शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळालेले राज्य पुरस्कार हा जिल्ह्याचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

यावेळी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी पर्यवेक्षक योगेश राऊत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, परसोडीच्या कृषी सहायक ...

यावेळी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी पर्यवेक्षक योगेश राऊत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, परसोडीच्या कृषी सहायक रेणुका दराडे, कृषिमित्र शाम आकरे, तंमुसचे अध्यक्ष तथा भाजपा तालुका ग्रामीणचे महामंत्री विष्णुदास हटवार व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व उपविभागीय कृषी अधिकारी अधिकारी शांतीलाल गायधने यांच्या हस्ते चिखली येथील सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कारप्रसंगी बोलताना तानाजी गायधने यांनी, कृषी विभागाकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच राज्यस्तरापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाल्याने कृषी अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा असल्याचे सांगितले. भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांनी तानाजी गायधने यांचा आदर्श घेऊन सेंद्रिय शेतीसाठी सामूहिक गटशेतीचा प्रयोग राबविण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी कृषी विभागाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

उपविभागीय कृषी अधिकारी शांतीलाल गायधने यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी आत्माअंतर्गत राबवलेल्या सेंद्रिय शेतीच्या योजनांवर प्रकाश टाकून त्याचे आज पुरस्काराच्या रूपाने फलित मिळाले असल्याचे सांगितले. कृषी सहायक रेणुका दराडे यांनी चिखली गावातील शेतकरी नावीन्यपूर्ण विविध प्रयोग राबवत असल्याचे सांगितले. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी केले, तर आभार कृषी सहायक रेणुका दराडे यांनी मानले.

बॉक्स

मोहाडी तालुक्यातील नेरी येथील विष्णू आतिलकर यांचाही भंडारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने

उपविभागीय कृषी अधिकारी शांतीलाल गायधने, मोहाडीचे तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, मंडळ कृषी अधिकारी विजय रामटेके, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भाग्यवान भोयर, कृषी सहायक खेडीकर, अपेक्षा बोरकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी पुरस्कारप्राप्त शेतकरी विष्णू आतिलकर यांनी आपले शेतातील अनुभव कथन केले.