शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी हंगाम संकटात, विजेचे संकट लय भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात  शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृषी फिडरला मिळणे दुरापास्त झाले आहे. वातावरणातील बदलामुळे एप्रिल महिन्यात मे हिट झाले आहे. पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : तापमान वाढताच विजेचे संकट वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन बिघडल्याने कृषी फिडरवर अत्यावश्यक अर्थात इमर्जन्सी भारनियमन सुरू झाले. परिणामी पुरेशा पाण्याअभावी उन्हाळी हंगाम संकटात सापडला आहे. रात्री वीजपुरवठा होत असल्याने अख्खी रात्र शेतकऱ्यांना जागून काढावी लागत आहे. बुधवारी तर अत्यावश्यक भारनियमनाच्या नावाखाली केवळ दोन ते तीन तासच वीज शेतकऱ्यांना मिळते.जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात  शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृषी फिडरला मिळणे दुरापास्त झाले आहे. वातावरणातील बदलामुळे एप्रिल महिन्यात मे हिट झाले आहे. पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात पिकांना पाणी अधिक लागत आहे. आठ तासाच्या विजेत शक्य तेवढे सिंचन करण्याचा प्रयत्न शेतकरी करतो आहे. मात्र नियमित असलेली आठ तास वीज सुद्धा मिळत नाही. अत्यावश्यक भारनियमनामुळे स्थानिक वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही काही चालत नाही. वास्तव परिस्थिती त्यांच्या लक्षात असूनही वरिष्ठांच्या आदेशापुढे त्यांना काही करता येत नाही. मात्र यात शेतकरी भरडला जात आहे, तेवढेच खरे! शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही घट होत असून सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी आहे.

शेतकऱ्यांच्याच माथी भारनियमन का?- राज्यात विजेचे संकट उभे झाल्याचे खुद्द वीज मंत्र्यांनीच सांगितले. तरीही भारनियमन होणार नसल्याची ग्वाही दिली होती; मात्र इमर्जन्सी भारनियमन करीत शेतकऱ्यांना विजेचा झटका दिलेला आहे. भारनियमन केवळ शेतकऱ्यांच्या माथी का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मात्र याबाबत कुणीही समाधानकारक उत्तर देत नाहीत.

वरिष्ठांच्या आदेशानुसार रात्री ३ वाजता अत्यावश्यक भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन नियमित नाही. तुटवड्यामुळे एखादवेळेस केले जाऊ शकते. कृषी फिडरच्या वेळापत्रकानुसारच शेतकऱ्यांना वीज मिळत आहे.-मयंक सिंग,  सहायक अभियंता, पालांदूर.

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती