शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
3
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
4
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
5
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
6
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
7
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
8
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
9
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
10
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
11
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
12
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
13
Astrology Predictions 2026 : ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
15
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
16
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
17
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
18
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
19
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
20
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण इमारतींवर कारवाईबाबत हतबलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:50 IST

काही दिवसांपूर्वी मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचा बळी गेला. यानिमित्ताने पुन्हा धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आहे. भंडारा शहरातील नगर पालिका हद्दीत ४४ इमारती जीर्ण झाल्या असून आतून पोकळ झाल्या आहेत.

ठळक मुद्देजबाबदारी कुणाची ; मूळ मालकांचीही होतेय कुंचबणा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काही दिवसांपूर्वी मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचा बळी गेला. यानिमित्ताने पुन्हा धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आहे. भंडारा शहरातील नगर पालिका हद्दीत ४४ इमारती जीर्ण झाल्या असून आतून पोकळ झाल्या आहेत. पावसाळ्यात या इमारतींना खरा धोका असतो. या जीर्ण इमारतींच्या प्रश्नावर हात घालणार काय? असा प्रश्न निर्माण होतो. कारवाई करण्यात पालिका प्रशासन हतबल दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील जीर्ण व जर्जर झालेल्या इमारतीचा आकडा हा ५०० च्यावर असू शकतो. सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. अशा स्थितीत पालिका प्रशसनातर्फे दरवर्षी सर्व्हे करून अशा धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटीस पाठवून ती पाडण्याची सूचना केली जाते. यावर्षी पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. पालिकेने याबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.तज्ज्ञ काय म्हणतात?जिल्ह्यातील जीर्ण इमारतींची नोंद स्थानिक प्रशासनाकडे आहे. नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता, यावर वेळीच पाऊल उचलणे गरजेचे आहे. संततधार पावसामुळे नेरला येथील तीन घरे अंशत: कोसळली असून जिवीतहानी नाही.. -अभिषेक नामदास,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारापालिकेची भूमिकाभंडारा नगर पालिका हद्दीत ज्या जीर्ण व जर्जर इमारतींची नोंद झाली आहे, अशा इमारतींच्या मालकांना इमारत पाडण्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहेत. यासंदर्भात नागरिकांनचे सहकार्य मिळणे अंत्यत गरजचे आहे. त्याशिवाय समोरची कारवाई करणे जिकरीचे ठरत आहे.-आशिष गोंडाणे, उपाध्यक्ष, न.प. भंडारा.धोकादायक इमारतींचे पुढे काय?भंडारा शहरात धोकादायक इमारतींची संख्या कमी नाही. बºयाच इमारती या आपसी वादामुळे पालिकेच्या नोटीस नंतरही पाडता आल्या नाहीत. इमारती जीर्ण असल्याने ती पडल्यावर जीवीतहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होतो. मुंबईतील घटनेनंतरही स्थानिक प्रशासनाने सावध पवित्रा घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.