शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

वादळी वातावरणाची शेतकऱ्यात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:00 IST

गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.

ठळक मुद्देपावसाच्या सरी : वादळामुळे वीज प्रवाह खंडित, वृक्ष उन्मळले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.हवामान खात्याने जिल्ह्यात वादळी वाºयासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गत तीन दिवसांपासून सायंकाळ झाली की, अचानक वादळी वातावरण सुरु होते. सोसाट्याचा वारा वाहू लागतो. भंडारा शहरात या वादळामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडतात. दुचाकी चालकांची मोठी धांदल उडते. अनेक जण डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकीवरून पडल्याच्या घटना घडत आहेत. भंडारा शहरासोबतच जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वातावरणाचा फटका बसत आहे.सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यासह लाखांदूर, लाखनी, साकोली, मोहाडी तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. रात्री भंडारा तालुक्यातील मुजबी, जवाहरनगर, सावरी, खात रोड परिसर, टवेपार आदी ठिकाणी पावसाची सर कोसळली.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसत आहे. यंदा आंबे लदबदून लागले आहेत. गावरानी आंब्याची यंदा नव्हाळी होणार असे असताना दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वातावरणाने झाडावरील आंबे गळून पडत आहेत. या सोबतच गहू आणि उन्हाळी धानपिकालाही फटका बसत आहे. भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.यंदा निसर्ग शेतकऱ्यांवर कोपल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने धानपिकाला फटका बसला. त्यानंतर गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा पिकांना बसला. आता पुन्हा वादळी वातावरण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.पालांदूर परिसरात तीन तास सोसाट्याचा वारापालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयाने जनजीवन विस्कळीत केले. तब्बल तीन तास वारा घोंघावत होता. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वीज पुरवठाही बंद झाला. काही ठिकाणी वीज खांब झाडावर पडल्याने रात्रभर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. चुलबंद खोºयातील मºहेगाव, नरव्हा आदी गावात उन्हाळी धानपीक सुकले आहे. मात्र पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत असल्याचे दृष्य आहे.वातावरणात गारवागत तीन दिवसांपासून वादळी वातावरणामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे नागरिकांची कडक उन्हापासून सुटका झाली. तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत होते. सायंकाळच्या वेळी मात्र असह्य उकाड्याला प्रारंभ झाला.