती. रस्त्यांवर तथा बाजारपेठेत शुकशुकाट होता. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. पाणपोई व शितपेयांच्या दुकानात नागरिकांची गर्दी दिसून आली. उष्णतेपासून बचाव करता यावा यासाठी नागरिक धडपड करीत असल्याचे दिसले. एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच उन्हाच्या काहिलीने नागरिकांसह वन्यप्राण्यांची ससोहोलपट सुरू होत असते. मागील तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनात आले. आजचा दिवस सर्वाधिक उष्णतेचा ठरला आहे. गत बारा दिवसातील तापमानाचा हा उच्चांक आहे. वैशाख महिन्याच्या सुरूवातीपासूनच उष्णतेची प्रखरता जाणवू लागली आहे. तापमानात मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान ४३ अंशापर्यंत पोहचले होते. मात्र, आज तापमानाची तिव्रता अधिक होती. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. दि. ७ मे रोजी ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून हवामानात अनपेक्षित बदल होऊन जानेवारी ते एप्रिलपर्यंत वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यामुळे तापमानात खंड पडून दमट वातावरणच जास्त राहिले आहे. मात्र, वैशाख महिना सुरू होताच तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा पल्ला गाठला. तो अद्याप स्थिर आहे. (प्रतिनिधी)