शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जल शुद्धीकरण यंत्रातील दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:25 IST

एक महिन्यापासून सुरु असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्राम पंचायतीची गावात नाचक्की झाली आहे. विविध स्तरावरून टीकास्त्र सुरु असून गावात नानाविध चर्चांना पेव फुटले आहे.

ठळक मुद्देशुद्ध पाणीपुरवठा होणार : नागरिकांचा ग्राम पंचायतीवर रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : एक महिन्यापासून सुरु असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्राम पंचायतीची गावात नाचक्की झाली आहे. विविध स्तरावरून टीकास्त्र सुरु असून गावात नानाविध चर्चांना पेव फुटले आहे. याबाबत ग्राम पंचायत प्रशासन खळबळून जागा झाला आहे. शुक्रवार सकाळपासून सरपंच श्वेता येळणे, माजी सरपंच संजय मिरासे व माजी उपसरपंच मनोज सुखानी यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर ठिय्या मांडून आपल्या समक्ष दुरुस्तीचे काम करवून घेतले. य्ाासाठी सनफ्लॅग कंपनीच्या जल शुद्धीकरण केंद्राचे प्रमुख यांची मदत घेण्यात आली आहे. लवकरच वरठी वासियांना शुद्ध पाणी पुरवठा पुरर्वत सुरु होणार असल्याची ग्वाही सरपंच यांनी ग्रामस्थांना दिली आहे.वरठी येथे तालुक्यातील एकमेव जल शुद्धीकरण केंद्र आहे. १८ वर्षांपासून गावात फिल्टर पाणी पुरवठा होत आहे. गावातील जीवनवाहिनी म्हणून नळ योजना सुरु होती. एक महिन्यापूर्वी आवश्यकता नसताना चुकीचे नियोजन करून जल शुद्धीकरण यंत्राची दुरुस्ती करण्यात आली. कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन न घेता दुरुस्ती केल्याने यंत्रात बिघाड निर्माण झाला होता. यामुळे एक महिन्यापासून गावातील पाणी पुरवठा प्रभावित झाली होती. एक पाहिण्यापासून नळाला पिवळसर पाणी पुरवठा येत होता. यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबद नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.अनेकदा दुरुस्ती करूनही दूषित पाण्याची समस्या सुटत नसल्याने त्रस्त सरपंच श्वेता येळणे यांनी सकाळपासून जेल शुद्धीकरण केंद्रावर ठिय्या मांडून होत्या. यावेळी माजी सरपंच संजय मिरासे व माजी उपसरपंच मनोज सुखानी, ग्राम पंचायत सदस्य विशाल शेंडे, योगेश हटवार, संघदीप उके, सीमा डोंगरे, मंदा साखरवडे व संगीत बडवाईक ग्राम पंचायत कर्मचाऱ्यासोबत उपस्थित होत्या. जल शुद्धीकरण केंद्रावर उपस्थित राहून सर्वानी आपल्या समक्ष दुरुस्तीचे काम करवून घेतले.कामाचे चुकीचे नियोजन व तज्ज्ञांचा सल्ला न घेता मानमजीर्ने दुरुस्तीचे काम केल्यामुळे ग्राम पंचायत प्रशासन अडचणीत आले होते. माजी सरपंच संजय मिरासे व मनोज सुखानी यांच्या दीर्घकालीन अनुभवाचा फायदा यावेळी झाला. संजय मिरासे यांची ग्राम पंचायतीची पाचवा कार्यकाळ आहे. त्यामुळे त्यांना पाणी पुरवठा विभागाची इत्थ्यंभूत माहिती आहे.माजी सरपंच असल्यामुळे त्यांना पाणी टंचाई व जल शुद्धीकरण यंत्राची देखभाल दुरुस्तीचा प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा यावेळी झाला. सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित असल्यामुळे दुरुस्तीच्या कामात होणारी हयगय झाली नाही. सरपंच काम होईपर्यंत तेथून हटल्या नाहीत.कर्मचाºयांना व्यवस्थित काम करण्याच्या सूचना देण्याबरोबर त्याची आस्थेने चौकशी सुद्धा करीत होत्या. शुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाक्या अतिशय खोल असल्यामुळे कर्मचाºयांना कमालीचा त्रास होताना दिसल्यावर त्यांनी त्यांच्यासाठी पंख्याची व्यवस्था करून दिली. नियोजित काम करताना कर्मचाºयांची देखभाल व आस्थेने वारंवार चौकशी करून त्यांना वेळेवर चहा-नास्ता पुरवण्यावर त्यांचे कटाक्ष लक्ष होते. सायंकाळ पर्यंत जवळपास अध्यार्पेक्षा जास्त काम झाले होते. यामुळे उद्या पासून गावकºयांना शुद्ध पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.पुन्हा केला हल्ला बोलदिवसेंदिवस नागरिकाचे पाण्यासाठी बेहाल होत असल्याने आज दुसºया दिवशीही युवकांनी ग्राम पंचायतीवर हल्ला बोल केला. यावेळी त्यांनी दूषित पाण्याबाबद कडक धोरण करण्याचा आग्रह केला. दूषित पाणी पुरवठा होण्यास जबादार पदाधिकारी याना ग्राम पंचायत पाठीशी घालत असल्याचे सांगून कारवाई करण्याची मागणी केली. गावातील पाणी पुरवठा सुरळीत सुरु न झाल्यास ग्राम पंचातील कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते अश्विन मेश्राम यांनी दिले. यावेळी विजय बांडेबुचे, किशोर मारवाडे, प्रदीप भालाधरे, शुभम तिरपुडे, भुपेश शहारे, पंकज वासनिक, निशांत गजभिये उपस्थित होते.