शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा डोंग्याने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:58 IST

एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.

ठळक मुद्देआवळीवासी विकासापासून वंचित : वैनगंगा, चुलबंद नदीमुळे बेटाचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.एकीकडे वैनगंगा तर दुसरीकडे चुलबंद अशा दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या आवळी गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त असल्याने या गावातील नागरीक स्वातंत्र्यपूर्व काळापासुन विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. आवळी हे गाव गटग्रामपंचायतीमध्ये येत असून सन १९६२ ला गट ग्रामपंचायत उदयास आली. आवळी आणी टेंभरी हे दोन गाव विहीरगावला जोडण्यात आले, गावाला बेटाचे स्वरुप प्राप्त असल्याने गावात पूर येत असतो. त्यामुळे गावाचे इंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र या मातीत रूजलेल्या पुर्वजांच्या आठवणी व गावावरच्या प्रेमामुळे काही लोक आजही आवळी येथे राहत आहेत.आवळी येथे आजपर्यत अनेक सरपंच व सदस्य होऊन गेले. तरी देखील गावाचा विकास होऊ शकला नाही. विहीरगाव येथे ग्रामपंचायतची ईमारत असल्याने वर्षातील आठ महिने आवळी वासियांना विहीरगावला येताना डोंग्याने प्रवास करावा लागतो. पावसातील चार महिने नागरीकांसह विद्यार्थ्यांना नरकयातना असतात.या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असुन पुढील शिक्षणाकरीता येथील विद्यार्थ्यांना सोनी, लाखांदूर, वडसा येथे जावे लागत असते, विद्यार्थ्यांसह येथील नागरीक दुचाकी, सायकल सोनीमध्ये ठेऊन, आवळी वरून चुलबंद नदी घाटापर्यत पायी येत असतात. रूग्नाला दवाखाण्यात उपचारासाठी वेळेवर नेता येत नाही त्यामुळे जिव गमवावा लागत असतो.आवळी गाव पुनर्वसीत असताना येथे ईतर कामांना मंजुरी देता येते. मग पुलाच्या कामासाठी का देता येत नाही? आपण सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून, आवळीच्या विकासासाठी प्रशासनाकडून आवळीवासीयांची पिळवणूक होत आहे. माजी खासदार नाना पटोले ग्रामस्थांच्या पाठिशी असल्यामुळे येथील लोक हिमतीने जीवन जगत आहेत. आ.काशिवार यांनी पुढाकार घेऊन पुलाचे काम पुर्ण करावे.- प्रणाली ठाकरे, जि.प. सदस्य.