शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

१३ वर्षांपासून १९८ अनुकंपा उमेदवारांचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:34 IST

शासनाच्या ५ फेब्रुवारी २०२० आणि ३० जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार ४५ दिवसांच्या आत भरतीप्रक्रिया राबविण्याचा शासनाने निर्णय दिला ...

शासनाच्या ५ फेब्रुवारी २०२० आणि ३० जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार ४५ दिवसांच्या आत भरतीप्रक्रिया राबविण्याचा शासनाने निर्णय दिला आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. १८ जानेवारी २०१९ ला अनुकंपाधारकांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत एक महिन्याच्या आत नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. गत तेरा वर्षांपासून १९८ उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याचा आरोप केला आहे.

शासकीय कर्मचारी नोकरीवर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका वारसाला अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्याचा शासन निर्णय आहे. मागील अनेक वर्षांपासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत असून या उमेदवारांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पदभरती करावी, अशी मागणी अध्यक्ष अश्विनी जांभूळकर, उपाध्यक्ष निराशा कहालकर, सचिव अश्विनी जिभकाटे, अश्विनी जीभकाटे, चंद्रकला फुंडे, संदीप बावनउके, जितेंद्र कांबळे, चेतन सेलोकर, महेश मस्के, उमेश डोंगरवार, सचिन भोयर, मुक्ता मेश्राम, मंगेश माकडे, राजकुमार टेकाम, अभिलाष आकरे, श्रीकांत गभने, सुरेंद्र चकोले, चैताली गराडे, विद्याधर डुंबरे, जितेंद्र दिघोरे, दिलीप नागरीकर, मनीष जगणे, धीरज रामटेके, संजय खंडाईत, संजय चौधरी, चारुशीला चौधरी, दीपक डेंगे यांच्यासह अन्य उमेदवारांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बॉक्स

राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांतील भरतीप्रक्रिया पूर्ण

राज्यातील इतर जिल्हा परिषदांमधील अनुकंपा उमेदवारांची भरतीप्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र, भंडारा जिल्हा परिषदेमधील भरतीप्रक्रिया अद्यापही रखडल्याची माहिती आहे. २९ मार्च २०२१ पर्यंत अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. तर ३० मार्च २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा अध्यक्ष अश्विनी जांभूळकर, उपाध्यक्ष निराशा कहालकर, सचिव अश्विनी जीभकाटे, चंद्रकला फुंडे यांच्यासह अन्य उमेदवारांनी दिला आहे.

बॉक्स

आणखी किती वर्षे संघर्ष करायचा ?

शासकीय कर्मचारी नोकरीवर असताना त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका वारसाला अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्याचा शासन निर्णय आहे. शासनाचा निर्णय असतानाही अनुकंपा उमेदवारांना नोकरीसाठी गेल्या १३ वर्षांपासून संघर्ष करावा लागतो आहे, ही एक शोकांतिका आहे. सर्वसामान्य घरातील कुटुंबातील ही मुले लवकर नियुक्ती होईल, या आशेने प्रशासन दरबारी येरझारा मारत आहेत. तरीही विलंब होत असल्याने आम्ही आणखी किती वर्षे संघर्ष करायचा सांगा, यातच आमचे वय निघून चालले आहे. आम्ही नोकरी किती वर्षे करायची, आमच्या कुटुंबाने कसे जगायचे, असा प्रश्न उमेदवारांनी प्रशासनाला केला आहे.