शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा डोंग्याने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:58 IST

एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.

ठळक मुद्देआवळीवासी विकासापासून वंचित : वैनगंगा, चुलबंद नदीमुळे बेटाचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.एकीकडे वैनगंगा तर दुसरीकडे चुलबंद अशा दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या आवळी गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त असल्याने या गावातील नागरीक स्वातंत्र्यपूर्व काळापासुन विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. आवळी हे गाव गटग्रामपंचायतीमध्ये येत असून सन १९६२ ला गट ग्रामपंचायत उदयास आली. आवळी आणी टेंभरी हे दोन गाव विहीरगावला जोडण्यात आले, गावाला बेटाचे स्वरुप प्राप्त असल्याने गावात पूर येत असतो. त्यामुळे गावाचे इंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र या मातीत रूजलेल्या पुर्वजांच्या आठवणी व गावावरच्या प्रेमामुळे काही लोक आजही आवळी येथे राहत आहेत.आवळी येथे आजपर्यत अनेक सरपंच व सदस्य होऊन गेले. तरी देखील गावाचा विकास होऊ शकला नाही. विहीरगाव येथे ग्रामपंचायतची ईमारत असल्याने वर्षातील आठ महिने आवळी वासियांना विहीरगावला येताना डोंग्याने प्रवास करावा लागतो. पावसातील चार महिने नागरीकांसह विद्यार्थ्यांना नरकयातना असतात.या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असुन पुढील शिक्षणाकरीता येथील विद्यार्थ्यांना सोनी, लाखांदूर, वडसा येथे जावे लागत असते, विद्यार्थ्यांसह येथील नागरीक दुचाकी, सायकल सोनीमध्ये ठेऊन, आवळी वरून चुलबंद नदी घाटापर्यत पायी येत असतात. रूग्नाला दवाखाण्यात उपचारासाठी वेळेवर नेता येत नाही त्यामुळे जिव गमवावा लागत असतो.आवळी गाव पुनर्वसीत असताना येथे ईतर कामांना मंजुरी देता येते. मग पुलाच्या कामासाठी का देता येत नाही? आपण सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून, आवळीच्या विकासासाठी प्रशासनाकडून आवळीवासीयांची पिळवणूक होत आहे. माजी खासदार नाना पटोले ग्रामस्थांच्या पाठिशी असल्यामुळे येथील लोक हिमतीने जीवन जगत आहेत. आ.काशिवार यांनी पुढाकार घेऊन पुलाचे काम पुर्ण करावे.- प्रणाली ठाकरे, जि.प. सदस्य.