शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

लोकसहभागाअभावी तंटामुक्त चळवळीला मरगळ

By admin | Updated: December 3, 2014 22:45 IST

शांततेतून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला भंडारा जिल्ह्यात मरगळ आल्याचे दिसत आहे. सुरूवातीलच्या काही वर्षात तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भंडारा : शांततेतून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला भंडारा जिल्ह्यात मरगळ आल्याचे दिसत आहे. सुरूवातीलच्या काही वर्षात तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु आता ही मरगळ आली आहे. मरगळ झटकण्यासाठी जनजागृतीची गरज असून तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्याची गरज आहे. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गावकऱ्यांनी मनापासून सहकार्य केले तरच पोलीस, महसूल व न्यायालयीन यंत्रणेवरील ताण कमी होईल. आपसातील प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी लोकन्यायालयाची संकल्पना देखील प्रभावी माध्यम ठरत आहे. विकास ही एक प्रक्रिया असून त्यासाठी राजकारण विरहित प्रयत्नांची गरज आहे. परंतु सर्वसामान्य ग्रामीण लोकांच्या समस्यांचे भांडवल करीत प्रस्थापितवर्ग त्यांचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक शोषण करीत असल्याने या शोषित ग्रामीण घटकांच्या वर्गामध्ये जोपर्यंत व्यक्तीगत क्षमता आणि वैचारिक परिवर्तन होत नाही. यासाठी व्यापक जनजागृतीच्या चळवळीची गरज आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा खर्च ठिक आहे पण दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जबाबदारी व समाजातील कार्याबद्दलची उजळणी तंटामुक्त समितीच्या सदस्यांमध्ये असली पाहिजे. तंटामुक्त समितीचे थाटात गठण केले जाते. मात्र जबाबदारीने कामे करताना दिसत नाही. परंतु याचे श्रेय पोलीस प्रशासन घेतानाचेही चित्र आहे. पोलीस प्रशासनावर कामाचा व्याप खूप असल्यामुळे तंटामुक्ती समितीकडे हव्या त्या प्रमाणात लक्ष पुरविले जात नाही. समिती सदस्य अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना शासनाकडून आलेले परिपत्रकसुद्धा नीट समजत नाही. पोलीस पाटलांची जवळपास तीच गत, त्यातच समितीचे पदाधिकारी राजकीय पक्षांशी संबंधित असतात. गावातील गटातटाच्या राजकारणामुळे अधिक तंटे निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पोलीस प्रशासनाकडून तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकांचे आयोजन होणे गरजेचे आहे. पदाधिकाऱ्यांना समाजाभिमूख प्रशिक्षण देवून तंटामुक्तीच्या कार्यात पारदर्शकता निर्माण करावी. तंटामुक्तीचे कार्य एन दोन दिवसांचे नसून सर्वांच्या पुढाकारानेच गावातील तंटे हद्दपार होऊ शकतील. या मोहिमेचे व्यापक यश केवळ लोकसहभागावरच अवलंबून असून त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मत अनेक जाणकारांकडून व्यक्त होत आहे हे मात्र खरे. (शहर प्रतिनिधी)