शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्य घेऊनच राहू

By admin | Updated: January 20, 2015 22:34 IST

नागपूर करार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळ हे विदर्भाच्या विकासात अडसर ठरले आहे. कालबाह्य झालेल्या या व्यवस्था बंद करुन केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या

सिंदखेडराजा-गडचिरोली यात्रा : वामनराव चटप यांची माहितीभंडारा : नागपूर करार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळ हे विदर्भाच्या विकासात अडसर ठरले आहे. कालबाह्य झालेल्या या व्यवस्था बंद करुन केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करणे गरजेचे आहे. ‘पंधरा दोन पंधरा - विदर्भ मिळवू औंदा’ हा विदर्भ राज्य आंदोलन समितीचा नारा असल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक अ‍ॅड. वामनराव चटप यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक आटोपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अ‍ॅड. चटप म्हणाले, कालबाह्य झालेल्या व्यवस्था विदर्भ आणि विदर्भातील जनतेवर अन्याय करीत आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन समितीने नागपूर कराराची होळी केली आहे. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचा कार्यकाळ यावर्षी एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे.सरकार या महामंडळाचा कालावधी वाढविण्याच्या तयारीत आहे. याला समितीने विरोध केला आहे. या महामंडळाचा कार्यकाळ वाढविण्यापेक्षा स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव ठेवावा, अशी आमची मागणी आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हे सद्यस्थितीत पहिली गरज आहे. सरकार आर्थिक संकटांत आहे. विदर्भाचा अनुशेष लागोपाठ वाढत आहे. अलिकडेच केळकर समितीने अनुशेष भरुन काढण्यासाठी ४.५० लाख कोटी रुपयांची गरज असल्याचे अहवालात नमूद केले आहे. पहिलेच राज्य सरकारवर ३.४४ लाख कोटी रुपयांचे कर्ज असून २३ हजार कोटी व्याज भरावे लागत आहे. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे राज्य सरकारला २६ हजार कोटी रुपयांचे महसुली नुकसान सहन करावे लागणार आहे. परिणामी अंदाजपत्रकात ४० टक्के कपातीचा निर्णय घ्यावा लागला. हा विदर्भावर अन्याय नाही का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णे, दुर्वास धार्मिक, रमाकांत पशिने, सदानंद धकाते, दामोधर क्षीरसागर, डॉ.श्याम नंदनवार, बी. एम. गजभिये, सौरभ दिवटे, अविनाश पनके, तुषार हटेवार, उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)