शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

उन्हाळी हंगाम संकटात, विजेचे संकट लय भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात  शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृषी फिडरला मिळणे दुरापास्त झाले आहे. वातावरणातील बदलामुळे एप्रिल महिन्यात मे हिट झाले आहे. पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : तापमान वाढताच विजेचे संकट वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन बिघडल्याने कृषी फिडरवर अत्यावश्यक अर्थात इमर्जन्सी भारनियमन सुरू झाले. परिणामी पुरेशा पाण्याअभावी उन्हाळी हंगाम संकटात सापडला आहे. रात्री वीजपुरवठा होत असल्याने अख्खी रात्र शेतकऱ्यांना जागून काढावी लागत आहे. बुधवारी तर अत्यावश्यक भारनियमनाच्या नावाखाली केवळ दोन ते तीन तासच वीज शेतकऱ्यांना मिळते.जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात  शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृषी फिडरला मिळणे दुरापास्त झाले आहे. वातावरणातील बदलामुळे एप्रिल महिन्यात मे हिट झाले आहे. पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात पिकांना पाणी अधिक लागत आहे. आठ तासाच्या विजेत शक्य तेवढे सिंचन करण्याचा प्रयत्न शेतकरी करतो आहे. मात्र नियमित असलेली आठ तास वीज सुद्धा मिळत नाही. अत्यावश्यक भारनियमनामुळे स्थानिक वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही काही चालत नाही. वास्तव परिस्थिती त्यांच्या लक्षात असूनही वरिष्ठांच्या आदेशापुढे त्यांना काही करता येत नाही. मात्र यात शेतकरी भरडला जात आहे, तेवढेच खरे! शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही घट होत असून सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी आहे.

शेतकऱ्यांच्याच माथी भारनियमन का?- राज्यात विजेचे संकट उभे झाल्याचे खुद्द वीज मंत्र्यांनीच सांगितले. तरीही भारनियमन होणार नसल्याची ग्वाही दिली होती; मात्र इमर्जन्सी भारनियमन करीत शेतकऱ्यांना विजेचा झटका दिलेला आहे. भारनियमन केवळ शेतकऱ्यांच्या माथी का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मात्र याबाबत कुणीही समाधानकारक उत्तर देत नाहीत.

वरिष्ठांच्या आदेशानुसार रात्री ३ वाजता अत्यावश्यक भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन नियमित नाही. तुटवड्यामुळे एखादवेळेस केले जाऊ शकते. कृषी फिडरच्या वेळापत्रकानुसारच शेतकऱ्यांना वीज मिळत आहे.-मयंक सिंग,  सहायक अभियंता, पालांदूर.

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती