शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

राज्यातील अनुदानित बालगृह धान्यांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 15:27 IST

देशभरात लॉकडाऊनने जीवनावश्यक वस्तु वगळता सर्व व्यवहार ठप्प आहे. या काळात कुणीही उपासी राहू नये, असे केंद्र सरकारतर्फे आवाहन करण्यात येत असले तरी राज्यातील ७१० अनुदानित बालगृहांचा वर्षभरापासून धान्यपुरवठा बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्दे४० हजार अनाथ निराधार व विधी संघर्षग्रस्तांना फटका

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशभरात लॉकडाऊनने जीवनावश्यक वस्तु वगळता सर्व व्यवहार ठप्प आहे. या काळात कुणीही उपासी राहू नये, असे केंद्र सरकारतर्फे आवाहन करण्यात येत असले तरी राज्यातील ७१० अनुदानित बालगृहांचा वर्षभरापासून धान्यपुरवठा बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामुळे ४० हजार अनाथ, निराधार व विधी संघर्षग्रस्तांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने अनाथ, निराधार समस्याग्रस्त व विधीसंघर्षग्रस्तांची काळजी व संरक्षण, शिक्षण व पुनर्वसन व्हावे म्हणून मुला-मुलींना बालगृहात दाखल केले जाते. राज्यात बालन्याय अधिनियम २००५ अंतर्गत अनुदानित ७१० बालगृहे आहेत. त्यात सहा ते १८ वयोगटातील जवळपास ४० हजार मुले, मुली राहतात. अनुदानित बालगृहांना शासनाकडून कोणतेही स्वतंत्र कर्मचारी, मानधन व इमारत भाडे मिळत नाही.केंद्र सरकार व राज्य शासनाने राज्यात अनुदानित बालगृहांना नारी निकेतन योजनेतून गहू व तांदूळ पुरवठा बंद केला आहे. वर्षभरापूर्वी शासनाकडून गहू ४.६५ रुपये व तांदूळ ६.३५ रुपये प्रती किलोप्रमाणे देण्यात येत होता. शासनाने लाभार्थ्यांना गत एक वर्षांपासून परिपोषण अनुदान दिलेला नसून अन्नधान्य पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गहू २५ रुपये, तांदूळ ३० रुपये प्रती किलो दराने बाजारातून घ्यावा लागत आहे. बाजारातून धान्य खरेदी करणे अनेक संस्थाना परवडणारे नाही. तसेच महागाईमुळे इतर खर्च करणे अवघड होत आहे. राज्यातील अनुदानित बालगृहाना पुर्वीप्रमाणे नारीनिकेतन योजनेतून अन्न पुरवठा त्वरित करण्यात यावा,अशी मागणी शासन मान्यता प्राप्त अनुदानित बालगृहातर्फे करण्यात आली आहे.धान्य पुरवठा दिला जात नसेल तर राज्यातील अनुदानित बालगृहामधील लाभार्थी शासकीय संस्थेत स्थलांतरीत करावे, बालगृहातील लाभार्थ्यांचे शिक्षण व पुनर्वसन शासनाने करावे.- डी. व्ही. बारमाटेसचिव, ब्ल्यू डायमंड सोशल वेल्फेअर संस्था, मोहाडी, जि. भंडारा

टॅग्स :Governmentसरकार