शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अवकाळी पावसाचा गहू, हरभरा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 21:58 IST

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळच्या सुमारास भंडारा शहरात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर वातावरणात दिवसभर गारवा होता.

ठळक मुद्देउत्पादनात तूट येण्याची शक्यता : कापणी केलेले रबीचे पीक संकटात, मळणीचे काम थांबविले

आॅनलाईन लोकमतभंडारा : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळच्या सुमारास भंडारा शहरात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर वातावरणात दिवसभर गारवा होता. या पावसामुळे हरभरा व गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतात उभ्या पिकासह कापणी झालेल्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.साकोली : मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व सकाळपासूनच अवकाळी पावसाने सुरूवात केली. वातावरणातील अनियमिततेमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दरवर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी गहू, चना, लाखोरी, उळीद, मुंग पिकांची लागवड केली. मात्र कापणीच्या वेळेवर पाऊस आल्याने शेतकºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पवनी : शेतात उभ्या पिकासह कापणी झालेल्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. खरीप हंगामात शेतकºयांनी गहु, चना, उडीद, मुंग, हरभरा, बाजरी, वाटाना यासारख्या अन्य पिकांची लागवड केली होती. पेरणीच्या सुरूवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले होती. पिक हातात आल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता हातात आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.लाखांदूर : चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाºया मोहरणा, खैरणा, डांभेविरली, विहीरगाव, खैरीपट, गवराळा, दोनाड, नांदेड, किरमटी, रोहणी, किरमटी परिसरातील शेतकºयांना अवकाली पावसाचा फटका बसला असून, कडधान्याची पिके पाण्याखाली सापडली आहेत.मोहाडी/ जांब : धान पिकाची रब्बी पिकामध्ये निघेल या आशेने शेतकºयांनी रब्बी पिकाची लागवड केली, परंतु तोंडावर आलेला रब्बी पिकाचे वादळी पावसाने नुकसान केली तरी शेतकºयांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.पालांदूर : फेब्रुवारीत अवकाळी पावसाने हजेरी लावत कडधान्याचे नुकसान केले तर काही ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. शुक्रवारच्या अवकाळी पावसाने गहू कापणी प्रभावित झाली असून हंगाम हप्ताभर पुढे ढकलला जाऊ शकतो. पावसामुळे हवेत गारवा असून तापमानात घसरले आहे. पालांदूर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने व्यापाºयांवर रिकामे राहण्याची वेळ आली. वातावरण आणखी किती दिवस असे राहील याची शेतकºयांना चिंता सतावू लागली आहे.आसगाव : शुक्रवारला सकाळपासून कुठे रिमझिम तर कुठे जोराच्या पावसामुळे शेतातील चुरणे, रब्बी पिकाची कापणी थांबविले. शेतामध्ये वाटाणा, गहू, चना, लाख, उळीद, मूग, जवस ही उभे पिके आहेत. या पिकांच्या कापणी केलेल्या कळपा शेतात पडल्या असून या पावसामुळे असेच वातावरण राहिले पिकाचे दाणे काळे पडून गुरांचा चारासुद्धा काळा पळणार आहे. या पावसाचा फटका गहू पिकाला बसणार आहे.