शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

वादळी पावसाने धानपिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 21:26 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मोहाडी तालुका वगळता परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. यात धानपिकाची नासाडी झाली आहे.

ठळक मुद्देकडपाही भिजल्या : किडीचा प्रादुर्भाव वाढला, मोहाडी तालुक्यात पावसाची पिछेहाट, आतापर्यंत फक्त ६५ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मोहाडी तालुका वगळता परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. यात धानपिकाची नासाडी झाली आहे. धान गर्भार अवस्थेत असल्याने पाण्याची गरज होती, हे सत्य असले तरी तरी वादळी वारा व पावसाच्या तडाख्याने काही ठकाणी धानपिक जमीनदोस्त झाल्याने पुन्हा बळीराजाची चिंता वाढली आहे.भंडारा शहरातही दुपारच्या सुमारास हजेरी लावली. ऊन व सावलीच्या खेळात मात्र आजारालाही खत मिळत आहे. तालुक्यात १४.८ मि.मी पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली.लाखनी/पालांदूर : तालुक्यातील पालांदूर परीसरात विजांच्या कडकडाटांसह पावसाने दमदार हजेरी लावल्याने धानपिकाचे नुकसान झाले. धान भुईसपाट झाले. यात शेतकºयाचे सुमार नुकसान झाले. पावसापासून पीक वाचविण्याकरिता शेतकºयांचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे. धानपीक मातीमोल होत असल्याचे पाहून बळीराजाचा जीव कासावीस झाला आहे. अनेक अडचणींचा सामना करीत ९८ टक्के रोवणी कशीबशी पार पाडीत गणेशचतुर्थीचा मुहूर्त लागला. धान फुटण्यावर येत नाही तर पुन्हा पावसाने दीेर्घ विश्रांती घेतली. याच काळात खोडकिडी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. खर्च वाढतच आहे. नदीनाल्या काठावरील पिके अधिकच प्रभावीत झाली आहे. नरादा, मºहेगाव, पाथरी, वाकल आदी गावातील धान कापणी योग्य झाली असून काही ठिकाणी कडपा ओल्या आहेत.साकोली : तालुक्यात काही ठिकाणी पासवाने हजेरी लावली. पहाटेच्या सुमारास पाऊस बरसला. मात्र त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे अशा वातावरणामुळे धानावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.मोहाडी : तालुक्यातील शेतकºयांना सिंचनासाठी पाण्ळाची गरज असताना परतीच्या पावसाने काी प्रमाणात हुलकावणी दिली आहे. धान गर्भार अवस्थेत असल्याने एका पाण्याची गरज आहे. ढग जमले पण बसरले नाही, अशी स्थिती पाहायला मिळालीतुमसर : शहरात परतीच्या पावसाने हजेरी लावली मात्र तालुक्यात सर्वदूर पाऊस बरसला नाही. मागील २४ तासात १.२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.पवनी : तालुक्यातील चौरास भागात पावसाने वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावल्याने धानपिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली त्यानंतर सायंकाळपर्यत पाऊस बरसला नाही. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे.आसगाव चौ. : वादळी पावसाने बहुतांशी धान पिक भुईसपाट झाल्याने पिक मातीमोल होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच नेहमीप्रमाणे यंदाही असमतोल वातावरणामुळे धानावर किड तुडतुड्याने आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. धान पिक जमीनीवर लोटल्याने उत्पादनावर ५० टक्के नुकसान होणार असल्याचे शेतकºयांचे मत आहे. असाच वातावरण जर आठवड्याभर राहिल्यास व त्यातच आणखी पावसाने हजेरी लावल्यास अपेक्षेपेक्षा जास्तच उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.