शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

विदर्भासाठी संघर्ष सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 22:29 IST

आदरातिथ्य करणे आपली संस्कृती आहे. शब्द पाळण्याची ताकद नेत्यांमध्ये नाही. मागण्या तशाच राहतात. घोषणा हवेतच विरतात. हिवाळी अधिवेशनात नागपूरला येऊन पर्यटन केले जाते. गुलाबी थंडीचा आस्वाद घेतला जातो.

ठळक मुद्देमोहाडीत पत्रपरिषद : ज्वाला धोटे यांचा निर्धार

लोकमत आॅनलाईनमोहाडी : आदरातिथ्य करणे आपली संस्कृती आहे. शब्द पाळण्याची ताकद नेत्यांमध्ये नाही. मागण्या तशाच राहतात. घोषणा हवेतच विरतात. हिवाळी अधिवेशनात नागपूरला येऊन पर्यटन केले जाते. गुलाबी थंडीचा आस्वाद घेतला जातो. अधिवेशन संपले की हात पुसत निघून जातात असा आरोप ज्वाला धोटे यांनी करत आता विदर्भासाठी संघर्ष चालूच राहणार, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.कान्हळगाव (सिर) येथे महिलांचे कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी त्या आल्या होत्या. मोहाडी येथील विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विदर्भासाठी लढणारे जांबुवंतराव धोटे यांची कन्या ज्वाला धोटे म्हणाल्या, सध्याचे सरकार मार्केटिंग करीत आहे. स्वप्न दाखवून भुरळ पाडत आहे. त्या स्वप्नांना आकार देणे व साकारणे महत्वाचे असते. पण ते होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या जाहीरनाम्यात विदर्भ वेगळा देऊ असे सांगितले गेले. विदर्भाच्या जनतेनेही साथ दिली. पण, सत्तेत येताच विदर्भावर बोलणे टाळले जात आहे.विदर्भाची निर्मिती होण्यासाठी जनतेची उत्साह स्फूर्ती शमली नाही. जांबुवंतरावांचे त्याग, बलिदान हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी पूंजी आहे. ते माझे आदर्श असून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत विदर्भाकरिता लढा दिला असे सांगून या आंदोलनात अनेकजण जुळले आहेत. विचारांनी वेगळा विदर्भ व्हावा. आता टायगरची सिंहगर्जना होतच राहील. संघर्ष आपल्या रक्तात आहे. विदर्भासाठी लढा राहणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले. आईकडून राजकारण शिकलो अन् रक्तातच समाजकारण आहे. माझ्या वडीलांनी सत्ता अन् पदाची पर्वा केली नाही. ते जनतेच्या भल्यासाठी लढत राहिले. मनसे, शिवसेना विदर्भासाठी विरोध करतात. पण हे ठरविणारे कोण असा प्रश्न करून वेगळ्या विदर्भासाठी जनताच ठरवेल. मंचावरून बोलणे सोपे असते. त्यासाठी त्याग, संघर्ष, बलिदान, उपोषणही करावी लागतात. आज विदर्भ बेरोजगारी, विदर्भासाठी लढत झुंजत आहे. आता रस्त्यावर सगळ्यांनी उतरले पाहिजे. बाहेरच्या पाहुण्यांनी खपवून घेणार नाही. विदर्भासाठी शासनापुढे झोळीही पसरविणार नाही, असेही ज्वाला धोटे यांनी ठणकावून सांगितले.कबड्डी खेळाबाबत बोलताना त्या म्हणाल्या कबड्डी शांत डोक्याचा खेळ आहे. या खेळात महिला समोर येत असल्याचा आनंद व्यक्त करीत शासनानी ग्रामीण भागातील खेळाडूंना सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आपण टेनीसपटू, बॅडमिंटन, कबड्डी आदी खेळात प्राविण्य मिळविले आहे, असे ज्वाला धोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी असलम खातमी, सरपंच मेघा उटाणे, उपसरपंच राजू उपरकर,अनुप उटाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.