शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बांधकामाची उपअभियंत्यांकडून चौकशी सुरू

By admin | Updated: June 3, 2016 00:40 IST

बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर - चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत

दखल ‘लोकमत’ची : प्रकरण बावनथडी प्रकल्पातील कामाचेविलास बन्सोड  उसर्रा बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर - चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची दैनिक ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच बावनथडी प्रकल्पाचे उपअभियंत्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी सुरु केली आहे.वन्यप्राण्यांना ये जा करण्यासाठी मुख्य कालव्यावर पुल बांधकाम करण्यात येत आहे. सदर पुलाचे बांधकाम गोंदिया येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले. सदर कंत्राटदार हा प्रकल्पातील काही अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने निकृष्ट साहित्याचा वापर करून पुलाचे बांधकाम सुरु आहे. यात कमी दर्जाच्या लोखंडाचा उपयोग करीत आहे. सिमेंट अल्प प्रमाणात घालत असून बांधकामावर पाणी टाकत नसल्याने कामाचा दर्जा पूर्णत: निकृष्ट झाला आहे, अशी तक्रार होती. विशेष म्हणजे नाल्यातील वाळूचा अवैधपणे चोरटी वाळूचा उपयोग सदर बांधकामात केला जात आहे. सदर बांधकाम बावनथडी धरणाच्या मुख्य कालव्यावर अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलेसूर व चिखली भागात बांधकाम सुरु आहे. या जंगलात कुणीही ये जा करत नसल्याने याचाच कंत्राटदाराने फायदा घेत निकृष्ट बांधकाम करत आहे. यासाठी बावनथडी प्रकल्पातील कनिष्ठ अभियंता यांच्या संगनमताने सदर निकृष्ट काम होत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. वृत्त प्रकाशित होताच संबंधित विभागाला जाग आली. बावनथडी प्रकल्पातील तुमसर येथील उपअभियंता यांनी याकडे लक्ष देवून तात्काळ चौकशी सुरु होणार असे सदर प्रतिनिधीस सांगितले. चौकशीअंती काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कंत्राटदारांचे धाबे दणाणलेलोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच उपअभियंत्यांनी चौकशी सुरु केली असून कंत्राटदार व यात समाविष्ट कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे. प्रकरण दाबण्यासाठी सावरासावर होत असल्याची माहिती आहे. प्रकरण अंगलट येईल म्हणून बांधकाम करणारे कंत्राटदार व कर्मचारी लॉबिंग करीत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. सध्या मुख्य कालव्यावर अन्य कंत्राटदारांची कामे सुरु आहेत. यात आउटलेट, व्ही.आर.बी., पुल व कालवे आदी कामे सुरु असून बाकी सर्व कंत्राटदारांनाही याचा फटका बसू शकतो, यात काही शंका नाही. आधीच बावनथडी प्रकल्पात अंदाजपत्रकाच्या किमतीपेक्षा कंत्राटदारांनी कमी दरानी कामे घेतल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामाचा दर्जा कमकुवत झाला आहे.