शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

अवकाळी पावसाचा गहू, हरभरा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 21:58 IST

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळच्या सुमारास भंडारा शहरात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर वातावरणात दिवसभर गारवा होता.

ठळक मुद्देउत्पादनात तूट येण्याची शक्यता : कापणी केलेले रबीचे पीक संकटात, मळणीचे काम थांबविले

आॅनलाईन लोकमतभंडारा : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळच्या सुमारास भंडारा शहरात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर वातावरणात दिवसभर गारवा होता. या पावसामुळे हरभरा व गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतात उभ्या पिकासह कापणी झालेल्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.साकोली : मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व सकाळपासूनच अवकाळी पावसाने सुरूवात केली. वातावरणातील अनियमिततेमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दरवर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी गहू, चना, लाखोरी, उळीद, मुंग पिकांची लागवड केली. मात्र कापणीच्या वेळेवर पाऊस आल्याने शेतकºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पवनी : शेतात उभ्या पिकासह कापणी झालेल्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. खरीप हंगामात शेतकºयांनी गहु, चना, उडीद, मुंग, हरभरा, बाजरी, वाटाना यासारख्या अन्य पिकांची लागवड केली होती. पेरणीच्या सुरूवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले होती. पिक हातात आल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता हातात आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.लाखांदूर : चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाºया मोहरणा, खैरणा, डांभेविरली, विहीरगाव, खैरीपट, गवराळा, दोनाड, नांदेड, किरमटी, रोहणी, किरमटी परिसरातील शेतकºयांना अवकाली पावसाचा फटका बसला असून, कडधान्याची पिके पाण्याखाली सापडली आहेत.मोहाडी/ जांब : धान पिकाची रब्बी पिकामध्ये निघेल या आशेने शेतकºयांनी रब्बी पिकाची लागवड केली, परंतु तोंडावर आलेला रब्बी पिकाचे वादळी पावसाने नुकसान केली तरी शेतकºयांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.पालांदूर : फेब्रुवारीत अवकाळी पावसाने हजेरी लावत कडधान्याचे नुकसान केले तर काही ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. शुक्रवारच्या अवकाळी पावसाने गहू कापणी प्रभावित झाली असून हंगाम हप्ताभर पुढे ढकलला जाऊ शकतो. पावसामुळे हवेत गारवा असून तापमानात घसरले आहे. पालांदूर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने व्यापाºयांवर रिकामे राहण्याची वेळ आली. वातावरण आणखी किती दिवस असे राहील याची शेतकºयांना चिंता सतावू लागली आहे.आसगाव : शुक्रवारला सकाळपासून कुठे रिमझिम तर कुठे जोराच्या पावसामुळे शेतातील चुरणे, रब्बी पिकाची कापणी थांबविले. शेतामध्ये वाटाणा, गहू, चना, लाख, उळीद, मूग, जवस ही उभे पिके आहेत. या पिकांच्या कापणी केलेल्या कळपा शेतात पडल्या असून या पावसामुळे असेच वातावरण राहिले पिकाचे दाणे काळे पडून गुरांचा चारासुद्धा काळा पळणार आहे. या पावसाचा फटका गहू पिकाला बसणार आहे.