शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अनाथांच्या जीवनात जागविले उमेदीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 00:50 IST

जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देताना आई, वडील, गुरूजन यासह आप्तस्वकियांचे पाठबळ व मार्गदर्शन लाभत असते.

समाजासमोर निर्माण केला आदर्श : पोलीस दादांच्या उपस्थितीत अभिनव उपक्रमइंद्रपाल कटकवार भंडाराजीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देताना आई, वडील, गुरूजन यासह आप्तस्वकियांचे पाठबळ व मार्गदर्शन लाभत असते. परंतु हा दुर्दम्य मार्गदर्शनाचे बळ प्रत्येकाच्या पाठीशी असेल असे नाही. धरणीवर जन्माला आले असले तरी अनाथ म्हणून जीवन जगणाऱ्या अनाथांच्या जीवनात दोन क्षण सुखाचे हे लाख मोलाचे असतात. असाच क्षण काल पोलीस दादांनी या अनाथांच्या जीवनात निर्माण केला. औचित्य होते फक्त व्यक्तीगत आनंदाचे. मात्र हा आनंद निरागस व अनाथांसोबत साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरात ‘बापू बाल अनाथगृह’ आहे. या अनाथालयात ६० मुले आणि ४० मुली आहेत. ही सर्व बालके १५ वर्षे वयोगटाआतील आहेत. जीर्ण झालेल्या इमारतीत ही बालके वास्तव्यात आहेत. स्वत:ची कामे स्वत: करणे, दानशुरांच्या देणगीवर अनाथालयाचा प्रपंच चालतो. आईची ममता व वडिलांची क्षमता या बालकांनी कधी अनुभवली नाही. अशा स्थितीत आनंदाच एक क्षण त्यांच्या जीवनात उमेदीच बळ देणार ठरते. भंडाराचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी कुटुंब व परिचितांसह या अनाथालयाला भेट देत व्यक्तिगत कार्यक्रम या अनाथांसोबत साजरा केला. पोलीस कोण असतात?, त्यांचे कार्य काय?, ते कुठे बसतात?, चोराला कसे पकडतात, अशी विविधांगी प्रश्नांचा भडिमार या बालकांनी उपस्थित करून पोलीस दादांना आपलसं करून घेतल. जयवंत चव्हाण यांनीही या बालकांच्या प्रश्नांना मनमोकळपणाने उत्तरे दिली. आपणही पोलीस अधिकारी व्हावे असा आत्मविश्वास या निरागसांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरगकर यांनीही बालकांना समाजातील चांगल्या वाईट गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. क्षमता प्रत्येकात असते, त्या क्षमतेला योग्य संधी वाट पाहावी लागते. यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी हिंमत हारू नये. अविरतपणे चालत राहणे हेच जीवन आहे, असा मौलिक संदेशही दुरगकर यांनी दिला. जयवंत चव्हाण यांनी सर्व बालकांना खेळण्याचे साहित्य वाटप करून भोजनाचा आनंद लुटला. याप्रसंगी बसंती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वर्मा, उपनिरीक्षक चव्हाण, नितीन दुरगकर, शैलेंद्र श्रीवास्तव, आशिष गोंडाणे, मयुर बिसेन, सरफराज खान, रंजीत उजवणे, प्रदीप ढबाले, नितीन कुथे, अनिल उजवणे, रवी नशिने, मुकेश मेश्राम, अमित नायर, विलास मोहनकर, मनोज श्रीवास्तव, भांडारकर आदींची उपस्थिती होती.