शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

उन्हाळ्यात पाणीटंचाईचा करावा लागणार सामना

By admin | Updated: December 30, 2015 01:34 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्प, तलाव व बोड्यांमध्ये पाणी साठा झालाच नाही.

प्रकल्पात जलसाठा अत्यल्प : संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजनेची गरजसंजय साठवणे साकोलीयावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्प, तलाव व बोड्यांमध्ये पाणी साठा झालाच नाही. तर जमलेला जलसाठाही आता कमी झाला आहे. सद्यस्थितीला प्रकल्पात व तलावात फक्त १५ ते २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार हे नाकारता येत नाही. प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकूण लघु प्रकल्प ३१ आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. ३१ लघुप्रकल्पात सद्यस्थितीला जलसाठा हा २५ टक्के आहे. तर जुन्या माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा हा २९.९४ टक्के आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पामध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुडरी, लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी, रेंगेपार, कोढा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा, भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली, आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री यांचा समावेश आहे. हिवाळ्यात पाणीटंचाईचे संकेत दिसत असून येत आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्पसाठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळी धानपिक कसे काय होणार? जनावरांना पिण्याचे पाणी मिळणार काय? असा प्रश्न आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा झाला नाही. जो जलसाठा होता त्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी शेतीसाठी व इतर कामासाठी केला. त्यामुळे ऐन हिवाळ्यात प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, हिवरा, आमगाव, डोडमाझरी, मालीमार, चिखलपहेला, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा व कोका या १२ प्रकल्पामधील पाणीसाठा निरंक आहे.