शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लोकसेवा हमी हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांसाठी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, ...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांसाठी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, अर्चना यादव पोळ, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, मनीषा दांडगे, तहसीलदार साहेबराव राठोड व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना विहित वेळेत व पूर्ण कार्यक्षमतेने शासकीय सेवा देण्यासाठी २८ एप्रिल २०१५ रोजी लोकसेवा हक्क अधिनियम हा कायदा राज्यात अमलात आला आहे. या कायद्यात राज्य शासनाच्या ३७ विभागांच्या ४०९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. अधिसूचित सेवा नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने विहित कालमर्यादेत प्रदान करण्याची जबाबदारी त्या त्या विभागाची आहे. अद्यापही काही विभाग या बाबी कटाक्षाने पाळत नाहीत. यासाठीच आजचे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

लोकसेवा हमी कायद्यात संदर्भीत करण्यात आलेल्या सेवांची माहिती आपले सरकार पोर्टलवर देण्यात आली आहे. हव्या असलेल्या सेवेसाठी नागरिक या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. प्राप्त अर्ज विहित वेळेत निकाली काढण्याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांची आहे. ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. विहित कालावधीत सेवा देण्यास कसूर केल्यास कायद्यात शास्तीची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. प्राप्त अर्ज नाकारताना सबळ कारण नमूद करणे बंधनकारक आहे.

नागरिकांना वेळेत सेवा प्रदान करणे, हे आपले कर्तव्य असून यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून जास्तीतजास्त सेवा लोकांना घरपोच देण्याचे धोरण ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अशा बाबी आयोगाला अपेक्षितसुद्धा आहेत, असे ते म्हणाले. लोकसेवा हमी हक्क कायद्याची सविस्तर माहिती महाऑनलाइनचे समन्वयक राकेश हिवरे यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी प्रशिक्षणार्थींना कायद्याबाबत मार्गदर्शन केले.

बॉक्स

कार्यालयात सेवांचा फलक लावा

लोकसेवा हमी हक्क कायद्यात अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांचा फलक प्रत्येक कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात यावा. त्यावर सेवा कालावधी व अपीलिय अधिकारी यांचे नाव व पत्ता नमूद करावा, अशी सूचना त्यांनी केली. या कायद्यातील सगळ्या सेवा ऑनलाइन प्रदान करावयाच्या असल्याने प्रत्येक विभागाने आपला डॅशबोर्ड नियमितपणे तपासावा. अर्ज प्रलंबित न ठेवता वेळेत निपटारा करा, असे जिल्हाधिकारी म्हणाले. या कायद्याचा वापर करून उत्कृष्ट सेवा प्रदान करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन बक्षीस देण्याची तरतूद या कायद्यात आहे.