शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

शेतकऱ्यांची धानपीक वाचविण्यासाठी धडपड

By admin | Updated: April 11, 2016 00:27 IST

भंडारा जिल्ह्यातील चौरासचा भाग समृध्द समजला जातो. येथे पाण्याची गंगा वाहत होती. येथील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे.

डाव्या कालव्याचे भिजत घोंगडे : पाण्याची पातळी खालावली, कृषिपंप पडू लागले बंदखेमराज डोये आसगाव(चौ.)भंडारा जिल्ह्यातील चौरासचा भाग समृध्द समजला जातो. येथे पाण्याची गंगा वाहत होती. येथील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. मात्र शेतीसाठी पाणी असेल तर बाणी करता येते. असी पुरातन लोकांपासूनची म्हण आहे. वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यात चौरास भाग बसला आहे. त्यातच २८ वर्षापासून गोसेखुर्द धरणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. याला डावा आणि उजवा कालवा काढण्यात आला. धरणामुळे पाण्याचे झरे पूर्णत: बंद करण्यात आले. त्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल-खोल गेली. उजवा कालव्यांतर्गत काही किमी पर्यंत रब्बीचे उत्पादन घेण्याला सुरुवात झाली. मात्र डाव्या कालव्याचे काम चुकीच्या पध्दतीने केल्याने त्यांचे भिजत घोंगडे सुरु आहे. चौरासच्या विहिरी आटल्याने कृषि पंप बंद पडू लागले. शेवटच्या टप्प्यात असलेले धानपिक सुकण्याची वेळ आली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरलेले आहे.चौरासमधील आसगांव ते ढोलसर तसेच अन्य पट्यातील विहिरी आटल्याने कृषीपंप बंद पडत आहेत. आणखी पाणी लागेल या आशेने शेतकरी त्यावर काम करीत आहेत. परंतु आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल अशी परिस्थती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. बहुतेक धान पिक लोंबीवर आलेले आहे. शेवटच्या टप्प्यात कृषिपंप बंद पडत आहेत. कुठूनतरी पाणी पिकाला देण्याचा केविलवाना प्रयत्न शेतकरी करीत आहेत. अनेक एकर शेती शेतकऱ्यांनी पाण्याअभावी सोडावी लागत आहे. शेतकऱ्यांसाठी लढा देवून त्यांना मरु देणार नाही. असे आश्वासन देणारे शासन आता तर शेतकऱ्यांच्या उरावर येवून बसल्याची प्रचिती येत आहे.राष्ट्रीय प्रकल्प गोसुखर्द धरण तत्काळ पूर्ण करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी ‘डावा कालव्याबाबद’ गप्प का बसले आहेत? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. यात शेतकऱ्यांचे काय चुकत आहे. उराशी पाणी पण पाण्याविना मरण’ असेच म्हणण्याची पाळी आली आहे.ऐवढे होऊनही बांधकामासाठी म्हणजे विकास कामासाठी वाळूची गरज असल्याचे सांगून क्षमतेपेक्षा जास्त रेती उपसा अहोरात्र सुरुच आहे. भारत हा कृषी प्रधानदेश असतांना कृषी क्षेत्राकडे दुर्लक्षच होत असल्याचे वाळू लिलावावरुन लक्षात येत आहे. माती लागेपर्यंत वाळू उपसा म्हणजे शेतकऱ्यांसाठी घातकच पर्याय ठरत आहे.शेतकरी धानपिक वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नकरीत आहे. विहिरी आणखी खोलवर नेवून शेवटच्या टप्प्यात असलेले धान वाचविण्यासाठी धावपड करीत आहेत. मात्र हेही प्रयत्न तोडके पडत आहेत. गोसेखुर्द धरणाचा डावा कालवा सुरु झाला तर जमिनीत पाणी झिरपूर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तसेच डाव्या कालवा सुरु झाल्यास शेतकरी रब्बी धान पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करु शकतात. मात्र कंत्राटदारांकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करुन आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न केल्याने एकदा तयार झालेला डावा कालवा पुर्णत: उधळावा. आता दुसऱ्यांदा त्याच्या बांधकामाची प्रतिक्षा सुरु आहे. हाच धरण व कालवा शेतकऱ्यांसाठी मरणाचा प्रश्न ठरला आहे.शासन कागदावर योजना राबवितो मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नसल्याने शेवटचा नागरिक म्हणजेच खेड्यातील शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याचेच एक उदाहरण म्हणजे गोसेखुर्द धरण म्हणावे लागेल. धान पिकाच्या शेतीला भेगा पडल्याने शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी धान पिकांची आशा सोडावी लागत असल्याने पुन्हा शेतकरी कर्जाच्या खायीत लोटला जाईल.मात्र आणेवारीच्या चुकीच्या पध्दतीने जिल्ह्यातील चार तालुका वगळल्याने शेतकऱ्यांना शासनाप्रती तीव्र रोष उत्पन्नहोत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाचविण्यासाठी डावा कालवा तात्काळ सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.