शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अवकाळी पावसाचा रबीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:09 IST

जिल्ह्यात गुरूवारपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच धान खरेदी केंद्रात पोत्यांमध्ये भरून ेठेवलेले शेकडो क्विंटल धान ओले झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. दुसरीकडे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेकडो क्विंटल धान पाण्यात : शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गुरूवारपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच धान खरेदी केंद्रात पोत्यांमध्ये भरून ेठेवलेले शेकडो क्विंटल धान ओले झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. दुसरीकडे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरीत गुरूवारपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मोहाडीत गारपिटीसह पाऊसही बरसला. या पावसामुळे गहू, हरभरा, उळीद, मुंग, लाखोरी यासह भाजीपाला पिकांची चांगलीच नासाडी झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.आसगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, अवकाली पावसामुळे आसगाव परिसरातील भाजीपाला पिकासह फळबागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. चना, वटाना, जवस, लाख, लाखोरी, पोपट या फुलवर्गीय पिकांना या अकाली पावसाचा जास्त फटका बसला आहे. जमीनित ओलावा वाढल्यामुळे काळणीयोग्य झालेल्या शेंगा काळ्या पडल्यामुळे गुरांचा चारासुद्धा महागण्याची शक्यता आहे.मासळ येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्यासुमारास मासळ परिसरात पाऊस बरसला. यात ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामातील पिकांना याचा फटका बसला आहे. परिणामी खरीपाचे उत्पादन समाधानकारक नसताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकºयांची चिंता वाढविली आहे.साकोली येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात मागील २४ तासात वादळी पावसाने हजेरी लावली.गुरूवार दुपारपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा पिकांवरही परिणाम जाणवला. गहू, हरभरा, भाजीपाला पिकांसह अन्य पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.६.२ मि.मी. पाऊसजिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी एकूण ६.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यात या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येते. शेतकºयांनी मदतीची मागणी केली आहे.