शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरु

By admin | Updated: May 16, 2016 00:28 IST

सुमारे १५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार असलेल्या भूगाव येथील पुलाचे उर्वरित काम सुरु झाले आहे.

भूगाव येथील प्रकरण : नागरिकांची गैरसोय होणार दूर, विकासाला चालनासानगडी : सुमारे १५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार असलेल्या भूगाव येथील पुलाचे उर्वरित काम सुरु झाले आहे.भूगाव येथील सरपंच दुधराम बारस्कर व इतर मंडळीच्या उपस्थित या पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली. या पुलाविषयी माहिती देताना बारस्कर म्हणाले तीन वर्षापुर्वी भुगावजवळील चुलबंद नदीवर माजी सरकारने पुलाचे काम गोंदियाच्या एका कंत्राटदाराला देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने आरसीसी पुल तयार केला. मात्र ‘अप्रोच’ रोडसाठी दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला बाजार भावाने मिळावा म्हणून आंदोलन केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ज्या शेतकऱ्यांची जमीन अप्रोच रोडसाठी गेली. त्यांना बाजार भावाने शेतीचे पैसे दिले. मात्र विहिरगाव (बु.) येथील प्रल्हाद हरी इठवले यांनी मिळालेल्या पैशाची उचल केली नाही. इठवले यांना कोरडवाहू शेतीचे पैसे मिळाले होते. पण ओलीत शेती गृहीत धरुन पैसे देण्यात यावे म्हणून त्यांनी रितसर अर्ज सादर केला होता. त्यावेळचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी विशेष लक्ष घालून पुलाचे काम मंजुर करवून घेतले. मात्र त्यानंतर या पुलाचे काम तीन वर्षापासून रखडले. या क्षेत्रातील भाजपाचे आमदार, खासदार यांनीही पूल काँग्रेसचा काळातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.पुलाच्या कामाचा तिढा सुटावा व अप्रोच रोडचे काम त्वरित सुरु करावे म्हणून २ फेब्रुवारी २०१६ ला विहिरगाव भुगाव ला जोडणाऱ्या नदीपात्रातील रपट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी हा चर्चेचा मुद्दा ठरला होता.उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम) लाखांदूर, साकोली, लाखनीचे तहसीलदार यांनी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी ऐकूण यावर त्वरित तोडगा काढून येत्या दोन महिन्यात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाली करुन इठवले शेतकऱ्याला ओलीताचे पैसे देऊन टेंडर काढले. आता टेंडरनुसार कंत्राटदाराने १ मे २०१६ पासून काम सुरु केले आहे. मात्र कामाची गती अत्यंत धीमी असून भुगावकडील अप्रोच रोड’च्या माती फिलींगचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी एकच जेसीबी मशीन कामावर लावण्यात आली आहे. त्यातही माती आणणारे ट्रॅक्टर, ट्रक आढळले नाही. पावसाळा तोंडावर आहे. किमान कच्चे काम तरी महिनाभरात पूर्ण व्हावे. जेणेकरुन रहदारी सुरु होईल. पण प्रत्यक्षात तशी कामाची गती दिसली नाही.ठेकेदाराने आपली सर्व यंत्रणा इथे लावून १५ दिवसात माती फिलींगचे काम पुर्ण करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)