शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विदर्भ राज्यासाठी शहापुरात रास्ता रोको

By admin | Updated: January 12, 2017 00:16 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भात रास्ता रोको आंदोलन पुकारले होते.

भंडाऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आंदोलनात तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभागभंडारा/शहापूर/जवाहरनगर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भात रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. त्याअनुषंगाने शहापूर येथे माजी सभापती राजकुमार राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन तर भंडाऱ्यात माजी आमदार अ‍ॅड. आनंदराव वंजारी यांच्या शिष्टमंडळाने प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे सादर केले. २८ सप्टेंबर १९५३ मध्ये नागपूर करारात वैदर्भीय जनतेची संमती न घेता विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासुन वैदर्भीय जनतेवर अन्यायाची मालिका सुरू झाली ती अद्याप कायमच आहे. या करारानुसार विदर्भातील बेरोजगार तरूणांना २३ टक्के नोकऱ्यांपैकी केवळ ८ टक्के नोकऱ्या दिल्या. पुणे विभागाला १५ टक्के नोकऱ्या देऊन विदर्भातील ४ लाख नोकऱ्या पळविण्यात आल्या. एमपीएससीच्या २३ टक्के नोकऱ्यापैकी २.२६ टक्के नोकऱ्या दिल्या. परिणामी विदर्भात उच्चपदस्थ अधिकारी पुणे, मुंबई, नाशिक शहरातील दिसुन येतात. विदर्भ स्वतंत्र राज्य झाले तर विदर्भातील तरूणांनाच नोकऱ्या मिळेल, एमपीएससीच्या जागी व्हीपीएससी होऊन याही नोकऱ्या वैदर्भीय तरूणांना मिळतील. विदर्भाचा वाटा विदर्भासाठी खर्च होईल. त्यामुळे गोसीखुर्दसारखे धरणासह अन्य धरणाची प्रलंबित कामे पूर्ण होतील. ८० टक्के शेतीचे सिंचन वाढेल, विदर्भाचा विकास होईल.विदर्भातील विजेचे उत्पादन खर्च २.४० रूपये प्रति युनिट आहे. विजेचे दर निम्म्यावर येईल. कृषी पंपाचे लोडशेडींग संपेल. विदर्भाला २४ तास पूर्ण दाबाची वीज मिळेल. वैदर्भीय बेरोजगाराचा अनुशेष पुर्ण होईल, यासर्व मागण्यांसाठी विदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर विदर्भ राज्यआंदोलन समितीच्यावतीने माजी सभापती राजकपुर राऊत यांच्या नेतृत्वात दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रविण भोंदे, विलास मोथरकर, संदेश श्यामकुंवर, माजी पं.स. सदस्य आनंद तिरपुडे, मोरेश्वर गजभिये, अनमोल गजभिये, मोहन मथुरे, नत्थु शेंदरे, सुरेश गायधने, रूपेश सोनवाने, रमेश ठवकर, प्रणय घुले, नेमा खराबे, अशोक हर्षे, मुंशिलाल बंसोड, तुरज दुरूगकर, संजय कळंबे, घनश्याम बुधे, राधेश्याम डोंगरे, जगदीश डोंगरे, निखिल भुरे, संतोष कझळकर, आकाश वर्धे, अविलाश गेडाम सहभागी झाले होते.राष्ट्रीय महामार्गावर कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र नागरे, उपनिरीक्षक विलास पाटील, उपनिरीक्षक प्रिती आडे, उपनिरीक्षक संदीप ताराम यांनी बंदोबस्त तैनात केला होता. (प्रतिनिधी/वार्ताहर)