शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

'त्या' विद्यार्थिनी वायू गळतीनेच बेशुद्ध

By admin | Updated: December 13, 2014 00:58 IST

एलोरा पेपर मिलमध्ये नऊ विद्यार्थिनी या वायू गळतीमुळेच बेशुद्ध पडल्या असल्याचे कारण रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

तुमसर : एलोरा पेपर मिलमध्ये नऊ विद्यार्थिनी या वायू गळतीमुळेच बेशुद्ध पडल्या असल्याचे कारण रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान या घटनेतील नऊही विद्यार्थिनी सुखरूप असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. ही घटना काल दि. ११ रोजी घडली होती.मोहाडी तालुक्यातील करडी येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर देव्हाडा येथे सुरू आहे. शिबिरादरम्यान गुरूवारी एलोरा पेपर मिलला विद्यार्थ्यांनी भेट दिली. यादरम्यान क्लोरीन वायुची गळती सुरू झाली. यात नऊ विद्यार्थिनींना भोवळ येवून त्या बेशुद्ध पडल्या. यात आशा केशवराव बिजेवार (१८), शिल्पा सदाशिव गोबाडे (१८), ज्योती भगवान भोयर (१८), निशिगंधा दिलीप धोटे (२१), उमा केवटराव हलमारे (२१), रोहिणी चित्तरंजन मेश्राम (२०), शीतल भोजराम माटे (१९), मोनिका यादवराव गायधने (२०), पुष्पा श्यामसुंदर रामटेके (१९) यांना सायंकाळी ६ वाजता तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या विद्यार्थिनीवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुळ दस्ताऐवजांवर ‘क्लोरीन वायू इन्फेक्शन’ असे नमूद केले तसेच २४ तास निरीक्षणात ठेवण्याचा अभिप्राय दिला. या दस्तऐवजांच्या प्रती लोकमतच्या हाती लागल्या आहेत. वायू गळती झाली नाहीएलोरा पेपर मिल प्रशासनाने करडी येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी आले होते. त्यांनी कागद प्रक्रियेची पाहणी केली, परंतु कारखान्यात क्लोरीन वायू गळतीचा इन्कार केला.श्रमामुळे प्रकृती बिघडलीदेव्हाडा येथे सदर महाविद्यालयाचे शिबिर सध्या सुरू आहे. महाविद्यालयाच्या प्राध्यापक मंडळीनी शिबिरस्थळी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या तथा सकाळी श्रमदान केल्याने त्यांना जास्त थकवा आला. त्यामुळे प्रकृती बिघडली म्हणून रुग्णालयात दाखल केले. वायु गळतीचा त्यांनीही इन्कार केला. एलोरा पेपर मिल व महाविद्यालय प्रशासनाने वायू गळती झाली नाही, असे सांगितले. उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी व संशोधनाचा विषय आहे, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)