शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राज्यातील अनुदानित बालगृह धान्यांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 15:27 IST

देशभरात लॉकडाऊनने जीवनावश्यक वस्तु वगळता सर्व व्यवहार ठप्प आहे. या काळात कुणीही उपासी राहू नये, असे केंद्र सरकारतर्फे आवाहन करण्यात येत असले तरी राज्यातील ७१० अनुदानित बालगृहांचा वर्षभरापासून धान्यपुरवठा बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्दे४० हजार अनाथ निराधार व विधी संघर्षग्रस्तांना फटका

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशभरात लॉकडाऊनने जीवनावश्यक वस्तु वगळता सर्व व्यवहार ठप्प आहे. या काळात कुणीही उपासी राहू नये, असे केंद्र सरकारतर्फे आवाहन करण्यात येत असले तरी राज्यातील ७१० अनुदानित बालगृहांचा वर्षभरापासून धान्यपुरवठा बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामुळे ४० हजार अनाथ, निराधार व विधी संघर्षग्रस्तांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने अनाथ, निराधार समस्याग्रस्त व विधीसंघर्षग्रस्तांची काळजी व संरक्षण, शिक्षण व पुनर्वसन व्हावे म्हणून मुला-मुलींना बालगृहात दाखल केले जाते. राज्यात बालन्याय अधिनियम २००५ अंतर्गत अनुदानित ७१० बालगृहे आहेत. त्यात सहा ते १८ वयोगटातील जवळपास ४० हजार मुले, मुली राहतात. अनुदानित बालगृहांना शासनाकडून कोणतेही स्वतंत्र कर्मचारी, मानधन व इमारत भाडे मिळत नाही.केंद्र सरकार व राज्य शासनाने राज्यात अनुदानित बालगृहांना नारी निकेतन योजनेतून गहू व तांदूळ पुरवठा बंद केला आहे. वर्षभरापूर्वी शासनाकडून गहू ४.६५ रुपये व तांदूळ ६.३५ रुपये प्रती किलोप्रमाणे देण्यात येत होता. शासनाने लाभार्थ्यांना गत एक वर्षांपासून परिपोषण अनुदान दिलेला नसून अन्नधान्य पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गहू २५ रुपये, तांदूळ ३० रुपये प्रती किलो दराने बाजारातून घ्यावा लागत आहे. बाजारातून धान्य खरेदी करणे अनेक संस्थाना परवडणारे नाही. तसेच महागाईमुळे इतर खर्च करणे अवघड होत आहे. राज्यातील अनुदानित बालगृहाना पुर्वीप्रमाणे नारीनिकेतन योजनेतून अन्न पुरवठा त्वरित करण्यात यावा,अशी मागणी शासन मान्यता प्राप्त अनुदानित बालगृहातर्फे करण्यात आली आहे.धान्य पुरवठा दिला जात नसेल तर राज्यातील अनुदानित बालगृहामधील लाभार्थी शासकीय संस्थेत स्थलांतरीत करावे, बालगृहातील लाभार्थ्यांचे शिक्षण व पुनर्वसन शासनाने करावे.- डी. व्ही. बारमाटेसचिव, ब्ल्यू डायमंड सोशल वेल्फेअर संस्था, मोहाडी, जि. भंडारा

टॅग्स :Governmentसरकार