शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

वीज बिल माफीसाठी महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील विद्युत बिले नुकतीच पाठविण्यात आली. भरमसाठ बिल आल्याने ही बिले कशी भरावित हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने व उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आहेत. अन्नधान्यासाठी पैसा खर्च करावा की विद्युत बिल भरावे, असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. वीज बील भरणे आवाक्याबाहेरचे असून ते अदा करणे अशक्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळातील विद्युत बिल माफ करण्यासाठी जिल्ह्यातील ३३० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उर्जा मंत्र्यांना पाठविण्यात आले.या महिलांचे नेतृत्व त्रिवेणी वासनिक यांनी केले. याप्रसंगी कलापती गणविर, सुजाता घोडीचोर, सिलीलता नंदागवळी, त्रिवेणी उपवंशी उपस्थित होत्या. वरठी व भंडारा येथील ३३० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भंडाराचे मुख्य कार्यकारी अभियंता नंदागवळी यांनाही देण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील विद्युत बिले नुकतीच पाठविण्यात आली. भरमसाठ बिल आल्याने ही बिले कशी भरावित हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने व उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आहेत. अन्नधान्यासाठी पैसा खर्च करावा की विद्युत बिल भरावे, असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. वीज बील भरणे आवाक्याबाहेरचे असून ते अदा करणे अशक्य आहे. परिणामी वीज ग्राहकांवर संकट ओढावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतांना हे राज्य सामान्य जनतेचे शेतकºयांचे, कष्टकरांचे आहे असे म्हणतात. दुष्काळाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा कर माफ करुन दिलासा दिला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सुध्दा शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून लॉकडाऊनच्या काळातील विद्युत बिले माफ करावीत, अशी मागणी निवेदनातून महिलांनी केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज