शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुभाषने फुलविली वांग्याची शेती

By admin | Updated: December 8, 2015 00:35 IST

एकीकडे रोजगाराच्या संधी नाहीत अशी ओरड आहे. परंतु जिद्द, परिश्रमाच्या भरवशावर तामसवाडी (सिहोरा) येथे सुभाष निशाने या युवकाने भाड्याने घेतलेल्या...

लोकमत शुभवर्तमान : जिद्द व परिश्रमाचे फलित, वार्षिक सात ते आठ लाखांचे उत्पादनमोहन भोयर तुमसरएकीकडे रोजगाराच्या संधी नाहीत अशी ओरड आहे. परंतु जिद्द, परिश्रमाच्या भरवशावर तामसवाडी (सिहोरा) येथे सुभाष निशाने या युवकाने भाड्याने घेतलेल्या १० एकर शेतात एका हंगामात सात लाखांची वांगी उत्पादन करण्याचा संकल्प केला आहे. ही वांगी मध्यप्रदेशातील बालाघाट व गोंदिया येथे विक्रीकरिता जात आहे. तिथे या वांग्याला प्रचंड मागणी आहे.सिंचनाची ओरड, बेरोजगारीची समस्या असताना रेंगेपार (पांजरा) येथील मॅट्रीक उत्तीर्ण सुभाष निशाने (३०) याने आपल्या जिद्दीवर परिश्रमाने १० एकरात वांग्याची शेत फुलविली आहे. याकरिता तामसवाडी (सि.) येथे वैनगंगा नदी काठावर त्यांनी बंडू काळे यांचेकडून १० एकर शेती सात वर्षाकरिता भाडे तत्वावर घेतली. सात वर्षात त्यांना काळे यांना सात लक्ष द्यावयाचे आहे. सुभाष यांची स्वत:ची शेती रेंगेपार (पांजरा) येथे आहे. तिथे त्यांनी सुमारे २० एकरात ऊस पीक लावले. ऊस पीक लावल्यानंतर रिकाम्या वेळात बागायती शेती करावी असे वाटले. त्याकरिता त्यांनी बागायती शेतीचा शोध घेतला. तामसवाडी येथे १४ एकर बागायती शेती मिळाली. पर्यावरणात बदलामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वांगी लावली तर होईल काय ही भीती सदैव मनात होती. परंतु डर के आगे जीत है. हे त्यांनी सार्थक करून दाखविले.१० एकरातील वांग्याला सुमारे चार ते साडेचार लक्ष खर्च आला. आतापर्यंत २४ ते २५ फवारण्या केल्या. एका फवारणीकरिता २२ हजारांचा खर्च त्यांना आला. वांग्याला आठ ते दहा दिवसातून एकदा पाणी द्यावे लागते. त्याकरिता शेतावर विहिर आहे. आतापर्यंत २ लक्ष ३५ हजाराची औषधीला खर्च आला.आठ दिवसातून एकदा वांगी तोडली जातात. याकरिता ३० ते ३२ महिलांना रोजगार प्राप्त होतो. आॅक्टोबर महिन्यापासून येथे वांग्याचे उत्पादनाला सुरुवात झाली. सुरुवातीला ३० रुपये किलोग्रॅम एवढा भाव होता. सध्या १५ रुपये किलोग्रॅम भाव सुरु आहे. यावर्षी वांग्याला मोठ्या प्रमाणात कीड लागली. त्याकरिता औषधी फवारणीवर मोठा खर्च करावा लागला असे सुभाषने सांगितले. कृषी विभागाने मार्गदर्शन लाभत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनेच शेती करणे सुरु आहे. फळबाग (बागायती) शेती वर्षातून सहा ते सात महिनेच केली जाते. वांगी पीक घेतल्यावर शेतीची मशागत करण्यात येते. तीन ते चार महिने हे पीक घेतले जाते. येथील वांगी परप्रांतात मध्यप्रदेशातील बालाघाट व महाराष्ट्रातील गोंदिया शहरात विक्रीकरिता पाठविले जातात. तिथे भाव जास्त असून रक्कम त्वरीत मिळते असे सुभाष यांनी सांगितले. तुमसर शहरात दलाली जास्त असल्याने येथे वांगी विक्री करीत नाही असे आवर्जून सांगितले. रुचकर, स्वादिष्ट वांगी तुमसरकरांना मिळत नाही याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. कृषी विभागाच्या ढिगभर योजना व ढिगभर कर्मचारी व अधिकारी आहेत. परंतु या युवा शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही.