शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

तर संस्था संचालकांवर येणार आत्महत्येची पाळी

By admin | Updated: September 12, 2015 00:40 IST

इंग्रजी माध्यम संस्था संचालकाना सरकार गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत आहे.

मेस्टाचे अधिवेशन : संजयराव तायडे पाटील यांचे प्रतिपादन भंडारा : इंग्रजी माध्यम संस्था संचालकाना सरकार गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत आहे. शिक्षणाचे उदारीकरण करण्याच्या नावावर दररोज नवीन नवीन कायदे आणि जी आर काढत आहेत. शासन स्तरावर येणारे नवीन कायदे हे शिक्षणाच्या हित साधणारे नाहीत. उलट शिक्षणाचे काम करणाऱ्यांना शिकवण्यापासून परावृत्त करणारे आहेत. २५ टक्के अंतर्गत तीन वर्षापासून शाळेला पैसा देण्यात आला नाही. पुर्विच स्वत: जवळचे पैसे खर्च करून सर्व सुविधा युक्त शिक्षण पुरवणाऱ्या शाळांना फिस बुडवणाऱ्याचा हिस्सा मोठा आहे. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यम शाळा व संचालकाचे २५ टक्के अंतर्गत देण्यात येणारी फिस शासनाने बुडवली. इंग्रजी माध्यम शाळा आर्थिक संकटात आल्या आहेत. एक दिवस शेतकऱ्याप्रमाणे इंग्रजी माध्यम संस्था संचालक आत्महत्या करतील, अशी स्थिती शासन निर्माण करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी केली आहे.महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टी असोसिएशन भंडाराचे जिल्हा अधिवेशन भंडारा येथील साखरकर सभागृहात घेण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन संघटनेच्या राज्य महिला संघटनेच्या अध्यक्ष जागृती धर्माधिकारी यांच्या हस्ते, संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांच्या अध्यक्षतेत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महासचिव राजेंद्र दायमा, राज्य उपाध्यक्ष डॉ. गजानन नारे, नागपूर विभाग प्रमुख गंगाणर नाकाडे, विदर्भ प्रमुख प्रमुख संजय कोचे, नागपूर, जिल्हा अध्यक्ष नाना सातपुते, आशिष पालीवाल, मेस्टा भंडाराचे महासचिव भास्कर उपाध्यक्ष मुरलीधर भर्रे, महिला आघाडी प्रमुख व जिल्हा उपाध्यक्ष नेहा खैरे, कोषाध्यक्ष राकेश गजभिये व जिल्हा अध्यक्ष सुनिल मेंढे उपस्थित होते.जिल्हास्तरीय अधिवेशनात अनेक ठराव एकमताने पारीत करण्यात आले. यात शैक्षणिक शुल्क ठरवण्याचा अधिकार शाळा संचालकांना त्यांच्या सुविधेनुसार देण्यात यावा, संस्था संचालक व कार्यरत कर्मचाऱ्याकरीता संरक्षण कायदा, आरटी एक्टमध्ये सुधारणा, २५ टक्के प्रवेशाचा तिढा सोडवून त्याचा मोबदला म्हणून देण्यात येणारे पैसे त्वरीत देण्यात यावे, फि बुडवणाऱ्या पालकानावर कारवाई, प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करावा असे एकूण १५ ठराव याप्रसंगी घेण्यात आले. सदर सर्व ठराव संघटनेच्या वतीने शासनाला सादर करण्यात येईल. यावर त्वरीत तोडगा न निघाल्यास मोठ आंदोलन उभारण्याचे ठरवण्यात आले. संचालन जिल्हा संघटनेचे संयोजक तथागत मेश्राम आणि आभार पालीवाल यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील १०० च्या वर संस्था संचालकानी हजेरी लावली होती. कार्यक्रमास जी.एन. टिचकुले, मनिष तिवारी, डॉ. नरेश पारधी, महेंद्र वैद्य, तुर्रम गोन्नाडे, मुकेश थानथराटे, थॉमस, पुष्पा पारधी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)