शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपत्ती निवारण समितीचे एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:36 IST

करडी (पालोरा) : कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून प्राथमिक शाळा बंद आहेत. विद्यार्थी मागे पडत असल्याची भावना पालकांत आहे. अशातच ...

करडी (पालोरा) : कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून प्राथमिक शाळा बंद आहेत. विद्यार्थी मागे पडत असल्याची भावना पालकांत आहे. अशातच शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधी निर्णयाची जबाबदारी स्थानिक आपत्ती निवारण समितीला दिली. मुंढरी बुज येथील समितीने पालकांच्या भावनांचा व विद्यार्थ्यांच्या हिताचा आदर ठेवीत ग्रामपंचायत, हनुमान मंदिर व दुर्गा मंदिरात आठवड्यापूर्वी तिसरी ते पाचवीपर्यंतची शाळा सुरू केली. अध्यापनाचे कार्य सुरू झाल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

शासनाने कोरोना महामारी आटोक्यात येताच स्थानिक स्तरावर आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या निर्देशानुसार मुंढरी येथे सरपंच एकनाथ चौरागडे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती निवारण समितीची सभा झाली. सभेला करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. जी. तलमले, उपसरपंच जयपाल पडोळे, शाळा समिती अध्यक्ष मोरेश्वर गोमासे, राजेश शहारे, ग्रामसेवक अशोक बागडे, तलाठी मरस्कोल्हे, केंद्रप्रमुख, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सोड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नोमेश शेंडे, ग्रामपंचायत सदस्य, पालक व ग्रामवासी उपस्थित होते.

मुंढरी येथे सहा महिन्यांपासून एकही कोरोना रुग्ण नाही. मग, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न सभेत उपस्थित झाला. यावर पालकांचे व शिक्षकांचे मत विचारात घेत समितीचे अध्यक्ष एकनाथ चौरागडे यांनी वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे धाडस दाखविले. वर्ग आठवी ते दहावीसांबतच तिसरी ते पचवीपर्यंतचे अध्यापनाचे कार्य सुरू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अन्य वर्गासाठी वेळीच निर्णय घेण्याचेही ठरविण्यात आले. प्रस्तावास माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे, के. बी. चौरागडे, दिलीप लाडसे यांनी प्रतिसाद दिला. कोरोना नियमांचे पालन करीत हनुमान मंदिरात तिसरी, दुर्गा मंदिरात चवथी, तर ग्रामपंचायतीमध्ये पाचवीचे वर्ग आठवड्यापासून सुरू आहेत. पिण्याचे पाणी, पंखे आदींची सुविधा पुरविण्यात आली आहे.

शाळेला स्पर्धा परीक्षा संचाची भेट

हायस्कूल व प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू झाल्याने आनंदित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सरिता चौरागडे, के. बी. चौरागडे, सरपंच एकनाथ चौरागडे, उपसरपंच जयपाल पडोळे यांनी प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नवोदय, शिष्यवृत्ती, एमएनएमएस व एनटीएस आदी परीक्षांची प्रत्येकी पाच संच शाळांना भेट दिले.

कोट

कोरानामुळे विद्यार्थी व पालकांत निराशेची भावना होती. गावात सहा महिन्यांपासून रुग्ण नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शविली. पालकांनी स्वयंघोषणापत्र भरून दिले. शिक्षकांनी पुढाकार घेतल्याने मुंढरी प्राथमिक शिक्षणाचे वर्ग सुरू करणारी पहिले गाव ठरले आहे. इतर गावांनाही विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्याची गरज आहे.

- एकनाथ चौरागडे, सरपंच मुंढरी

290721\img_20210728_122748.jpg~290721\img_20210728_122146.jpg~290721\img_20210728_122428.jpg

ग्रामपंचायत, हनुमान व दुर्गा मंदिरात आरंभिले प्राथमिक विद्यादान~ग्रामपंचायत, हनुमान व दुर्गा मंदिरात आरंभिले प्राथमिक विद्यादान~ग्रामपंचायत, हनुमान व दुर्गा मंदिरात आरंभिले प्राथमिक विद्यादान