शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

उन्हाळी धान हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधान उत्पादकांचे नुकसान : उशीरा पेरणी शेतकऱ्यांना भोवली

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : उन्हाळी हंगामातील धानाची लागवड उशीरा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक पावसात अडकल्याचे वास्तव आहे. काही भागात सदर पीकाची कापणी व मळणीच पाण्यात सापडल्याने पिकाची ऊशिरा लागवड शेतकऱ्यांना चांगलीच भोवली असुन धानपिकाचे प्रचंड नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे.लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.ज्या भागात शासनाचे आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे अशा भागातील शेतकऱ्यांना धानाची केंद्रावर विक्री करतांना ‘पैसे द्या टोकण घ्या’ असे केंद्र चालकासह प्रशासनाकडुन पिळवणुकीचे धोरण अवलंबिले गेल्याची आरोपात्मक चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगु लागल्या आहेत.दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी ऊन्हाळी हंगामात धानाची ऊशिरा लागवड केल्याने पावसाळ्याचे दोन नक्षञ लोटण्याला अवघा आठवडा उरला आहे. अशातच ऐन पावसाळ्यात कापणी व मळणी झालेल्या धानासह शेतातील ऊभ्या धानपिकाची देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाणी होत असल्याचे म्हटले आहे.दरम्यान,पीक कर्ज घेऊन खरीप व ऊन्हाळी हंगामात शेती करणारा शेतकरी निसर्गाच्या प्रकोपात सापडल्याने ऊत्पादित धानाची हानी होत आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे व दुर्लक्षामुळे आधारभुत धान खरेदी केंद्र चालकांकडुन शेतकऱ्यांची बेसुमार लुट होत असल्याची देखील संतापजनक चर्चा आहे.याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन पावसाळ्यात अडकलेल्या ऊन्हाळी हंगामातील धान ऊत्पादक शेतकºयांची केंद्र चालकांकडुन होणारी पिळवणुक थांबविण्याहेतू उपाययोजना करावी, अशी मागणी पिडीत शेतकºयांनी केली आहे.धान पोतीही भिजलीअध्यार्हुन अधिक क्षेञातील ऊन्हाळी धानाची कापणी व मळणी आटोपली असतांना काही क्षेञातील धानपिक कापणी व मळणीवाचुन शिल्लक आहेत. कापणी व मळणी झालेले धानाची पोती शासनाने विहीत कालावधित आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु न केल्याने तसेही पावसाने धान पोती भिजल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगीतले.

टॅग्स :agricultureशेती