शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जिल्हा कचेरीवर विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:10 IST

शिष्यवृत्ती ही आम्हाला मिळणारी भिक नसून आमच्या हक्काची आहे, असा ध्येयवाद बाळगून सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला.

ऑनलाईन लोकमतभंडारा : शिष्यवृत्ती ही आम्हाला मिळणारी भिक नसून आमच्या हक्काची आहे, असा ध्येयवाद बाळगून सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनाचे नेतृत्व शाम भालेराव दिगांबर रामटेके यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत १८६८ कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती रक्कमेचा अपहार तसेच शिष्यवृत्तीपासून लाखो विद्यार्थी वंचित असल्याच्या निषेधार्थ हा धडक मोर्चा काढण्यात आला होता. शिष्यवृत्तीमध्ये वेळोवेळी घट तसेच वाटप न झाल्याने आजपर्यंत ५० लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी यांच्या शिष्यवृत्तीत ३० टक्के पर्यंत कमी करण्यात आली. परिणामी शासनस्तरावर शिष्यवृत्ती योजना मोडीत काढत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत करण्यात आलेल्या मागण्याअंतर्गत, शिष्यवृत्ती भ्रष्टाचाराच्या गुन्हेगारांना अटक करुन त्यांना शासन करण्यात यावे, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची उत्पन्न मर्यादा पाच लाख पर्यंत वाढविण्यात यावी, ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील उत्पन्नमर्यादा पाच लाखापर्यंत वाढवावी, इबीएस प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा १० लाखापर्यंत वाढवावी, निर्वाह भत्ता दरमहा १५०० रुपये करावा, रखडलेली शिष्यवृत्ती देण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे.