शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा

By admin | Updated: October 26, 2015 01:02 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच विशेष चर्चेत राहणारे किसान गर्जनेचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी गोंडसावरी येथे उपोषणकर्त्यांना भेटून त्यांना पाठिंबा दिला.

राजेंद्र पटले : शेतमालाला भाव देण्याची मागणीभंडारा : शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच विशेष चर्चेत राहणारे किसान गर्जनेचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी गोंडसावरी येथे उपोषणकर्त्यांना भेटून त्यांना पाठिंबा दिला. शासनाच्या शेतकरी विरोधी कृत्याचा समाचार घेतला. चांगले दिवस आणण्यासाठी शेतकऱ्यांनी शासन बदलविले. परंतु शेतकऱ्यांची दिशाभूल झाली. पूर्वीच्या शासन काळात जे शेतमालास भाव मिळत होते त्याच्याहीपेक्षा या शासन काळात खूप कमी भाव मिळत आहे. यावर्षी भंडारा जिल्ह्यात धानावर खूप कीड लागली आहे. अनेकदा फवारणी करून सुद्धा कीड संपुष्टात येत नाही आहे. महाग औषधीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पुन्हा फक्त सहा तास थ्री फेज विद्युत शेतकऱ्यांना मिळत आहे. ते ही मुद्दाम शेतकऱ्यांना खूप त्रास व्हावा म्हणून रात्रीच्या १२ वाजता विद्युत सुरु करण्यात येते. त्यामुळे अनेक शेतकरी रात्रभर झोपत नाहीत. अदानी पॉवर प्रकल्प निव्वळ दुसऱ्या राज्यांना वीज विकण्यासाठीच निर्माण करण्यात आला आहे काय? की भोळ्या शेतकऱ्यांना मुर्ख बनविण्यासाठी? हा चिंतेचा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे.मग विश्वास करावा तर कुणावर करावा? शेतकऱ्यांच्या हिताचे शासन या कृषिप्रधान देशात केव्हा येईल? अनेक उद्योगपती, व्यवसायी, अधिकारी, कर्मचारी यांचा विचार होतो. यांच्यासाठी स्मार्ट शहरे बनविण्याची तयारी होत आहे. दरवर्षी बोनस दिल्या जाते पण स्मार्ट शेतकरी बनविण्याची मुळातच शासनाची इच्छा नाही ही कृषिप्रधान देशात शोकांतिका आहे असे शेतकरी नेते राजेंद्र पटले यांनी गोंडसावरी येथील शेतकऱ्यांना सांगितले. जर खरच पुढे शेतकऱ्यांवर असाच अन्याय होत राहील तर मग उग्र रुप धारण करून विराट स्वरुपाचा जनआंदोलन करून मुंबई, दिल्ली हालवण्यात येईल. यांची शासनाने गंभीर दखल घ्यावी असा इशारासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत राजेंद्र पटले यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)