शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जीर्ण इमारतींवर कारवाईबाबत हतबलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:50 IST

काही दिवसांपूर्वी मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचा बळी गेला. यानिमित्ताने पुन्हा धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आहे. भंडारा शहरातील नगर पालिका हद्दीत ४४ इमारती जीर्ण झाल्या असून आतून पोकळ झाल्या आहेत.

ठळक मुद्देजबाबदारी कुणाची ; मूळ मालकांचीही होतेय कुंचबणा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काही दिवसांपूर्वी मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचा बळी गेला. यानिमित्ताने पुन्हा धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आहे. भंडारा शहरातील नगर पालिका हद्दीत ४४ इमारती जीर्ण झाल्या असून आतून पोकळ झाल्या आहेत. पावसाळ्यात या इमारतींना खरा धोका असतो. या जीर्ण इमारतींच्या प्रश्नावर हात घालणार काय? असा प्रश्न निर्माण होतो. कारवाई करण्यात पालिका प्रशासन हतबल दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील जीर्ण व जर्जर झालेल्या इमारतीचा आकडा हा ५०० च्यावर असू शकतो. सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. अशा स्थितीत पालिका प्रशसनातर्फे दरवर्षी सर्व्हे करून अशा धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटीस पाठवून ती पाडण्याची सूचना केली जाते. यावर्षी पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. पालिकेने याबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.तज्ज्ञ काय म्हणतात?जिल्ह्यातील जीर्ण इमारतींची नोंद स्थानिक प्रशासनाकडे आहे. नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता, यावर वेळीच पाऊल उचलणे गरजेचे आहे. संततधार पावसामुळे नेरला येथील तीन घरे अंशत: कोसळली असून जिवीतहानी नाही.. -अभिषेक नामदास,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारापालिकेची भूमिकाभंडारा नगर पालिका हद्दीत ज्या जीर्ण व जर्जर इमारतींची नोंद झाली आहे, अशा इमारतींच्या मालकांना इमारत पाडण्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहेत. यासंदर्भात नागरिकांनचे सहकार्य मिळणे अंत्यत गरजचे आहे. त्याशिवाय समोरची कारवाई करणे जिकरीचे ठरत आहे.-आशिष गोंडाणे, उपाध्यक्ष, न.प. भंडारा.धोकादायक इमारतींचे पुढे काय?भंडारा शहरात धोकादायक इमारतींची संख्या कमी नाही. बºयाच इमारती या आपसी वादामुळे पालिकेच्या नोटीस नंतरही पाडता आल्या नाहीत. इमारती जीर्ण असल्याने ती पडल्यावर जीवीतहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होतो. मुंबईतील घटनेनंतरही स्थानिक प्रशासनाने सावध पवित्रा घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.