शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

१३ वर्षांपासून १९८ अनुकंपा उमेदवारांचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:34 IST

शासनाच्या ५ फेब्रुवारी २०२० आणि ३० जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार ४५ दिवसांच्या आत भरतीप्रक्रिया राबविण्याचा शासनाने निर्णय दिला ...

शासनाच्या ५ फेब्रुवारी २०२० आणि ३० जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार ४५ दिवसांच्या आत भरतीप्रक्रिया राबविण्याचा शासनाने निर्णय दिला आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. १८ जानेवारी २०१९ ला अनुकंपाधारकांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत एक महिन्याच्या आत नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. गत तेरा वर्षांपासून १९८ उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याचा आरोप केला आहे.

शासकीय कर्मचारी नोकरीवर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका वारसाला अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्याचा शासन निर्णय आहे. मागील अनेक वर्षांपासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत असून या उमेदवारांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पदभरती करावी, अशी मागणी अध्यक्ष अश्विनी जांभूळकर, उपाध्यक्ष निराशा कहालकर, सचिव अश्विनी जिभकाटे, अश्विनी जीभकाटे, चंद्रकला फुंडे, संदीप बावनउके, जितेंद्र कांबळे, चेतन सेलोकर, महेश मस्के, उमेश डोंगरवार, सचिन भोयर, मुक्ता मेश्राम, मंगेश माकडे, राजकुमार टेकाम, अभिलाष आकरे, श्रीकांत गभने, सुरेंद्र चकोले, चैताली गराडे, विद्याधर डुंबरे, जितेंद्र दिघोरे, दिलीप नागरीकर, मनीष जगणे, धीरज रामटेके, संजय खंडाईत, संजय चौधरी, चारुशीला चौधरी, दीपक डेंगे यांच्यासह अन्य उमेदवारांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बॉक्स

राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांतील भरतीप्रक्रिया पूर्ण

राज्यातील इतर जिल्हा परिषदांमधील अनुकंपा उमेदवारांची भरतीप्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र, भंडारा जिल्हा परिषदेमधील भरतीप्रक्रिया अद्यापही रखडल्याची माहिती आहे. २९ मार्च २०२१ पर्यंत अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. तर ३० मार्च २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा अध्यक्ष अश्विनी जांभूळकर, उपाध्यक्ष निराशा कहालकर, सचिव अश्विनी जीभकाटे, चंद्रकला फुंडे यांच्यासह अन्य उमेदवारांनी दिला आहे.

बॉक्स

आणखी किती वर्षे संघर्ष करायचा ?

शासकीय कर्मचारी नोकरीवर असताना त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका वारसाला अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्याचा शासन निर्णय आहे. शासनाचा निर्णय असतानाही अनुकंपा उमेदवारांना नोकरीसाठी गेल्या १३ वर्षांपासून संघर्ष करावा लागतो आहे, ही एक शोकांतिका आहे. सर्वसामान्य घरातील कुटुंबातील ही मुले लवकर नियुक्ती होईल, या आशेने प्रशासन दरबारी येरझारा मारत आहेत. तरीही विलंब होत असल्याने आम्ही आणखी किती वर्षे संघर्ष करायचा सांगा, यातच आमचे वय निघून चालले आहे. आम्ही नोकरी किती वर्षे करायची, आमच्या कुटुंबाने कसे जगायचे, असा प्रश्न उमेदवारांनी प्रशासनाला केला आहे.