शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांच्या जीवनात जागविले उमेदीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 00:50 IST

जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देताना आई, वडील, गुरूजन यासह आप्तस्वकियांचे पाठबळ व मार्गदर्शन लाभत असते.

समाजासमोर निर्माण केला आदर्श : पोलीस दादांच्या उपस्थितीत अभिनव उपक्रमइंद्रपाल कटकवार भंडाराजीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देताना आई, वडील, गुरूजन यासह आप्तस्वकियांचे पाठबळ व मार्गदर्शन लाभत असते. परंतु हा दुर्दम्य मार्गदर्शनाचे बळ प्रत्येकाच्या पाठीशी असेल असे नाही. धरणीवर जन्माला आले असले तरी अनाथ म्हणून जीवन जगणाऱ्या अनाथांच्या जीवनात दोन क्षण सुखाचे हे लाख मोलाचे असतात. असाच क्षण काल पोलीस दादांनी या अनाथांच्या जीवनात निर्माण केला. औचित्य होते फक्त व्यक्तीगत आनंदाचे. मात्र हा आनंद निरागस व अनाथांसोबत साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरात ‘बापू बाल अनाथगृह’ आहे. या अनाथालयात ६० मुले आणि ४० मुली आहेत. ही सर्व बालके १५ वर्षे वयोगटाआतील आहेत. जीर्ण झालेल्या इमारतीत ही बालके वास्तव्यात आहेत. स्वत:ची कामे स्वत: करणे, दानशुरांच्या देणगीवर अनाथालयाचा प्रपंच चालतो. आईची ममता व वडिलांची क्षमता या बालकांनी कधी अनुभवली नाही. अशा स्थितीत आनंदाच एक क्षण त्यांच्या जीवनात उमेदीच बळ देणार ठरते. भंडाराचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी कुटुंब व परिचितांसह या अनाथालयाला भेट देत व्यक्तिगत कार्यक्रम या अनाथांसोबत साजरा केला. पोलीस कोण असतात?, त्यांचे कार्य काय?, ते कुठे बसतात?, चोराला कसे पकडतात, अशी विविधांगी प्रश्नांचा भडिमार या बालकांनी उपस्थित करून पोलीस दादांना आपलसं करून घेतल. जयवंत चव्हाण यांनीही या बालकांच्या प्रश्नांना मनमोकळपणाने उत्तरे दिली. आपणही पोलीस अधिकारी व्हावे असा आत्मविश्वास या निरागसांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरगकर यांनीही बालकांना समाजातील चांगल्या वाईट गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. क्षमता प्रत्येकात असते, त्या क्षमतेला योग्य संधी वाट पाहावी लागते. यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी हिंमत हारू नये. अविरतपणे चालत राहणे हेच जीवन आहे, असा मौलिक संदेशही दुरगकर यांनी दिला. जयवंत चव्हाण यांनी सर्व बालकांना खेळण्याचे साहित्य वाटप करून भोजनाचा आनंद लुटला. याप्रसंगी बसंती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वर्मा, उपनिरीक्षक चव्हाण, नितीन दुरगकर, शैलेंद्र श्रीवास्तव, आशिष गोंडाणे, मयुर बिसेन, सरफराज खान, रंजीत उजवणे, प्रदीप ढबाले, नितीन कुथे, अनिल उजवणे, रवी नशिने, मुकेश मेश्राम, अमित नायर, विलास मोहनकर, मनोज श्रीवास्तव, भांडारकर आदींची उपस्थिती होती.