शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

राज्य मार्गावर जाळल्या धानाच्या पेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:54 IST

मावा, तुडतुडा या रोगाने धानाचे पीक उद्ध्वस्त झाले असताना चुकीची वाढीव आणेवारी दाखविण्यात आली आहे.

ठळक मुद्देतुमसर-बपेरा मार्गावर पाच तास ‘रास्ता रोको’ : शेतकरी-पोलिसांमध्ये शाब्दिक वाद

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : मावा, तुडतुडा या रोगाने धानाचे पीक उद्ध्वस्त झाले असताना चुकीची वाढीव आणेवारी दाखविण्यात आली आहे. यामुळे शासकीय मदतीपासून शेतकºयांना वंचित करण्याचा डाव असल्याने तुमसर बपेरा राज्य मार्गावरील चुल्हाड बसस्थानक येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांचे नेतृत्वात शेतकºयांनी पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी राज्यमार्गावर धानाच्या पेंढ्या जाळण्यात आल्या. पोलीस आणि शेतकºयात शाब्दिक चकमक झाली.सिहोरा परिसरात खरिप हंगामात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. १२ हजार हेक्टर आर क्षेत्रात ही लागवड असली तरी धान कापनीचे तोंडावर या धान पिकाला मावा, तुडतुडा या रोगाने फस्त केले. शेतकºयांना एक पोती धानाचे पिक झाले नाही. असे असताना शासनाने वाढीव व चुकीची आणेवारी घोषित केली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदती पासून वंचित करण्याचा डाव शासन आणि प्रशासनाचा आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत किडीमुळे नुकसान असा निकष नाही. यामुळेपिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची भिती शेतकºयांत आहे. जिल्हाधिकाºयांनी धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिली आहेत. परंतु रोगामुळे नुकसान झालेल्या धानाला आर्थिक मदत व पिक विमा योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली नाही. फक्त सर्वेक्षण करून वेळ मारून नेली जात असल्याची चर्चा आहे. कर्जमाफी देताना लालीपाप दाखविण्यात आल्याचा आरोप करित तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील चुल्हाड बस स्थानक येथे आज दुपारी १२ वाजता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, शेखर कोतपल्लीवार, योगराज टेंभरे, गुड्डू शामकुंवर आणि कंठीलाल ठाकरे यांचे नेतृत्वात शेतकºयांनी पाच तास रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. आधी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत शेतकºयांचे आर्थिक नुकसान संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेत नायब तहसिलदार अशोक पाटील, मंडळ कृषी अधिकारी एस.जी. उईके, पोलीस निरीक्षक मनोहर कोरोटी, मंडळ अधिकारी मिश्रा उपस्थित होते. चर्चेत चुकीची आणेवारी प्रसिद्ध केल्यावरून शेतकºयांत रोष निर्माण झाला आहे. प्रत्येक्षात शेत शिवारात तणीस उभी असून शेतात उभ्या धानाला आग लावण्यात येत आहे. शासन शेतकºयांचे जखमेवर मिठ लावण्याचा प्रयत्न करित असल्याने ठोस आश्वासन शेतकºयांना चर्चेत मिळाले नाही. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना वाहनात डांबण्याचा प्रयत्न केला. या वाहनाला शेतकºयांनी अडविले. संपूर्ण आंदोलन कर्त्यांना अटक करण्याचे घोषणा शेतकºयांनी दिल्या. यामुळे आंदोलनात तनाव निर्माण झाला. पोलिसांचे वाहन अडविण्यात आल्याने पोलीस आणि शेतकºयांत शाब्दिक चकमक झाली. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे आणि प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शेतकºयांना देण्यात आली असून सुधारित आणेवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी आंदोलन कर्त्यांची समजुत घातल्याने आंदोलन थांबले. या आंदोलनात छोटू ठाकरे, चौधरी, दिवाजी अंबुले, नत्थु पटले, माणिक बघेले, विजय बोरकर, हरिद्वार पटले सहभागी झाले.