शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

बससाठी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

भंडारा शहरात विविध गावातील हजारो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीची पास उपलब्ध करुन दिली जाते. सकाळसत्रात येणारे विद्यार्थी दुपारपर्यंत गावी जातात. परंतु, दुपारसत्रात येणारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतात.

ठळक मुद्देनियोजनशून्यतेचा फटका : स्वतंत्र बससेवा सुरु करण्याची पालकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ग्रामीण विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसेसमधून येत असतात. परंतु, संध्याकाळी परत जाताना बहुतांश थांब्यावर बसेस थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत थांब्यावरच ताटकळत असतात. एसटी विभागाच्या हेकेखोरपणामुळे ग्रामीण विद्यार्थी रात्री उशिरा आपल्या गावी पोहोचतात. हा प्रकार दररोजचाच झाला असून आमचा हा छळ कधी थांबणार, असा प्रश्न संतप्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.भंडारा शहरात विविध गावातील हजारो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीची पास उपलब्ध करुन दिली जाते. सकाळसत्रात येणारे विद्यार्थी दुपारपर्यंत गावी जातात. परंतु, दुपारसत्रात येणारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतात. याचे कारण जाणून घेण्यासाठी शहरातील काही बस थांब्याची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होणारा धक्कादायक प्रकार पुढे आला.भंडारा मुख्य बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसना जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव चौक, शास्त्री चौक, आयटीआय टाकळी याठिकाणी थांबा देण्यात आला आहे. या थांब्यावर संध्याकाळी विद्यार्थ्यांची तोबा गर्दी झालेली असते. बस येताच सर्व विद्यार्थी बसकडे धाव घेतात. अनेकदा बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने बसचालक थांब्यावर बस न थांबविता पुढे निघून जातात. तर विद्यार्थ्यांकडे पास असल्याने बस वाहक त्यांना बसमध्ये घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसºया बसची वाट पाहावी लागते. दुसरी बस येताच पुन्हा तोच प्रकार घडतो. असे करताना अंधार होऊनही विद्यार्थ्यांना बस मिळत नाही. एसटी महामंडळाच्या नियोजनशून्यतेचा फटका हजारो विद्यार्थ्यांना दररोज सहन करावा लागत आहे. रात्र होऊनही विद्यार्थी घरी पोहोचत नसल्याने त्यांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकत असतो. हा आमचा छळ आहे. एसटी विभागाने व लोकप्रतिनिधींनी आमच्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करावी, अशी एकच मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.बसेसची सोय करा, अन्यथा आंदोलनआपल्या शाळेत येणारे विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचतात काय? यावर संबंधित शाळा प्रशासन कधीच लक्ष देत नाहीत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची जबाबदारी आमची नाही, अशीच भूमिका अनेक शाळांनी घेतली आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाच्या या बेबंदशाहीबाबत त्यांना एकाही शाळेने जाब विचारला नाही. दरम्यान, सदर विद्यार्थ्यांसाठी पर्यायी बसेसची सोय करण्यात यावी, अशी मागणी विभाग नियंत्रकांकडे यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. परंतु, त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, समस्येत वाढ होत आहे. या विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पर्याय एसटी बसेसची सोय करण्यात यावी, अन्यथा एसटी महामंडळाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक बंटी मिश्रा यांनी दिला आहे.