शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कथा ही सदैव आपल्या सोबतच असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

भंडारा : कथा ही आपल्या जगण्याबरोबरच जन्मते आणि आपणासोबतच रात्री निद्रेच्या अधीन होते. कथा भूतकाळात होती, भविष्यातही असेल आणि ...

भंडारा : कथा ही आपल्या जगण्याबरोबरच जन्मते आणि आपणासोबतच रात्री निद्रेच्या अधीन होते. कथा भूतकाळात होती, भविष्यातही असेल आणि वर्तमानातसुद्धा सोबतच आहे, असे प्रतिपादन डॉ. विजया मारोतराव यांनी केले.

त्या काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित ‘कथा कशी स्फुरते?’ व ‘पडद्यामागील व पडद्यावरील तान्हाजी’ या ऑनलाईन व्याख्यानांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. गुगल मीटद्वारे झालेल्या सदर कार्यक्रमाचे नागपूरच्या सुप्रसिद्ध कथालेखिका, साहित्यिक, व्याख्यात्या डॉ. विजया मारोटकर यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज डॉ. शीतल मालुसरे होत्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके, महासचिव कालिदास चवडेकर, सहसचिव दीपक सपकाळ, व्याकरण मंचचे अध्यक्ष चारुदत्त मेहरे व संस्थेचे राज्य पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. ‘कथा कशी स्फुरते?’ या व्याख्यानाचे प्रथम पुष्प गुंफताना त्यांनी कथेविषयीच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

यावेळी डॉ. शीतल मालुसरे यांनी ‘शिवरायांची सावली बनून जगणारा त्यांचा सखासोबती मावळा तान्हाजी हा अफलातून खरा शूरवीर योद्धा होता.’ अशा स्फूर्तिदायक व ऐतिहासिक प्रसंगाचे दाखले देत सहभागी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन काव्यप्रेमी नागपूर विभागाच्या अध्यक्षा कविता कठाणे यांनी केले होते. स्वागतगीत पूनम डहाके यांनी तर संचालन डॉ. जयश्री सातोकर व मंगला डहाके यांनी केले. प्रास्ताविक कविता कठाणे यांनी तर आभार किशोर चलाख यांनी मानले. कार्यक्रमात निशा खापरे, विजेता चन्नेकर, स्वाती रुद्र, कविता दाते, प्रगती सोनटक्के, निरज अत्राम उपस्थित होते.