शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

धानपीक वाचविण्यासाठी धडपड

By admin | Updated: October 7, 2014 23:29 IST

पवनी तालुक्यातील परिसरात धान पिकाला शेवटच्या पाण्याची अत्यंत गरज आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी भारनियमनाने त्रस्त झाले असून धान पिकाला शेवटचे पाणी देणे कठी झाले आहे.

पालोरा : पवनी तालुक्यातील परिसरात धान पिकाला शेवटच्या पाण्याची अत्यंत गरज आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी भारनियमनाने त्रस्त झाले असून धान पिकाला शेवटचे पाणी देणे कठी झाले आहे. निसर्गाने हुलकावणी दिल्याने शेतात भेगा पडल्या आहेत. एकदा तरी पाणी यावे म्हणून प्रत्येक शेतकरी डोळ्यात ेतेल टाकून वाट पाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणाहून इंजिनद्वारे पाणी देणे सुरू आहे. पीक वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करता पाण्याचा पुरवठा करीत आहे. अपघाताला आमंत्रण देऊन शेतपिकातील धान पीक वाचविण्यासाठी धावपळ सुरू आहे.यावर्षी अनेक शेतकऱ्यांचे रोवणी झाली नाही. पऱ्हे रोवणीकरिता आले मात्र पाऊस न आल्याने रोवणी खोळंबली होती. तालुक्यातील भुयार, मेंढेगाव, निष्ठी, आमगाव, निलज, बेटाळा परिसरात ५० टक्के पेक्षा कमी रोवणी झाली. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली त्या शेतकऱ्यांचे हलके जातीचे पीक असल्याने लोंबीवर आला आहे. पाणी नसल्यामुळे धानपीक संकटात सापडले आहेत. नाले, बोड्या तलाव यावर्षी पाण्याने भरले नाही. धान पिकाला कसे वाचवावे, अशा प्रश्नाच्या भडीमाराने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. यावर्षी १०० ते १५० रूपये मजुरी देऊन शेतकऱ्यांनी रोवणी केली. निंदन काढले, महागडे खत, औषधीचा वापर केला मात्र एका पाण्याने धानपीक धोक्यात आले आहे. (वार्ताहर)