शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची धानपीक वाचविण्यासाठी धडपड

By admin | Updated: April 11, 2016 00:27 IST

भंडारा जिल्ह्यातील चौरासचा भाग समृध्द समजला जातो. येथे पाण्याची गंगा वाहत होती. येथील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे.

डाव्या कालव्याचे भिजत घोंगडे : पाण्याची पातळी खालावली, कृषिपंप पडू लागले बंदखेमराज डोये आसगाव(चौ.)भंडारा जिल्ह्यातील चौरासचा भाग समृध्द समजला जातो. येथे पाण्याची गंगा वाहत होती. येथील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. मात्र शेतीसाठी पाणी असेल तर बाणी करता येते. असी पुरातन लोकांपासूनची म्हण आहे. वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यात चौरास भाग बसला आहे. त्यातच २८ वर्षापासून गोसेखुर्द धरणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. याला डावा आणि उजवा कालवा काढण्यात आला. धरणामुळे पाण्याचे झरे पूर्णत: बंद करण्यात आले. त्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल-खोल गेली. उजवा कालव्यांतर्गत काही किमी पर्यंत रब्बीचे उत्पादन घेण्याला सुरुवात झाली. मात्र डाव्या कालव्याचे काम चुकीच्या पध्दतीने केल्याने त्यांचे भिजत घोंगडे सुरु आहे. चौरासच्या विहिरी आटल्याने कृषि पंप बंद पडू लागले. शेवटच्या टप्प्यात असलेले धानपिक सुकण्याची वेळ आली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरलेले आहे.चौरासमधील आसगांव ते ढोलसर तसेच अन्य पट्यातील विहिरी आटल्याने कृषीपंप बंद पडत आहेत. आणखी पाणी लागेल या आशेने शेतकरी त्यावर काम करीत आहेत. परंतु आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल अशी परिस्थती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. बहुतेक धान पिक लोंबीवर आलेले आहे. शेवटच्या टप्प्यात कृषिपंप बंद पडत आहेत. कुठूनतरी पाणी पिकाला देण्याचा केविलवाना प्रयत्न शेतकरी करीत आहेत. अनेक एकर शेती शेतकऱ्यांनी पाण्याअभावी सोडावी लागत आहे. शेतकऱ्यांसाठी लढा देवून त्यांना मरु देणार नाही. असे आश्वासन देणारे शासन आता तर शेतकऱ्यांच्या उरावर येवून बसल्याची प्रचिती येत आहे.राष्ट्रीय प्रकल्प गोसुखर्द धरण तत्काळ पूर्ण करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी ‘डावा कालव्याबाबद’ गप्प का बसले आहेत? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. यात शेतकऱ्यांचे काय चुकत आहे. उराशी पाणी पण पाण्याविना मरण’ असेच म्हणण्याची पाळी आली आहे.ऐवढे होऊनही बांधकामासाठी म्हणजे विकास कामासाठी वाळूची गरज असल्याचे सांगून क्षमतेपेक्षा जास्त रेती उपसा अहोरात्र सुरुच आहे. भारत हा कृषी प्रधानदेश असतांना कृषी क्षेत्राकडे दुर्लक्षच होत असल्याचे वाळू लिलावावरुन लक्षात येत आहे. माती लागेपर्यंत वाळू उपसा म्हणजे शेतकऱ्यांसाठी घातकच पर्याय ठरत आहे.शेतकरी धानपिक वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नकरीत आहे. विहिरी आणखी खोलवर नेवून शेवटच्या टप्प्यात असलेले धान वाचविण्यासाठी धावपड करीत आहेत. मात्र हेही प्रयत्न तोडके पडत आहेत. गोसेखुर्द धरणाचा डावा कालवा सुरु झाला तर जमिनीत पाणी झिरपूर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तसेच डाव्या कालवा सुरु झाल्यास शेतकरी रब्बी धान पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करु शकतात. मात्र कंत्राटदारांकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करुन आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न केल्याने एकदा तयार झालेला डावा कालवा पुर्णत: उधळावा. आता दुसऱ्यांदा त्याच्या बांधकामाची प्रतिक्षा सुरु आहे. हाच धरण व कालवा शेतकऱ्यांसाठी मरणाचा प्रश्न ठरला आहे.शासन कागदावर योजना राबवितो मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नसल्याने शेवटचा नागरिक म्हणजेच खेड्यातील शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याचेच एक उदाहरण म्हणजे गोसेखुर्द धरण म्हणावे लागेल. धान पिकाच्या शेतीला भेगा पडल्याने शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी धान पिकांची आशा सोडावी लागत असल्याने पुन्हा शेतकरी कर्जाच्या खायीत लोटला जाईल.मात्र आणेवारीच्या चुकीच्या पध्दतीने जिल्ह्यातील चार तालुका वगळल्याने शेतकऱ्यांना शासनाप्रती तीव्र रोष उत्पन्नहोत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाचविण्यासाठी डावा कालवा तात्काळ सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.