शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

राज्यातील सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

By admin | Updated: June 10, 2015 00:26 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते.

पत्रपरिषद : माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांचा आरोपभंडारा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राज्याचे अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे. कर्जमाफी नाकारून भाजपा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला. भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात संपुआ सरकारने ७२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली होती. परंतु भाजपा सरकारने कर्जमाफी देण्यासाठी नकार दिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील २०१३ चा भूमी अधिग्रहण कायदा व मोदी सरकारचा भूमी अधिग्रहण अध्यादेश याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास मोदी सरकारचा भूमी अधिग्रहण कायदा हा केवळ उद्योगपतींच्या हितासाठीच असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही केला.काँग्रेसचे सरकार असताना लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान विकत घेऊन ऐतिहासिक वास्तु म्हणून जतन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सत्तांतर झाल्यावर भाजपचे नेते श्रेय लाटण्यासाठी घोषणा करीत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा महासचिव प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, शहर अध्यक्ष सचिन घनमारे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)