शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा डोंग्याने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:58 IST

एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.

ठळक मुद्देआवळीवासी विकासापासून वंचित : वैनगंगा, चुलबंद नदीमुळे बेटाचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.एकीकडे वैनगंगा तर दुसरीकडे चुलबंद अशा दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या आवळी गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त असल्याने या गावातील नागरीक स्वातंत्र्यपूर्व काळापासुन विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. आवळी हे गाव गटग्रामपंचायतीमध्ये येत असून सन १९६२ ला गट ग्रामपंचायत उदयास आली. आवळी आणी टेंभरी हे दोन गाव विहीरगावला जोडण्यात आले, गावाला बेटाचे स्वरुप प्राप्त असल्याने गावात पूर येत असतो. त्यामुळे गावाचे इंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र या मातीत रूजलेल्या पुर्वजांच्या आठवणी व गावावरच्या प्रेमामुळे काही लोक आजही आवळी येथे राहत आहेत.आवळी येथे आजपर्यत अनेक सरपंच व सदस्य होऊन गेले. तरी देखील गावाचा विकास होऊ शकला नाही. विहीरगाव येथे ग्रामपंचायतची ईमारत असल्याने वर्षातील आठ महिने आवळी वासियांना विहीरगावला येताना डोंग्याने प्रवास करावा लागतो. पावसातील चार महिने नागरीकांसह विद्यार्थ्यांना नरकयातना असतात.या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असुन पुढील शिक्षणाकरीता येथील विद्यार्थ्यांना सोनी, लाखांदूर, वडसा येथे जावे लागत असते, विद्यार्थ्यांसह येथील नागरीक दुचाकी, सायकल सोनीमध्ये ठेऊन, आवळी वरून चुलबंद नदी घाटापर्यत पायी येत असतात. रूग्नाला दवाखाण्यात उपचारासाठी वेळेवर नेता येत नाही त्यामुळे जिव गमवावा लागत असतो.आवळी गाव पुनर्वसीत असताना येथे ईतर कामांना मंजुरी देता येते. मग पुलाच्या कामासाठी का देता येत नाही? आपण सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून, आवळीच्या विकासासाठी प्रशासनाकडून आवळीवासीयांची पिळवणूक होत आहे. माजी खासदार नाना पटोले ग्रामस्थांच्या पाठिशी असल्यामुळे येथील लोक हिमतीने जीवन जगत आहेत. आ.काशिवार यांनी पुढाकार घेऊन पुलाचे काम पुर्ण करावे.- प्रणाली ठाकरे, जि.प. सदस्य.