शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वादळी वातावरणाची शेतकऱ्यात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:00 IST

गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.

ठळक मुद्देपावसाच्या सरी : वादळामुळे वीज प्रवाह खंडित, वृक्ष उन्मळले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.हवामान खात्याने जिल्ह्यात वादळी वाºयासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गत तीन दिवसांपासून सायंकाळ झाली की, अचानक वादळी वातावरण सुरु होते. सोसाट्याचा वारा वाहू लागतो. भंडारा शहरात या वादळामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडतात. दुचाकी चालकांची मोठी धांदल उडते. अनेक जण डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकीवरून पडल्याच्या घटना घडत आहेत. भंडारा शहरासोबतच जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वातावरणाचा फटका बसत आहे.सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यासह लाखांदूर, लाखनी, साकोली, मोहाडी तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. रात्री भंडारा तालुक्यातील मुजबी, जवाहरनगर, सावरी, खात रोड परिसर, टवेपार आदी ठिकाणी पावसाची सर कोसळली.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसत आहे. यंदा आंबे लदबदून लागले आहेत. गावरानी आंब्याची यंदा नव्हाळी होणार असे असताना दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वातावरणाने झाडावरील आंबे गळून पडत आहेत. या सोबतच गहू आणि उन्हाळी धानपिकालाही फटका बसत आहे. भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.यंदा निसर्ग शेतकऱ्यांवर कोपल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने धानपिकाला फटका बसला. त्यानंतर गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा पिकांना बसला. आता पुन्हा वादळी वातावरण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.पालांदूर परिसरात तीन तास सोसाट्याचा वारापालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयाने जनजीवन विस्कळीत केले. तब्बल तीन तास वारा घोंघावत होता. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वीज पुरवठाही बंद झाला. काही ठिकाणी वीज खांब झाडावर पडल्याने रात्रभर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. चुलबंद खोºयातील मºहेगाव, नरव्हा आदी गावात उन्हाळी धानपीक सुकले आहे. मात्र पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत असल्याचे दृष्य आहे.वातावरणात गारवागत तीन दिवसांपासून वादळी वातावरणामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे नागरिकांची कडक उन्हापासून सुटका झाली. तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत होते. सायंकाळच्या वेळी मात्र असह्य उकाड्याला प्रारंभ झाला.