शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरु

By admin | Updated: May 16, 2016 00:28 IST

सुमारे १५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार असलेल्या भूगाव येथील पुलाचे उर्वरित काम सुरु झाले आहे.

भूगाव येथील प्रकरण : नागरिकांची गैरसोय होणार दूर, विकासाला चालनासानगडी : सुमारे १५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार असलेल्या भूगाव येथील पुलाचे उर्वरित काम सुरु झाले आहे.भूगाव येथील सरपंच दुधराम बारस्कर व इतर मंडळीच्या उपस्थित या पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली. या पुलाविषयी माहिती देताना बारस्कर म्हणाले तीन वर्षापुर्वी भुगावजवळील चुलबंद नदीवर माजी सरकारने पुलाचे काम गोंदियाच्या एका कंत्राटदाराला देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने आरसीसी पुल तयार केला. मात्र ‘अप्रोच’ रोडसाठी दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला बाजार भावाने मिळावा म्हणून आंदोलन केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ज्या शेतकऱ्यांची जमीन अप्रोच रोडसाठी गेली. त्यांना बाजार भावाने शेतीचे पैसे दिले. मात्र विहिरगाव (बु.) येथील प्रल्हाद हरी इठवले यांनी मिळालेल्या पैशाची उचल केली नाही. इठवले यांना कोरडवाहू शेतीचे पैसे मिळाले होते. पण ओलीत शेती गृहीत धरुन पैसे देण्यात यावे म्हणून त्यांनी रितसर अर्ज सादर केला होता. त्यावेळचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी विशेष लक्ष घालून पुलाचे काम मंजुर करवून घेतले. मात्र त्यानंतर या पुलाचे काम तीन वर्षापासून रखडले. या क्षेत्रातील भाजपाचे आमदार, खासदार यांनीही पूल काँग्रेसचा काळातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.पुलाच्या कामाचा तिढा सुटावा व अप्रोच रोडचे काम त्वरित सुरु करावे म्हणून २ फेब्रुवारी २०१६ ला विहिरगाव भुगाव ला जोडणाऱ्या नदीपात्रातील रपट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी हा चर्चेचा मुद्दा ठरला होता.उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम) लाखांदूर, साकोली, लाखनीचे तहसीलदार यांनी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी ऐकूण यावर त्वरित तोडगा काढून येत्या दोन महिन्यात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाली करुन इठवले शेतकऱ्याला ओलीताचे पैसे देऊन टेंडर काढले. आता टेंडरनुसार कंत्राटदाराने १ मे २०१६ पासून काम सुरु केले आहे. मात्र कामाची गती अत्यंत धीमी असून भुगावकडील अप्रोच रोड’च्या माती फिलींगचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी एकच जेसीबी मशीन कामावर लावण्यात आली आहे. त्यातही माती आणणारे ट्रॅक्टर, ट्रक आढळले नाही. पावसाळा तोंडावर आहे. किमान कच्चे काम तरी महिनाभरात पूर्ण व्हावे. जेणेकरुन रहदारी सुरु होईल. पण प्रत्यक्षात तशी कामाची गती दिसली नाही.ठेकेदाराने आपली सर्व यंत्रणा इथे लावून १५ दिवसात माती फिलींगचे काम पुर्ण करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)