शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

राज्यातील सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

By admin | Updated: June 10, 2015 00:26 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते.

पत्रपरिषद : माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांचा आरोपभंडारा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राज्याचे अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे. कर्जमाफी नाकारून भाजपा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला. भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात संपुआ सरकारने ७२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली होती. परंतु भाजपा सरकारने कर्जमाफी देण्यासाठी नकार दिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील २०१३ चा भूमी अधिग्रहण कायदा व मोदी सरकारचा भूमी अधिग्रहण अध्यादेश याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास मोदी सरकारचा भूमी अधिग्रहण कायदा हा केवळ उद्योगपतींच्या हितासाठीच असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही केला.काँग्रेसचे सरकार असताना लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान विकत घेऊन ऐतिहासिक वास्तु म्हणून जतन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सत्तांतर झाल्यावर भाजपचे नेते श्रेय लाटण्यासाठी घोषणा करीत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा महासचिव प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, शहर अध्यक्ष सचिन घनमारे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)