शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे मचाणावरून निगराणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

शेतकऱ्यांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती : शासकीय आर्थिक मदत आखडती चुल्हाड ( सिहोरा) : वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता, ...

शेतकऱ्यांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती : शासकीय आर्थिक मदत आखडती

चुल्हाड ( सिहोरा) : वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता, शेतकऱ्यांनी शेतशिवारात असणाऱ्या उत्पादनावर निगराणी ठेवण्यासाठी मचाणाचा आधार घेतला आहे. यावरून वन्य प्राण्यांची दहशत शेतकऱ्यांत दिसून येत आहे. सिहोरा परिसरात शेतकरी स्वयंघोषित उपाययोजना करीत आहेत. दरम्यान, वन्यप्राण्यांचे हल्ल्यातील आर्थिक मदत आखडती असल्याने शेतकऱ्यांत भीती आहे. आर्थिक मदत वाटपात वाढ करण्याची मागणी ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत. याशिवाय शेत शिवाराला सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिहोरा परिसरात सातपुडा पर्वत रांगा आणि घनदाट जंगल आहे. नद्याचे खोरे असल्याने बारमाही वाहणारे पाणी आहे. घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. गावांचे शेजारी जंगल असल्याने शेत शिवारात वन्य प्राण्यांची धुडगूस सुरू झाली आहे. शेतात असणाऱ्या उत्पादित कडधान्यावर वन्य प्राणी ताव मारत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतीचे सुरक्षा करण्यासाठी तारेचे कुंपण करण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले आहेत, परंतु या कुंपणाचा फायदा होतांना दिसत नाही. कुंपण तोडून शेतात वन्य प्राणी शिरकाव करीत आहेत. शेतात प्रचंड नासाडी करीत असल्याने आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वन विभागाच्या यंत्रणेला माहीत देण्यात येत असली, तरी काही बाबतीत तरतुदी नसल्याने मदतीपासून शेतकरी वंचित राहत आहेत. मुरली, सोनेगाव, धनेगाव, बोरगाव, टेमनी, चांदपूर, गोंदेखारी, सुकली नकुल, गोंडीटोला, बिनाखी, देवरी देव, गावांचे शिवारात असणारे शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने त्रस्त झाले आहे. या शिवाय वन्यप्राणी शेतशिवारात नासाडी केल्यानंतर शेतकऱ्यांवर हल्ले करीत असल्याने मोठ्या दहशतीत शेतकरी आहेत.

वन्यप्राण्यांचे हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनीच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शेतात पिकांचे सुरक्षा करण्यासाठी मचाण निर्मिती केली आहे. या मचाणावर बसून शेत शिवारात निगराणी ठेवण्यात येत आहे. वन्य प्राण्यांना शेतातून हाकलून लावण्यासाठी डबे उपयोगात आणले जात आहेत. रात्री डब्यांच्या आवाजाने वन्य प्राणी पळून जात असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मचाणावरून निगराणी ठेवताना वन्य प्राण्यांचे भीती राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांना कल मचाण निर्मितीकडे असल्याचे दिसून येत आहे. शासन स्तरावरून शेतकऱ्यांचे शेतीला सुरक्षित करण्यासाठी योजना राबविण्यात येत नाहीत. योजना असल्या, तरी त्या युद्धस्तरावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित उपाययोजना करण्यासाठी वन विभागाकडून मचाण निर्मितीची प्रेरणा घेतली आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांच्या गणनेकरिता असे जंगलात मचाण निर्मिती केल्या आहेत. शेतकऱ्यांना शेत शिवारात तारेचे कुंपण योजना राबविण्यात येत असली, तरी बोटावर मोजण्या इतपत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. दरम्यान, रात्री शेत शिवारात कडधान्याची सुरक्षा करताना, मचाण फायदेशीर ठरत आहेत. वन्यप्राण्यांपासून हल्ल्याची भीती राहत नाही. यामुळे हा पॅटर्न राबविण्याची ओरड सुरू झाली आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांना सरसकट मचाण मंजूर करा

शेत शिवारात कडधान्याची सुरक्षा व देखरेख करण्यासाठी शेतकरी बहुतांश शेत शिवारात वास्तव्य करतात, दिवस-रात्र शेतात राहत असल्याने, वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती राहत आहे. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट लोखंडी मचाण मंजूर करावे, अशी मागणी गोंडीटोला ग्रामपंचायतीच्या सदस्य शीतल चिंचखेडे यांनी केली आहे.

लोखंडी मचाणाच्या निर्मितीतून शेतकऱ्यांच्या जीवाचे सरंक्षण होणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाने मचाणाकरिता अनुदान दिले पाहिजे.

सतीश सोनेवाणे, सामाजिक कार्यकर्ते, पांजरा