शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गावर जाळल्या धानाच्या पेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:54 IST

मावा, तुडतुडा या रोगाने धानाचे पीक उद्ध्वस्त झाले असताना चुकीची वाढीव आणेवारी दाखविण्यात आली आहे.

ठळक मुद्देतुमसर-बपेरा मार्गावर पाच तास ‘रास्ता रोको’ : शेतकरी-पोलिसांमध्ये शाब्दिक वाद

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : मावा, तुडतुडा या रोगाने धानाचे पीक उद्ध्वस्त झाले असताना चुकीची वाढीव आणेवारी दाखविण्यात आली आहे. यामुळे शासकीय मदतीपासून शेतकºयांना वंचित करण्याचा डाव असल्याने तुमसर बपेरा राज्य मार्गावरील चुल्हाड बसस्थानक येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांचे नेतृत्वात शेतकºयांनी पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी राज्यमार्गावर धानाच्या पेंढ्या जाळण्यात आल्या. पोलीस आणि शेतकºयात शाब्दिक चकमक झाली.सिहोरा परिसरात खरिप हंगामात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. १२ हजार हेक्टर आर क्षेत्रात ही लागवड असली तरी धान कापनीचे तोंडावर या धान पिकाला मावा, तुडतुडा या रोगाने फस्त केले. शेतकºयांना एक पोती धानाचे पिक झाले नाही. असे असताना शासनाने वाढीव व चुकीची आणेवारी घोषित केली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदती पासून वंचित करण्याचा डाव शासन आणि प्रशासनाचा आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत किडीमुळे नुकसान असा निकष नाही. यामुळेपिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची भिती शेतकºयांत आहे. जिल्हाधिकाºयांनी धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिली आहेत. परंतु रोगामुळे नुकसान झालेल्या धानाला आर्थिक मदत व पिक विमा योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली नाही. फक्त सर्वेक्षण करून वेळ मारून नेली जात असल्याची चर्चा आहे. कर्जमाफी देताना लालीपाप दाखविण्यात आल्याचा आरोप करित तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील चुल्हाड बस स्थानक येथे आज दुपारी १२ वाजता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, शेखर कोतपल्लीवार, योगराज टेंभरे, गुड्डू शामकुंवर आणि कंठीलाल ठाकरे यांचे नेतृत्वात शेतकºयांनी पाच तास रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. आधी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत शेतकºयांचे आर्थिक नुकसान संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेत नायब तहसिलदार अशोक पाटील, मंडळ कृषी अधिकारी एस.जी. उईके, पोलीस निरीक्षक मनोहर कोरोटी, मंडळ अधिकारी मिश्रा उपस्थित होते. चर्चेत चुकीची आणेवारी प्रसिद्ध केल्यावरून शेतकºयांत रोष निर्माण झाला आहे. प्रत्येक्षात शेत शिवारात तणीस उभी असून शेतात उभ्या धानाला आग लावण्यात येत आहे. शासन शेतकºयांचे जखमेवर मिठ लावण्याचा प्रयत्न करित असल्याने ठोस आश्वासन शेतकºयांना चर्चेत मिळाले नाही. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना वाहनात डांबण्याचा प्रयत्न केला. या वाहनाला शेतकºयांनी अडविले. संपूर्ण आंदोलन कर्त्यांना अटक करण्याचे घोषणा शेतकºयांनी दिल्या. यामुळे आंदोलनात तनाव निर्माण झाला. पोलिसांचे वाहन अडविण्यात आल्याने पोलीस आणि शेतकºयांत शाब्दिक चकमक झाली. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे आणि प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शेतकºयांना देण्यात आली असून सुधारित आणेवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी आंदोलन कर्त्यांची समजुत घातल्याने आंदोलन थांबले. या आंदोलनात छोटू ठाकरे, चौधरी, दिवाजी अंबुले, नत्थु पटले, माणिक बघेले, विजय बोरकर, हरिद्वार पटले सहभागी झाले.