शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

पाण्याअभावी उन्हाळी धान पीक धोक्यात

By admin | Updated: April 4, 2015 00:11 IST

धानपिकाचे कोठार म्हणून पवनी तालुका प्रसिध्द आहे.

पालोरा (चौ.) : धानपिकाचे कोठार म्हणून पवनी तालुका प्रसिध्द आहे. या भागात सिंचनाची सोय असल्यामुळे या भागातील शेतकरी बारमाही धान पिकाचे उत्पादन घेत असतात. मात्र यावर्षी अल्प पाऊस पडल्यामुळे आतापासूनच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. अनेक मोटारपंप बंद पडल्या आहेत. उन्हाळी धानपिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. परीणामी उन्हाळी धान पिक धोक्यात आल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे.मागील वर्षी अल्प प्रमाणात पाणी पडल्यामुळे सर्वत्र धान पिक संकटात सापडले होते. सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र चौरास भागात याचा फटका कमी प्रमाणात पडला होता. पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे विहिरीतून पाणी बाहेर निघणे कमी झाले आहे. यावर्षी पवनी तालुक्यातील पालोरा, लोणारा, बाम्हणी, मोखारा, भेंडाळा, आजगाव, वलनी, शिमनाळा, सेंद्री, आकोट, चिचाळ परिसरात मागील वर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळी धान पिक जास्त प्रमाणात आहे. उन्हाळी पिक हातात येईल शेतकरी तारेवरची कसरत करावी लागत आहे.सुरुवातीलाच धानाचे पऱ्हे वातावरणामुळे जळाले होते. तरीही शेतकऱ्यांनी मागार न घेता उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. रोवणीला महिणा पूर्ण होत नाही. तर पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे पिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे. उन्हाळी धान पिकाला आतापासून पाणी पुरविणे अशक्य आहे. तर पुढे काय परिस्थिती राहील याबाबत अंदाज लावणे कठीण झाले आहे. पीक हातात येणार किंवा नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (वार्ताहर)भारनियमनाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ भारनियमनाचा खरा फटका चौरास भागातील शेतकऱ्यांवर पडत आहे. दिवसेंदिवस भारनियमन वाढत आहे. सद्याला ७ ते ८ तास थ्री फेस विद्युत पुरवठा मिळत आहे. पुढे भारनियमन वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी या चौरा भागात सिंचनाच्या सोईकरीता शेतकऱ्यानी कर्ज काढून विहिरी बनविल्या आहेत. मात्र भारनियमन वाढण्याच्या संकेताने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे. निसर्ग जगू देत नाही शासन मरु देत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली अनेकदा विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. पीक हातात येणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी आशा सोडली आहे.