शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

मेहनत, चिकाटीमुळेच स्पर्धा परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:36 IST

केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही. या परीक्षांची तयारी मानसिकदृष्टया करणे गरजेचे असून परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पातळीवर स्वत:ला सिध्द करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मतदारजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही. या परीक्षांची तयारी मानसिकदृष्टया करणे गरजेचे असून परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पातळीवर स्वत:ला सिध्द करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सामाजिक न्याय विभाग भंडारा यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम तसेच निवडणूक विभागाच्या वतीने मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.केंद्रीय लोकसेवा परीक्षा पास होवून भंडारा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प या पदावर रुजु झालेले श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, गटविकास अधिकारी धीरज पाटील, राहूल काळे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाले की, प्रथम परीक्षेचा अभ्यास करा व नंतर परीक्षेसाठी अभ्यास करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना यश हमखास मिळेल हा विचार डोक्यात ठेवून तयारी न करता मेहनत आणि जिद्द डोक्यात ठेवून तयारी करावी. यश केव्हा मिळेल याची खात्री नसल्यामुळे नाउमेद न होता सातत्य व मनाचा दृढ संकल्पच यशाची शिखरे सर करु शकतात.प्रत्येकाने कर्तव्य भान जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी शासनाच्या अनेक संस्था आहेत. या संस्थांमध्ये परीक्षेची संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक स्तर महत्वाचा नसून मनाची तयारी महत्वाची असते. नियमित वाचन, भाषेवर प्रभुत्व, नोटस् काढणे, गट चर्चा याबाबी परीक्षा पास होण्यासाठी गरजेच्या आहेत.जिद्द, मेहनत, नियोजन, मानसिक तयारी , न्युनगंड न बाळगणे व स्वत:ला सिध्द करण्याचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते, असे उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.यावेळी बोलतांना उपजिल्हाधिकारी महिरे म्हणाले की, मेहनतीशिवाय स्पर्धा परीक्षेस पर्याय नाही. आपण ठरविलेले लक्ष गाठण्यासाठी नियमित अभ्यास व नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक न्यायभवनातील भंडारा शहरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.