शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

बांधावरुनच सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाताशी आलेले धानपिक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात संपुर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले आहे. यासोबतच इतर तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी शासनाला नुकसानीचा अहवाल पाठविला.

ठळक मुद्देमदतीची आस : नुकसानीचा वस्तुनिष्ठ माहितीवर शेतकऱ्यांना शंका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील धानपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. मात्र महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी शेताच्या बांधावरुन नजर सर्वेक्षण करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नुकसानीच्या वस्तुनिष्ठ सर्वेक्षणाबद्दल शेतकऱ्यांमध्येच संशय व्यक्त होत आहे. सर्वेक्षणच योग्य झाले नाही तर मदत कशी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाताशी आलेले धानपिक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात संपुर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले आहे. यासोबतच इतर तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी शासनाला नुकसानीचा अहवाल पाठविला. त्या अहवालात जिल्ह्यात केवळ ८ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. खरे पाहता एकाच तालुक्यात यापेक्षा दुप्पट नुकसान झाले आहे. मात्र याबाबत प्रशासन काहीही बोलायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज सादर केले आहे. या अर्जाची सहानिशा केल्यास खरा आकडा कळू शकतो.आता शासनाने आदेश दिल्यानंतर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी गावागावांत जावून सर्वेक्षण करीत असल्याचे चित्र आहे. मात्र अनेक गावांमध्ये आजही सर्वेक्षणासाठी पथक पोहोचले नसल्याची ओरड होत आहे. काही गावात केवळ एका ठिकाणी बसून सर्वेक्षण केले जात आहे. तर काही गावात शेतकऱ्यांच्या बाध्यापर्यंत पोहोचून केवळ नजरेने पाहणी केली जात आहे. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करतांना संबंधित गावातील सरपंच आणि पोलीस पाटलांसोबत शेतकऱ्यांच्या समक्ष सर्वेक्षण करण्याची गरज आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही. केवळ शासकीय सोपस्कार पार पाडण्याकडे सर्वांचे लक्ष आहे.कडप्याला येतोय सडका वासपरतीच्या पावसाने काढणी झालेला धान ओला झाला. हा कडपा आता सडत असून त्याला दुर्गंधी सुटली आहे. अनेक शेतकºयांनी ओला झालेला कडपा वाळविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. मात्र पावसाने मातीमोल झालेल कडपातून कोणत्याही उत्पनाची आशा नाही. झोपलेल्या धानाला अंकुर फुटत असून अनेक ठिकाणी धान काळा पडला आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती