शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

भटक्यांची स्थिती आजही विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:48 IST

देश महासत्ता होऊ पाहत असताना दुसरीकडे दारिद्र्याचे चटके सहन करणारे अनेक कुटुंब विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़ दोन वेळचे जेवण,

ठळक मुद्देहेरंब कुलकर्णी : भटक्यांच्या तांड्यावर दिल्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देश महासत्ता होऊ पाहत असताना दुसरीकडे दारिद्र्याचे चटके सहन करणारे अनेक कुटुंब विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़ दोन वेळचे जेवण, आरोग्याचे प्रश्न आणि उच्च शिक्षणासाठीही त्यांच्या कुटुंबात दारिद्रय आहे़ भंडारा जिल्ह्यात भटक्यांची स्थिती प्रचंड विदारक असल्याची खंत साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली़हेरंब कुलकर्णी हे भंडारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांचे राहणीमान व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले असताना त्यांनी हे निरीक्षण नोंदविले. भटक्या विमुक्त जमातीतील समाजाची समस्या दूर व्हावी, यासाठी २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू झाली. यासाठी दरवर्षी १० कोटी रूपयांचा निधीची तरतूद करण्यात आली़ मात्र, या ७ वर्षांच्या काळात यवतमाळ व लातूर या दोन जिल्ह्यात प्रत्येकी ४० असे ८० घर या घटकासाठी बांधण्यात आली़. परंतु उर्वरित जिल्ह्यात एकही निधी खर्च करण्यात आला नाही़भंडारा जिल्ह्यात मांग, गारूडी, वडार, गोपाळ, बहुरूपी म्हणून ओळख असलेला हा समाज भटकंती करूनच जीवन जगत आहे़ आजही या समाजाला रेशन कार्ड, मतदानपत्र या योजनांपासून जोडण्यात आले नाही़ शासन अन्नसुरक्षा योजनेतून प्रत्येकांना अन्न पुरविण्याचे सांगत असले तरी या समाजाला अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहावे लागत आहे़ हा विषय सामाजिक न्यायाचा असल्यामुळे भटक्या विमुक्त जमातीचा विकास होण्याची गरज होती. राज्यातील सर्वच जिल्ह्यात जाऊन गरीब तालुका व गरीब गाव यातील तफावतीचा अहवाल डिसेंबर महिन्यात शासनाला सादर करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील चोरखमारी, भिलेवाडा कारधा, गिरोला येथील वसाहतीवर भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या़ याठिकाणी मूलभूत गरजांपासून वंचितांच्या वाड्यांमध्ये पालावरची शाळा सुरू केल्यामुळे विद्यार्थी आता शिक्षण घेताना दिसत आहेत, हे स्वागतार्ह बाब आहे. या भेटीदरम्यान कुलकर्णी यांच्यासोबत संघर्ष वाहीनीचे दिनानाथ वाघमारे, भटके परिषदेचे गोविंद मकरे, मनोज केवट, के़ एऩ नान्हे उपस्थित होते़