शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे!

By admin | Updated: March 12, 2017 00:44 IST

सध्याचे युग स्पर्धेचे असून इंग्रजीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. विद्यार्थ्यांनाही इंग्रजी भाषेतूनच शिकविण्यात येत असल्याचे प्रमाण वाढले आहे.

बाळा काशीवार : खराशी येथील आनंद मेळावाभंडारा : सध्याचे युग स्पर्धेचे असून इंग्रजीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. विद्यार्थ्यांनाही इंग्रजी भाषेतूनच शिकविण्यात येत असल्याचे प्रमाण वाढले आहे. हे चांगले असले तरी प्रत्येकानी मातृभाषेचा गौरव करून विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे असे प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केले.खराशी जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी दिलीप वाघाये, मुख्याध्यापक मुबारक सय्यद, वसंत शेळके, सरपंच पुरुषोत्तम फटे, लिलाधर चेटुले, रत्नाकर नागलवाडे, थालीराम बावणे उपस्थित होते.यावेळी काशिवार म्हणाले, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविधांगी योजना आणल्या आहेत. खराशी जिल्हा परिषद शाळा शाळासिद्धी उपक्रमात राज्यात अग्रस्थानी असल्याने जिल्ह्यासाठी भूषणावह असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.पहिल्या दिवशी पालकांच्या विविध सांस्कृतिक, बौद्धीक व शारीरिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शाळेतील १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला खराशीसह ग्रामस्थांनीही उपस्थिती दर्शविली. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्वच्छता व शौचालयाचा वापर यासाठी विद्यार्थी व पालकांची प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. आनंद मेळाव्यात विविध वस्तू विक्रीस आणून खरी कमाई करण्याचा व खाद्यपदार्थ विक्री करून पाच हजार रुपयांची कमाई विद्यार्थ्यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या बौद्धीक, क्रीडा स्पर्धांबरोबरच अंगणवाडी, प्ले स्कुलच्या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. बक्षिस वितरण शिक्षक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विकास गायधने, राजेश सूर्यवंशी, राकेश चिचामे, भैय्या देशमुख, प्रकाश चाचेरे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षिस व पदके देऊन गौरविण्यात आले. मागील उपक्रमांची माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आली. यावेळी पालकांची संगीतखुर्ची, रस्सीखेच, कबड्डी, गीतगायन, नृत्य स्पर्धा घेण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी केले. संचालन सतीश चिंधालोरे यांनी तर आभार प्रदर्शन जयंत खंडाईत यांनी केले. कार्यक्रमाला राम चाचेरे, दुर्गा टेकाम, ललीता सेलोकर, सोनिका सूर्यवंशी, सुलभा मेश्राम, रेखा धोटे, सुजाता क्षीरसागर, दुधराम झलके, मालू आढोळे, यामिनी लांबकाने यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)