शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाअभावी तंटामुक्त चळवळीला मरगळ

By admin | Updated: December 3, 2014 22:45 IST

शांततेतून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला भंडारा जिल्ह्यात मरगळ आल्याचे दिसत आहे. सुरूवातीलच्या काही वर्षात तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भंडारा : शांततेतून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला भंडारा जिल्ह्यात मरगळ आल्याचे दिसत आहे. सुरूवातीलच्या काही वर्षात तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु आता ही मरगळ आली आहे. मरगळ झटकण्यासाठी जनजागृतीची गरज असून तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्याची गरज आहे. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गावकऱ्यांनी मनापासून सहकार्य केले तरच पोलीस, महसूल व न्यायालयीन यंत्रणेवरील ताण कमी होईल. आपसातील प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी लोकन्यायालयाची संकल्पना देखील प्रभावी माध्यम ठरत आहे. विकास ही एक प्रक्रिया असून त्यासाठी राजकारण विरहित प्रयत्नांची गरज आहे. परंतु सर्वसामान्य ग्रामीण लोकांच्या समस्यांचे भांडवल करीत प्रस्थापितवर्ग त्यांचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक शोषण करीत असल्याने या शोषित ग्रामीण घटकांच्या वर्गामध्ये जोपर्यंत व्यक्तीगत क्षमता आणि वैचारिक परिवर्तन होत नाही. यासाठी व्यापक जनजागृतीच्या चळवळीची गरज आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा खर्च ठिक आहे पण दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जबाबदारी व समाजातील कार्याबद्दलची उजळणी तंटामुक्त समितीच्या सदस्यांमध्ये असली पाहिजे. तंटामुक्त समितीचे थाटात गठण केले जाते. मात्र जबाबदारीने कामे करताना दिसत नाही. परंतु याचे श्रेय पोलीस प्रशासन घेतानाचेही चित्र आहे. पोलीस प्रशासनावर कामाचा व्याप खूप असल्यामुळे तंटामुक्ती समितीकडे हव्या त्या प्रमाणात लक्ष पुरविले जात नाही. समिती सदस्य अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना शासनाकडून आलेले परिपत्रकसुद्धा नीट समजत नाही. पोलीस पाटलांची जवळपास तीच गत, त्यातच समितीचे पदाधिकारी राजकीय पक्षांशी संबंधित असतात. गावातील गटातटाच्या राजकारणामुळे अधिक तंटे निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पोलीस प्रशासनाकडून तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकांचे आयोजन होणे गरजेचे आहे. पदाधिकाऱ्यांना समाजाभिमूख प्रशिक्षण देवून तंटामुक्तीच्या कार्यात पारदर्शकता निर्माण करावी. तंटामुक्तीचे कार्य एन दोन दिवसांचे नसून सर्वांच्या पुढाकारानेच गावातील तंटे हद्दपार होऊ शकतील. या मोहिमेचे व्यापक यश केवळ लोकसहभागावरच अवलंबून असून त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मत अनेक जाणकारांकडून व्यक्त होत आहे हे मात्र खरे. (शहर प्रतिनिधी)