शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बससाठी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

भंडारा शहरात विविध गावातील हजारो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीची पास उपलब्ध करुन दिली जाते. सकाळसत्रात येणारे विद्यार्थी दुपारपर्यंत गावी जातात. परंतु, दुपारसत्रात येणारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतात.

ठळक मुद्देनियोजनशून्यतेचा फटका : स्वतंत्र बससेवा सुरु करण्याची पालकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ग्रामीण विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसेसमधून येत असतात. परंतु, संध्याकाळी परत जाताना बहुतांश थांब्यावर बसेस थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत थांब्यावरच ताटकळत असतात. एसटी विभागाच्या हेकेखोरपणामुळे ग्रामीण विद्यार्थी रात्री उशिरा आपल्या गावी पोहोचतात. हा प्रकार दररोजचाच झाला असून आमचा हा छळ कधी थांबणार, असा प्रश्न संतप्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.भंडारा शहरात विविध गावातील हजारो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीची पास उपलब्ध करुन दिली जाते. सकाळसत्रात येणारे विद्यार्थी दुपारपर्यंत गावी जातात. परंतु, दुपारसत्रात येणारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतात. याचे कारण जाणून घेण्यासाठी शहरातील काही बस थांब्याची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होणारा धक्कादायक प्रकार पुढे आला.भंडारा मुख्य बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसना जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव चौक, शास्त्री चौक, आयटीआय टाकळी याठिकाणी थांबा देण्यात आला आहे. या थांब्यावर संध्याकाळी विद्यार्थ्यांची तोबा गर्दी झालेली असते. बस येताच सर्व विद्यार्थी बसकडे धाव घेतात. अनेकदा बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने बसचालक थांब्यावर बस न थांबविता पुढे निघून जातात. तर विद्यार्थ्यांकडे पास असल्याने बस वाहक त्यांना बसमध्ये घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसºया बसची वाट पाहावी लागते. दुसरी बस येताच पुन्हा तोच प्रकार घडतो. असे करताना अंधार होऊनही विद्यार्थ्यांना बस मिळत नाही. एसटी महामंडळाच्या नियोजनशून्यतेचा फटका हजारो विद्यार्थ्यांना दररोज सहन करावा लागत आहे. रात्र होऊनही विद्यार्थी घरी पोहोचत नसल्याने त्यांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकत असतो. हा आमचा छळ आहे. एसटी विभागाने व लोकप्रतिनिधींनी आमच्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करावी, अशी एकच मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.बसेसची सोय करा, अन्यथा आंदोलनआपल्या शाळेत येणारे विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचतात काय? यावर संबंधित शाळा प्रशासन कधीच लक्ष देत नाहीत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची जबाबदारी आमची नाही, अशीच भूमिका अनेक शाळांनी घेतली आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाच्या या बेबंदशाहीबाबत त्यांना एकाही शाळेने जाब विचारला नाही. दरम्यान, सदर विद्यार्थ्यांसाठी पर्यायी बसेसची सोय करण्यात यावी, अशी मागणी विभाग नियंत्रकांकडे यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. परंतु, त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, समस्येत वाढ होत आहे. या विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पर्याय एसटी बसेसची सोय करण्यात यावी, अन्यथा एसटी महामंडळाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक बंटी मिश्रा यांनी दिला आहे.