शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे शेतकरी अडकला चक्रव्यूहात

By admin | Updated: March 6, 2016 00:12 IST

जिल्ह्यात २६ व २९ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह अकाली पावसाने हजेरी लावली.

शेतकरी हवालदिल : कृषी विभाग म्हणतो, नुकसान नाही आणि खासदार म्हणतात, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यादेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात २६ व २९ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह अकाली पावसाने हजेरी लावली. पावसाच्या तडाख्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना कृषी विभाग नुकसान निरंक असल्याचे सांगत आहे. तर, खासदार नाना पटोले नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करीत आहे. यावरुन शेतकरी हा शासन व प्रशासनाच्या चक्रव्युहात कसा अडकतो, याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल.भंडारा जिल्ह्यात मागील शुक्रवारी व सोमवारी अकाली पावसाने अवकाळी हजेरी लावली. या शेतकरी हताश झाला आहे. उडीद, मुग, लाख, लाखोळी, वाटाना, हरभरा, गहू आदी रबी पिकांच्या कापणीचा हंगाम जोमात सुरु आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात या रब्बी पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत. काहींचे या पिकांचे ढिग जमा झाले आहेत. दोन दिवस अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतात पसरलेल्या कडपा आणि जमा झालेल्या ढिगांमध्ये पाणी शिरले असून ही पिके सडण्याच्या मार्गावर आहेत. जमा झालेल्या पिकांच्या ढिगांवर पॉलीथीन, ताडपत्री झाकून पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तरीही पिकामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अकाली पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे 'टेंशन' वाढले आहे. असे असतानाही कृषी खात्याचे अधिकारी जिल्ह्यात पिकाचे नुकसान नाही, असे सांगत आहेत. विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पवनी तालुक्यातील खैरी दिवाण शेतशिवारात वीज कोसळून २२ शेळ्यांचा मृत्यू झाला. घरावरचे छत उडाले. विटाभट्ट्याचे अनेकांचे नुकसान झाले. मात्र कृषी विभाग रबी पिकाचे नुकसान झालेले नाही. नुकसान निरंक आहे, असे म्हणणे तर्कसंगत नाही. ४३ हजार हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणीयावर्षी कृषी विभागाने ४५,११५ हेक्टर क्षेत्र रबी पिकांसाठी निर्धारित केले. शेतकऱ्यांनी ९५.१२ टक्के पेरणी पूर्ण केलीे. ४२,९११ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. यामध्ये १२२.४१ टक्के लाखोळी तर १४० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली. ११० टक्क्यामध्ये हरभरा तर ८७ टक्क्यांमध्ये गव्हाची पेरणी झाली. मात्र वातावरण बदल व अकाली पावसाामुळे रबी पीके धोक्यात असून शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.भंडारा जिल्ह्यात दोन दिवस पावसाने हजेरी लावली. मात्र शेतपिकाचे नुकसान झालेले नाही. तालुकास्तरावरुन नुकसान झाले नसल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नुकसान निरंक आहे.- नलिनी भोयरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी