शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

अवकाळी पावसाचा रबीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:09 IST

जिल्ह्यात गुरूवारपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच धान खरेदी केंद्रात पोत्यांमध्ये भरून ेठेवलेले शेकडो क्विंटल धान ओले झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. दुसरीकडे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेकडो क्विंटल धान पाण्यात : शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गुरूवारपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच धान खरेदी केंद्रात पोत्यांमध्ये भरून ेठेवलेले शेकडो क्विंटल धान ओले झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. दुसरीकडे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरीत गुरूवारपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मोहाडीत गारपिटीसह पाऊसही बरसला. या पावसामुळे गहू, हरभरा, उळीद, मुंग, लाखोरी यासह भाजीपाला पिकांची चांगलीच नासाडी झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.आसगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, अवकाली पावसामुळे आसगाव परिसरातील भाजीपाला पिकासह फळबागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. चना, वटाना, जवस, लाख, लाखोरी, पोपट या फुलवर्गीय पिकांना या अकाली पावसाचा जास्त फटका बसला आहे. जमीनित ओलावा वाढल्यामुळे काळणीयोग्य झालेल्या शेंगा काळ्या पडल्यामुळे गुरांचा चारासुद्धा महागण्याची शक्यता आहे.मासळ येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्यासुमारास मासळ परिसरात पाऊस बरसला. यात ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामातील पिकांना याचा फटका बसला आहे. परिणामी खरीपाचे उत्पादन समाधानकारक नसताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकºयांची चिंता वाढविली आहे.साकोली येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात मागील २४ तासात वादळी पावसाने हजेरी लावली.गुरूवार दुपारपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा पिकांवरही परिणाम जाणवला. गहू, हरभरा, भाजीपाला पिकांसह अन्य पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.६.२ मि.मी. पाऊसजिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी एकूण ६.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यात या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येते. शेतकºयांनी मदतीची मागणी केली आहे.