शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरु

By admin | Updated: May 16, 2016 00:28 IST

सुमारे १५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार असलेल्या भूगाव येथील पुलाचे उर्वरित काम सुरु झाले आहे.

भूगाव येथील प्रकरण : नागरिकांची गैरसोय होणार दूर, विकासाला चालनासानगडी : सुमारे १५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार असलेल्या भूगाव येथील पुलाचे उर्वरित काम सुरु झाले आहे.भूगाव येथील सरपंच दुधराम बारस्कर व इतर मंडळीच्या उपस्थित या पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली. या पुलाविषयी माहिती देताना बारस्कर म्हणाले तीन वर्षापुर्वी भुगावजवळील चुलबंद नदीवर माजी सरकारने पुलाचे काम गोंदियाच्या एका कंत्राटदाराला देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने आरसीसी पुल तयार केला. मात्र ‘अप्रोच’ रोडसाठी दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला बाजार भावाने मिळावा म्हणून आंदोलन केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ज्या शेतकऱ्यांची जमीन अप्रोच रोडसाठी गेली. त्यांना बाजार भावाने शेतीचे पैसे दिले. मात्र विहिरगाव (बु.) येथील प्रल्हाद हरी इठवले यांनी मिळालेल्या पैशाची उचल केली नाही. इठवले यांना कोरडवाहू शेतीचे पैसे मिळाले होते. पण ओलीत शेती गृहीत धरुन पैसे देण्यात यावे म्हणून त्यांनी रितसर अर्ज सादर केला होता. त्यावेळचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी विशेष लक्ष घालून पुलाचे काम मंजुर करवून घेतले. मात्र त्यानंतर या पुलाचे काम तीन वर्षापासून रखडले. या क्षेत्रातील भाजपाचे आमदार, खासदार यांनीही पूल काँग्रेसचा काळातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.पुलाच्या कामाचा तिढा सुटावा व अप्रोच रोडचे काम त्वरित सुरु करावे म्हणून २ फेब्रुवारी २०१६ ला विहिरगाव भुगाव ला जोडणाऱ्या नदीपात्रातील रपट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी हा चर्चेचा मुद्दा ठरला होता.उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम) लाखांदूर, साकोली, लाखनीचे तहसीलदार यांनी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी ऐकूण यावर त्वरित तोडगा काढून येत्या दोन महिन्यात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाली करुन इठवले शेतकऱ्याला ओलीताचे पैसे देऊन टेंडर काढले. आता टेंडरनुसार कंत्राटदाराने १ मे २०१६ पासून काम सुरु केले आहे. मात्र कामाची गती अत्यंत धीमी असून भुगावकडील अप्रोच रोड’च्या माती फिलींगचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी एकच जेसीबी मशीन कामावर लावण्यात आली आहे. त्यातही माती आणणारे ट्रॅक्टर, ट्रक आढळले नाही. पावसाळा तोंडावर आहे. किमान कच्चे काम तरी महिनाभरात पूर्ण व्हावे. जेणेकरुन रहदारी सुरु होईल. पण प्रत्यक्षात तशी कामाची गती दिसली नाही.ठेकेदाराने आपली सर्व यंत्रणा इथे लावून १५ दिवसात माती फिलींगचे काम पुर्ण करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)