शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

वादळी पावसाने धानपिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 21:26 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मोहाडी तालुका वगळता परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. यात धानपिकाची नासाडी झाली आहे.

ठळक मुद्देकडपाही भिजल्या : किडीचा प्रादुर्भाव वाढला, मोहाडी तालुक्यात पावसाची पिछेहाट, आतापर्यंत फक्त ६५ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मोहाडी तालुका वगळता परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. यात धानपिकाची नासाडी झाली आहे. धान गर्भार अवस्थेत असल्याने पाण्याची गरज होती, हे सत्य असले तरी तरी वादळी वारा व पावसाच्या तडाख्याने काही ठकाणी धानपिक जमीनदोस्त झाल्याने पुन्हा बळीराजाची चिंता वाढली आहे.भंडारा शहरातही दुपारच्या सुमारास हजेरी लावली. ऊन व सावलीच्या खेळात मात्र आजारालाही खत मिळत आहे. तालुक्यात १४.८ मि.मी पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली.लाखनी/पालांदूर : तालुक्यातील पालांदूर परीसरात विजांच्या कडकडाटांसह पावसाने दमदार हजेरी लावल्याने धानपिकाचे नुकसान झाले. धान भुईसपाट झाले. यात शेतकºयाचे सुमार नुकसान झाले. पावसापासून पीक वाचविण्याकरिता शेतकºयांचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे. धानपीक मातीमोल होत असल्याचे पाहून बळीराजाचा जीव कासावीस झाला आहे. अनेक अडचणींचा सामना करीत ९८ टक्के रोवणी कशीबशी पार पाडीत गणेशचतुर्थीचा मुहूर्त लागला. धान फुटण्यावर येत नाही तर पुन्हा पावसाने दीेर्घ विश्रांती घेतली. याच काळात खोडकिडी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. खर्च वाढतच आहे. नदीनाल्या काठावरील पिके अधिकच प्रभावीत झाली आहे. नरादा, मºहेगाव, पाथरी, वाकल आदी गावातील धान कापणी योग्य झाली असून काही ठिकाणी कडपा ओल्या आहेत.साकोली : तालुक्यात काही ठिकाणी पासवाने हजेरी लावली. पहाटेच्या सुमारास पाऊस बरसला. मात्र त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे अशा वातावरणामुळे धानावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.मोहाडी : तालुक्यातील शेतकºयांना सिंचनासाठी पाण्ळाची गरज असताना परतीच्या पावसाने काी प्रमाणात हुलकावणी दिली आहे. धान गर्भार अवस्थेत असल्याने एका पाण्याची गरज आहे. ढग जमले पण बसरले नाही, अशी स्थिती पाहायला मिळालीतुमसर : शहरात परतीच्या पावसाने हजेरी लावली मात्र तालुक्यात सर्वदूर पाऊस बरसला नाही. मागील २४ तासात १.२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.पवनी : तालुक्यातील चौरास भागात पावसाने वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावल्याने धानपिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली त्यानंतर सायंकाळपर्यत पाऊस बरसला नाही. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे.आसगाव चौ. : वादळी पावसाने बहुतांशी धान पिक भुईसपाट झाल्याने पिक मातीमोल होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच नेहमीप्रमाणे यंदाही असमतोल वातावरणामुळे धानावर किड तुडतुड्याने आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. धान पिक जमीनीवर लोटल्याने उत्पादनावर ५० टक्के नुकसान होणार असल्याचे शेतकºयांचे मत आहे. असाच वातावरण जर आठवड्याभर राहिल्यास व त्यातच आणखी पावसाने हजेरी लावल्यास अपेक्षेपेक्षा जास्तच उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.