शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांची स्थिती आजही विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:48 IST

देश महासत्ता होऊ पाहत असताना दुसरीकडे दारिद्र्याचे चटके सहन करणारे अनेक कुटुंब विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़ दोन वेळचे जेवण,

ठळक मुद्देहेरंब कुलकर्णी : भटक्यांच्या तांड्यावर दिल्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देश महासत्ता होऊ पाहत असताना दुसरीकडे दारिद्र्याचे चटके सहन करणारे अनेक कुटुंब विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़ दोन वेळचे जेवण, आरोग्याचे प्रश्न आणि उच्च शिक्षणासाठीही त्यांच्या कुटुंबात दारिद्रय आहे़ भंडारा जिल्ह्यात भटक्यांची स्थिती प्रचंड विदारक असल्याची खंत साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली़हेरंब कुलकर्णी हे भंडारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांचे राहणीमान व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले असताना त्यांनी हे निरीक्षण नोंदविले. भटक्या विमुक्त जमातीतील समाजाची समस्या दूर व्हावी, यासाठी २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू झाली. यासाठी दरवर्षी १० कोटी रूपयांचा निधीची तरतूद करण्यात आली़ मात्र, या ७ वर्षांच्या काळात यवतमाळ व लातूर या दोन जिल्ह्यात प्रत्येकी ४० असे ८० घर या घटकासाठी बांधण्यात आली़. परंतु उर्वरित जिल्ह्यात एकही निधी खर्च करण्यात आला नाही़भंडारा जिल्ह्यात मांग, गारूडी, वडार, गोपाळ, बहुरूपी म्हणून ओळख असलेला हा समाज भटकंती करूनच जीवन जगत आहे़ आजही या समाजाला रेशन कार्ड, मतदानपत्र या योजनांपासून जोडण्यात आले नाही़ शासन अन्नसुरक्षा योजनेतून प्रत्येकांना अन्न पुरविण्याचे सांगत असले तरी या समाजाला अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहावे लागत आहे़ हा विषय सामाजिक न्यायाचा असल्यामुळे भटक्या विमुक्त जमातीचा विकास होण्याची गरज होती. राज्यातील सर्वच जिल्ह्यात जाऊन गरीब तालुका व गरीब गाव यातील तफावतीचा अहवाल डिसेंबर महिन्यात शासनाला सादर करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील चोरखमारी, भिलेवाडा कारधा, गिरोला येथील वसाहतीवर भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या़ याठिकाणी मूलभूत गरजांपासून वंचितांच्या वाड्यांमध्ये पालावरची शाळा सुरू केल्यामुळे विद्यार्थी आता शिक्षण घेताना दिसत आहेत, हे स्वागतार्ह बाब आहे. या भेटीदरम्यान कुलकर्णी यांच्यासोबत संघर्ष वाहीनीचे दिनानाथ वाघमारे, भटके परिषदेचे गोविंद मकरे, मनोज केवट, के़ एऩ नान्हे उपस्थित होते़